देवेंद्र फडणवीसांशी बोलता बोलता तो वृद्ध व्यक्ती जमिनीवर कोसळला अन् एकच गोंधळ उडाला !!
सोलापूर, प्रतिनीधी (गणेश नवगरे) - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते महसूल भवनाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी विलास शहा हे वृद्ध सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आले होते. सोलापूर-हैदाराबाद मार्गावरील कत्तलखान्यासंदर्भातील तक्रारीचे निवेदन घेऊन ते आले होते.
विलास शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. त्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून त्यांना समस्या समजावून सांगत होते. देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलत असताना विलास शहा थोडे खाली वाकले. त्यावेळी ते देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडत आहेत, असा अनेकांचा समज झाला. मात्र, विलास शहा जागेवरच कोसळल्याने त्यांना भोवळ आल्याचे सर्वांना समजले. यानंतर नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. देवेंद्र फडणवीस यांनी विलास शहा यांना सावरण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री विखे पाटील यांनी ताबडतोब विलास शहा यांना पाणी पाजून त्यांना खुर्चीवर बसवले आणि त्यांचे निवेदन स्वीकारले. यानंतर विलास शहा यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
सोलापूर हैदराबाद महामार्गावरील सोनांकुर कत्तलखाना बंद करावेत, या मागणीसाठी विलास शहा हे गेल्या १५ वर्षांपासून लढा देत आहेत. १५ दिवसांत आपली मागणी मान्य न झाल्यास मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करेन, असा इशारा विलास शहा यांनी दिला आहे.
*देवेंद्र फडणवीसांनी शहांना सावरले, खुर्चीवर बसविले*
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना विलास शहा यांना भोवळ आल्याने एकच गोंधळ उडाला होता. देवेंद्र फडणवीस यासोबतच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, बबनदादा शिंदे सह अधिकारी व भाजप पदाधिकाऱ्याची मोठी गर्दी होती. या गर्दीत फडणवीस यांनी विलास शहा यांना स्वतः उचलले आणि खुर्चीवर बसविले पाणी पाजले. निवेदन स्वीकारून पुढे गेले. पोलिसांनी देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केल्याने परिस्थिती ताबडतोब नियंत्रित झाली.
विलास शहा यांचा आत्मदहनाचा इशारा __
देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री विखे पाटील यांनी ताबडतोब विलास शहा यांना पाणी पाजून त्यांना खुर्चीवर बसवले आणि त्यांचे निवेदन स्वीकारले. सोलापूर हैदराबाद महामार्गावर असलेल्या सोनांकुर कत्तलखाना बंद करावे. या कत्तलखान्यामुळे बोरामणी विमानतळाचा विकास होत नाही. तसेच अनेक बांगलादेशी या कत्तलखान्यात काम करत आहेत, हे घुसखोर आहेत असा आरोप विलास शहा यांनी केला आहे. येत्या १५ तारखेपर्यंत हा कत्तलखाना बंद नाही झाला तर आत्मदहन करणार असा इशारा विलास शहा यांनी दिला.
No comments:
Post a Comment