Sunday, 30 May 2021

राज्यात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले !

राज्यात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले !


मुंबई : रविवारी राज्यात १८,६०० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५७,३१,८१५ झाली आहे. आज २२,५३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५३,६२,३७० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले.

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५५% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण २,७१,८०१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान राज्यात रविवारी ४०२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. 

No comments:

Post a Comment

रिपोर्ट: सपोनि विनोद पाटील नेम. म.फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण प. यांच्याकडुन विषय म.फुले चौक पो.स्टे. कल्याण येचील बेवारस वाहनांची माहीती व...