रायते विभाग हायस्कूल रायते शाळेतून आपटी गावची कु भाविका शिसवे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण, अभिनंदनाचा वर्षाव !
कल्याण, (संजय कांबळे) ::कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब, कष्टकरी, शेतमजूर आदी पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरलेल्या रायते विभाग हायस्कूल रायते व कनिष्ठ विद्यालय रायते या शाळेचा बारावीचा निकाल ८५ टक्के लागला असून आपटी गावची कु भाविका नितलास शिसवे हि ८६ गुण मिळवून रायते विद्यालयातून पहिली आली आहे, तर द्वितीय क्रमांक कु त्रुषाली आप्पा म्हसकर तर तृतीय क्रमांक कु सानिका लक्ष्मण मुठोलकर हिचा आला आहे तसेच पत्रकार संजय कांबळे यांचा मुलगा कु आन्शू कांबळे याला ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे, त्यामुळे त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कल्याण तालुक्यातील उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या शेतीप्रधान आपटी गावची ओळख महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर झाली ती म्हणजे याच गावातील डॉ रवींद्र अनंता शिसवे हे आयपीएस झाल्यानंतर, अत्यंत खडतर प्रवास करून डॉ शिसवे हे एकमेव आगरी समाजातील पहिले आयपीएस अधिकारी बनले, अनेक जिल्हाचे पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी यशस्वी पणे पार पाडल्यानंतर आता ते मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त म्हणून काम पाहत आहेत,
त्यांच्याच कुटूबातील धार्मिक वृतीचे व भक्तिमार्गावर चालणारे नितलास शिसवे यांची कन्या कु भाविका नितलास शिसवे हि रायते विभाग हायस्कूल रायते शाळेतून बारवी परीक्षेत ८६ टक्के गुण मिळवून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली, मुळात गोरगरीब, कष्टकरी, शेतमजूर, कामगार यांची शिक्षण संस्था म्हणून पद्मश्री अण्णासाहेब जाधवांच्या भारतीय समाज उन्नती मंडळाच्या रायते विभाग हायस्कूल रायते व कनिष्ठ विद्यालयची ओळख निर्माण झाली आहे.
या विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, वर्गशिक्षक, कर्मचारी हे माझा विद्यार्थी , म्हणून त्यांच्या कडे लक्ष देतात, याचाच परिणाम म्हणून इयत्ता १० व बारावी परीक्षेचा निकाल जवळपास १०० टक्के लागतो, नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेत रायते शाळेतून ११३ विद्यार्थी परीक्षेत बसले होते, त्यापैकी सुमारे ९६ मुले उत्तीर्ण झाले, यामध्ये कु भाविका नितलास शिसवे ही सर्वाधिक गुण मिळवून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली, कु त्रुषीला म्हसकर ७७:३३ द्वितीय कु सानिका मुठोलकर (७३:६७) तृतीय क्रमांकाने पास झाले, तर कल्याण तालुक्यातील जेष्ठ पत्रकार संजय कांबळे यांचा मुलगा कु आन्शू संजय कांबळे याने ६०गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवले आहे.
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल जनाधार निर्भीड पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार संजय कांबळे, राष्ट्वादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भरत गोंधळे, तालुका अध्यक्ष जमराम मेहेर, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक अनंता शिसवे, कल्याण पंचायत समितीच्या माझी सभापती सौ शुभांगीताई शिसे,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे सेवा दलाचे संतोष शेलार, ज्ञानेश्वर पाटील आदींनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment