Tuesday, 1 August 2023

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भात पिकाचे पंचनामे !

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भात पिकाचे पंचनामे !

जव्हार, जितेंद्र मोरघा :

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे अतिवृष्टीमुळे भात शेती व इतरही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. सतत नदी नाल्या शेजारी असलेली शेती पुर्ण मातीने पुरुन गेलेली आहे, पुराच्या पाण्याने शेतात माती दगड आले आहेत. आधीच उशिरा पाऊस आणि आता अतिवृष्टी मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

जव्हार तालुक्यातील कासटवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गावांचेअतिवृष्टी व पूर पावसामुळे पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत, ग्रामविकास अधिकारी किशोर सोनवणे, कृषी सहायक नितीन पाटील, रोजगार सेवक अनिल उदार, मा.ग्राम सदस्य बाळकृष्ण वाघ शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण पूर्व व श्री मलंग विभागात अखंड वीजपुरवठ्यासाठी MSEDCL अधिकाऱ्यांसोबत बैठक; स्विचिंग स्टेशन व RDSS प्रकल्पांवर चर्चा !!

कल्याण पूर्व व श्री मलंग विभागात अखंड वीजपुरवठ्यासाठी MSEDCL अधिकाऱ्यांसोबत बैठक; स्विचिंग स्टेशन व RDSS प्रकल्पांवर चर्चा !! *क...