Friday, 12 June 2020

आघाडी सरकारने कोकणवासीयांची केली घोर निराशा..! "तुटपुंज्या मदतीने केली बोळवण : देवेंद्र फडणवीस"

*_आघाडी सरकारने कोकणवासीयांची केली घोर निराशा...!_*
▪️ _तुटपुंज्या मदतीने केली बोळवण : देवेंद्र फडणवीस*



रत्नागिरी : - दापोली, मंडणगडमधील आपदग्रस्त भागातील जनतेची शासनाने केली घोर निराशा, "राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडी सरकरावर घणाघाती टीका", निसर्ग चक्रिवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे झाले आहे फार नुकसान, "मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी या आपदग्रस्त कुटुंबांना तात्काळ १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची केली घोषणा", मात्र, हे १० हजार रुपये लोकांपर्यंत पोहचलेच नाहित, "केवळ २ मेणबत्त्या आणि १ बिस्किटचा पुडा आला देण्यात", शासनाने इथल्या जनतेची केली आहे घोर निराशा, मच्छीमार, कोळी बांधवांसाठी नाही कोणतीच व्यवस्था, विज, पाणी पुरवठा कधी सुरळित होणार हा प्रश्न आहे, उद्धव ठाकरे यांनी येथील झालेल्या नुकसानीचा गांभिर्याने विचार करावा, देवेंद्र फडणवीस यांनी दापोली व मंडणगड तालुक्यातील निसर्ग चक्रिवादळामुळे झालेल्या आपदग्रस्त गावांची केली पाहणी, यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, विधान परिषद आमदार प्रसाद लाड, माजी खासदार निलेश राणे, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार रवि पाटील, महेश बालदी, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, निरंजन डावखरे, माजी आमदार बाळ माने, भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड.दिपक पटवर्धन, डॉ. विनय नातू, केदार साठे, रत्नागिरी शहराध्यक्ष सचिन करमरकर, महिला अध्यक्षा स्मिता जावकर आदी होते ऊपस्थित.

No comments:

Post a Comment

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”.

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला खंडाळा घाट आज आपल्या दैनंदिन प्रवासाच...