Wednesday 28 October 2020

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रक्रिये विरुध्द प्रहार जन शक्ती पक्ष जाणार मुंबई उच्च न्यायलयात ! - *अंबादास भालेराव*

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रक्रिये विरुध्द प्रहार जन शक्ती पक्ष जाणार मुंबई उच्च न्यायलयात ! - *अंबादास भालेराव*


कल्याण : प्रभाग क्रमांक 45 च्या वार्ड रचनेत वा आ आ यो परिसर, बीएसयूपी परिसर, रमाबाई नगर परिसर वार्ड रचनेत समाविष्ट न केल्यास प्रहार होणार आक्रमक 
कल्याण प्रभाग रचनेच्या घेतलेल्या हरकतीवर योग्य ती दाद न मिळाल्याने  प्रभाग क्षेत्र ४५ कचोरे प्रभागात  सन २००५ मध्ये कल्याण पश्चिम मतदारसंघ १३८ मधील रस्ता रुंदी करणातील हजारो कुटूंब बेघर होऊन कल्याण ग्रामीण १४४ मतदारसंघात कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने  वाल्मिकी आंबेडकर आवास योजना अंतर्गत पुनर्वसन केले होते. कल्याण तालुक्यात अनेक जागी रस्ता रुद्दी करून रूम निष्काशीत करून अनेक नागरिकांना कचोरे येते स्थलांतर केले होते. पण २००५ पासून स्थलांतर झालेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणी दुरुस्ती केली गेली नसल्याने गेल्या पंधरा वर्षा पासून वाल्मिकी आंबेडकर आवास योजना परिसरातील नागरिकांना विकास कामा पासून वंचित ठेवलं गेले आहे.  

     वाल्मिकी आंबेडकर आवास योजना परिसरातील नागरिकांचे मतदान प्रभाग क्रमांक ४५ मध्ये नसल्याने त्या परिसरात आज पर्यत कोणतेही नगरसेवक निधी  खर्च करण्यात आले नाही असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे कल्याण तालुका संघटक अंबादास भालेराव यांनी केला आहे. २००५ साली पुनर्वसन केलेल्या परिसराकडे पालिकेने किंवा निवडून आलेल्या नगरसेवकाने आपली निधी खर्च केली नाही त्यामुळे पालिकेने पुनर्वसन केलेल्या परिसरात नळ शोचालाय, गटारे नाले ,ड्रेनेज रस्ते, पथदिवे, क्रीडांगण, शाळा आरोग्य सेवा, पासून सतत वंचित राहावा लागला आहे. 

सन २००५ पासून पालिकेने कोणतेही विकास निधी खर्च केला नाही. महापालिकेत एकूण १२२ वॉर्ड आहेत. प्रभाग क्रमांक ४५ प्रभागात मतदार संख्येत तफावत आढळल्या आहेत. वॉर्ड रचना करताना  २००१ आणि २००५ चा निकष पकडला आहे. पण २००५  ची वॉर्ड रचना २००१ मधील जनगणनेच्या आधारे केली होती तर २०१५ वॉर्ड रचना 2011 जनगणना आधारे करण्यात आली होती. पन २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या आधारे वाल्मिकी आंबेडकर आवास योजना चा उल्लेख प्रभाग क्रमांक ४५ च्या मतदारसंघाच्या यादीत आला पाहिजे होता पण वार्ड रचना करते वेळी २००५ पासून प्रभाग क्रमांक  ४५ मध्ये असलेल्या परिसराची वार्ड रचनेत उल्लेख केला गेला नाही तशी पुरवणी यादी जोडली गेली नाही तेच निकष २०२० च्या ही प्रभाग रचनेसाठी लावले जाणार आहेत, असा आक्षेप घेऊन भौगोलिक रचना लक्षात घेतली नसल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका संघटक यांचे म्हणणे आहे 

प्रभाग क्रमांक 45 च्या मतदारसंघाच्या यादीत वाल्मिकी आंबेडकर आवास योजना परिसर व रमाबाई नगर परिसर व बीएसयूपी परिसराची प्रभाग रचनेत नमूद करून सर्व मतदारांची नवीन मतदार नोंदणी स्थलांतर नोंदणी दुरुस्ती करून पुरवणी यादी परिसराचा उल्लेख केला पाहिजे अन्यता गेल्या १५ वर्षा पासून विकास निधी पासून वंचित ठेवलेल्या लोकांची तक्रार लक्षात घेऊन ३००० हजार मतदारांना मतदानाच्या हक्का पासून वंचित ठेवून विकास निधी पासून वंचित ठेवल्याचे निष्कर्ष घेवुन प्रभाग क्रमांक ४५ मधील वाल्मिकी आंबेडकर आवास योजना रमाबाई नगर परिसर व बीएसयूपी परिसराची मतदार नोंदणी करावी मतदार यादीत नावे समाविष्ट करून घ्यावी अन्यता प्रभाग क्रमांक ४५ मध्ये होणारया पालिकेच्या निवडणूकिला स्थगिती मिळावी म्हणून उच्च न्यायालयात याचीका दाखल करणार असे अंबादास भालेराव यांनी माहिती दिली. 
 
प्रभाग क्रमांक ४५ मधील वाल्मिकी आबेडेकर आवास योजना परिसरातील सर्व नागरिकांच्या मतदार नोंदणी योग्य रित्या व्हावे जेणे करून वाल्मिकी आंबेडकर आवास योजना परिसरातील सर्व नागरिकांना पालिकेच्या होणाऱ्या निवडणूकित आपल्या हक्काच्या उमेदवाराला मतदान करण्याचा हक्क बजावता आलं पाहिजे म्हणून सर्व मतदारांची नोंदणी साठी प्रहार जमशक्ती पक्षाचे कल्याण तालुका संघटक यांनी प्रांत कार्यालयात स्थलांतर झालेल्या सर्व नागरिकाच्या नोंदणी प्रभाग क्रमांक  कचोरे ४५ च्या यादीत समाविष्ट करण्यासाठी  निवेदन दिले आहे. निवेदन देऊन सुद्धा मतदार नोंदणी अधिकारी, BLO मतदार नोंदणी करण्यासाठी टाळाटाळ।करत आहेत त्याकरिता  पालिकेच्या पोट निवडणूकिच्या आगोदर मतदारांची नोंदणी केली गेली नाही तर होणाऱ्या पालिकेच्या निवडणूकित प्रभाग क्रमांक ४५ कचोरे प्रभागात निवडणूक होऊ जो पर्यत वाल्मिकी आंबेडकर आवास योजना रमाबाई नगर परिसर बीएसयूपी परिसराची नोंद  यादीत होणार नाही  व सर्व मतदार मतदान करण्यासाठी सक्षम होणार नाही यासाठी  मुबई उच्च न्यायालयात स्थगिती  घेऊ असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका संघटक अंबादास भालेराव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...