Wednesday 28 September 2022

आर एस पी व नागरी संरक्षण दलाची सत्र प्रवेश सभा कल्याण येथे यशस्वीरित्या संपन्न !!

आर एस पी व नागरी संरक्षण दलाची सत्र प्रवेश सभा कल्याण येथे यशस्वीरित्या संपन्न !!

*कल्याण आर एस पी पथकाचा कामगिरीमुळे महाराष्ट्रातील लोकांना आर एस पी चे महत्व कळाले::: वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील.*. 

*कल्याण मध्ये आर एस पी युनिट चे खरे कर्तव्य समजले:: एसीपी वाहतूक धर्माधिकारी यांचे प्रतिपादन.* 

*रस्ता सुरक्षा हा विषयाचे महत्व वाढवण्यासाठी गृहखाते पोलीस विभाग व शिक्षण शिक्षण विभागाचे सहकार्य महत्त्वाचे आहे:: हिराजी पाटील यांचे मनोगत* 


कल्याण, ( मनिलाल शिंपी ) : महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन, नागपूर (RSP & CD) अंतर्गत ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी मती ललिता दहीतुले यांच्या आदेशानुसार, आर एस पी चे राज्यसचिव हिराजी पाटील, यांच्या अध्यक्षतेखाली, कल्याण वाहतूक उपायुक्त धर्माधिकारी साहेब, अंबरनाथ वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील साहेब, आरटीओ चे मोटार वाहन निरीक्षक धात्रक साहेब, उपाध्यक्ष संजय भैलुमे, कोकण विभागीय समन्वय समिती सदस्य एडवोकेट के डी पाटील, पुणे विभागीय समादेशक श्रीमती प्रतिमा हरिभक्ते, समन्वय समिती प्रमुख अनिल कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत, कल्याण पश्चिम नूतन माध्यमिक विद्यालय येथे प्रवेश सत्र सभेच्या आयोजन करण्यात आले होते. 


यावेळी नूतन विद्यालयाचां आर एस पी बालसैनिकांनी मान्यवरांना मानवंदना दिली. दीप प्रज्वलानंतर एस पी बालसैनिक विद्यार्थिनींनी स्वागत गीत यशवंत सादर केले. शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तरटे साहेब यांनी प्रशासन अधिकारी व्ही. व्ही सरकटे यांचे शाल बुके देऊन स्वागत केले. आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे ठाणे जिल्हा समादेशक मणिलाल शिंपी यांच्यासह अधिकाऱ्यांनी येथोचित सन्मान केला. 


वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की कल्याण मध्ये आल्यानंतर कल्याणची ट्रॅफिक समस्या खूप गंभीर होती अशावेळी शिंपी सरांनी संपूर्ण आर एस पी युनिट सह आम्हाला मोलाचे सहकार्य केले आहे. तसेच कोरोना सारख्या काळात हे कल्याण मधील आर एस पी शिक्षक स्वतःच्या जीवाची परवा न करता ..कल्लू गल्ली पाडी जाऊन लोकांना वीस संस्थान कडून मदत उपलब्ध करून देत होते. 


आम्हाला महाराष्ट्रातून आमच्या पोलीस विभागाचे फोन येत होते की कल्याण मध्ये आरएसपी पथकाची कामगिरी पाहून आमच्याकडे असे आरएसपी शिक्षक पथक व्हावे अशी मागणी करण्यात येत होती. खरोखर कल्याणचा आर एस पी युनिट मुळे महाराष्ट्रामध्ये प्रशासनाला आणि लोकांना आर एस पी चे महत्व कळाले. खरोखर आर एस पी विषय हा गरजेचे आहे आणि आरएसपी अधिकारी पथकाचे कार्य हे कौतुकास्पद आहे ते सांगितले. एसीपी धर्माधिकारी साहेब यांनीही मार्गदर्शनपर बोलताना सांगितले की कल्याण मध्ये आल्यावर 31 डिसेंबर हा दिवस सगळे एन्जॉय करतात अशा प्रसंगी कल्याण चे आर एस पी अधिकारी पथक मी बंदोबस्त करताना पाहिले ही माहीत नव्हते की एवढे अधिकारी कसे या ठिकाणी आहेत तेव्हा आमच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सांगितले की ए आर एस पी अधिकारी शिक्षक आहेत. खरोखर अगदी मन लावून कल्याण आर एस पी शिक्षक कर्तव्य बजावीत आहेत त्यामुळे आम्हाला आरएसपीच्या सार्थ अभिमान आहे अशा शब्दात कौतुक केले व आर एस पी विषयासंदर्भात शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी काही गरज भासली तर आम्ही नेहमी मदतीसाठी तयार आहोत असे आश्वासन दिले. परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक सातक साहेब यांनी रस्ता सुरक्षा विषयाचे धडे, वाहतुकीचे नियम हे शाळेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जनसामान्यापर्यंत पोहोचतील आणि अपघाताचे प्रमाण कमी होईल म्हणून आर एस पी हा विषय प्रत्यक्ष आहे तुम्ही राबविण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत असे सांगितले. कोकण विभागीय समिती सदस्य एडवोकेट के डी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आर एस पी हा विषय पोलीस विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असून आपल्या आर एस पी शिक्षक अधिकाऱ्यांमुळे पोलीस प्रशासनाला विशेष सहकार्य होते आणि आपत्कालीन परिस्थितीत आपण पोलीस विभागाला आणि प्रशासनाला मदतीसाठी सहकार्य करणे आवश्यक आहे पोलीस विभागाकडून व शिक्षण विभागाकडून आरएसपी साठी नेहमीच भरीव मदत आपल्याला होत असते. कल्याण आर एस पी पथकाने फक्त कल्याणपुरतं मर्यादित न ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात आर एस पी ची नवीन अशी ओळख निर्माण करून दिली आहे आर एस पी चे महत्व प्रशासन आणि पोलीस विभागाला देखील कल्याण आर एस पी पथकामुळेच मोठ्या प्रमाणात जाणीव झाली आहे. आर एस पी कमांडर मनिलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली मधील आर एस पी अधिकारी त्यांनी कोरोना सारख्या आपत्कालीन परिस्थितीत सुरुवातीपासूनच पोलीस विभाग आणि प्रशासनास मोलाचे सहकार्य केले आहे. कल्याण डोंबिवली आर एस पी च्या कर्तव्याची व कामगिरीची दखल शासकीय पातळीवर देखील घेण्यात आली असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. यापुढे ठाणे जिल्ह्यात जास्तीत जास्त आर एस पी पथक नोंदणी करून शाळा रजिस्टर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. समन्वय समिती सदस्य प्रतिमा हरिभक्त मॅडम यांनी आर एस पी ची कार्यप्रणाली आर एस पी ची रचना व आर एस पी विषयाचे ध्येय धोरणे याविषयी मार्गदर्शन केले. समन्वय समिती प्रमुख अनिल कुंभार यांनी आरएसपी चे महत्व आणि आरएसपी चे कार्य याविषयी नवीन संकल्पना अमलातील असे सांगितले. कोकण विभागीय राज्य सचिव हिराजी पाटील यांनी सांगितले की आर एस पी विषय आणि आर एस पी अधिकारी यांनी आपल्या शाळेपासून आर एस पी चे कर्तव्य सुरू करावे व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा पथकाची नोंदणी करून आर एस पी चे महत्व व वाहतूक नियमांचे पालन याविषयी जनजागृती करण्यासाठी पोलीस प्रशासन व शिक्षण विभाग याची मदत घेणे आवश्यक आहे. वाहतूक विभाग परिवहन विभाग यांच्या सहकार्याने आर एस पी चे विविध उपक्रम आपण राबवले पाहिजेत व आपत्कालीन परिस्थितीत पोलीस विभागाला त्यांच्या आदेशानुसार मदत करणे आवश्यक आहे. तसेच आरएसपी अधिकारी यांनी कर्तव्य करताना आपल्याला कोणी चुकीचे ठरवणार नाही याची काळजी घ्यावी व आपल्याकडून कोणतेही गैरवर्तन होणार नाही याबाबत तत्परता बाळगावी असे सांगितले. सदर सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक महादेव क्षीरसागर यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी नूतन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सय्यद मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले, संस्थेचे पदाधिकारी यांनी आर एस पी चा कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवली त्याबद्दल शिंपी सरांनी त्यांचे धन्यवाद व्यक्त केले. यावेळी शारदा मंदिर शाळेचे मुख्याध्यापक आर डी पाटील, सम्राटअशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, विद्या सेवक पतपेढीचे उपाध्यक्ष मुख्याध्यापक प्रशांत भामरे, भाजपा शिक्षका आघाडीचे बोरनारे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एस पी अधिकारी अनंत किनगे यांनी केले. महाराष्ट्र राज्य आर एस पी चे उपाध्यक्ष संजय भैलुमे यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या अधिकारी आणि कार्यक्रमाची रूपरेषा पाहून कल्याण डोंबिवली ठाणे आर एस पी अधिकारी युनिटचे कौतुक आणि अभिनंदन केले. यावेळी गेल्या २१ वर्षापासून आर एस पी चे तन-मन-धनाने अगदी मनापासून कर्तव्य करणारे ठाणे जिल्ह्याचे समादेशक दिलीप स्वामी यांच्या समन्वय समितीतर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...