जव्हार- जितेंद्र मोरघा :
प्राथमिक शिक्षण घेत असताना इयत्ता पाचवी व आठवी च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा देऊन भविष्यात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती चा लाभ घेता येतो.
तसेच या परीक्षा म्हणजे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी प्राथमिक शिक्षण आहे किंबहुना विद्यार्थ्यांना सर्वांगीण अभ्यासाची तयारी करून घेण्यासाठी उपयुक्त ठरतात. ग्रामिण भागात यापूर्वी बहुसंख्य विद्यार्थी हि परीक्षा देत होते.
त्यावेळी परीक्षा शुल्क नाममात्र होते.
परंतु या वर्षी या शुल्कात मोठी वाढ झाली असून १००/- रुपये करण्यात आली आहे.
त्यामुळे पालक व विद्यार्थी यांनी याबाबत प्रदीप वाघ यांना संपर्क साधला व माहिती दिली आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत आदिवासी भागातील विद्यार्थी सहभाग घेतील परंतु शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यामधुन सुट मिळावी अशे पत्र प्रदीप वाघ यांनी. मा.मुख्यमंत्री महोदय, मा.आयुक्त शिष्यवृत्ती परीक्षा शिक्षण विभाग पुणे व पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा यांना दिले आहे.
तरी या बाबतीत तातडीने निर्णय घ्यावा व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी अशी अपेक्षा प्रदीप वाघ यांनी व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment