Friday 15 September 2023

मुंबईच्या वेशीवरील टोल वाढवल्यामुळे मनसे आक्रमक !!

मुंबईच्या वेशीवरील टोल वाढवल्यामुळे मनसे आक्रमक !!

भिवंडी, दिं,१५,अरुण पाटील (कोपर)
              मुंबईच्या वेशीवरील टोलनाक्यांवरील टोलवाढीच्या मुद्यावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे. कारण मुंबईत प्रवेश करण्याआधी लागणाऱ्या ५ टोलनाक्यावरील टोल वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

              वाशी, मुलुंड एलबीएस, मुलुंड ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, दहिसर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ऐरोली या पाच टोल नाक्यांवरील शुल्क १ ऑक्टोबरपासून वाढणार आहे. टोलमधील ही वाढ साधारणपणे दर तीन वर्षांनी होत असते. यापूर्वी टोल क्षुल्कात वाढ  २०२०  मध्ये वाढ झाली होती.

           टोलवाढ झाल्यानंतर हलक्या वाहनांसाठी ४० रुपये लागणार आहे. याआधी हा टोल ३५ रुपये होता. ट्रक आणि मिनी बससाठी १०५ रुपयांवरून १३० रुपये तर जड वाहनांकडून १३५ रुपयांवरून १६० रुपये टोल आकारला जाणार आहे. हे दर  २०२६ पर्यंत लागू असतील. टोलवाढीच्या निर्णयानंतर मनसेने सरकारवर टीका केली आहे. मनसेने ट्वीट करत म्हटलं की, आधीच ठाणेकर ४ टोल भरतात, त्यात येत्या १ ऑक्टोबरपासून सरकार टोलवाढ करणार आहे. हीच टोलधाड रोखण्यासाठी मनसे नेते अविनाश जाधव, सत्यवान दळवी, ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे, मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे निवेदन द्यायला गेले असता त्यांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतलं. बाप्पा बुद्धी दे रे ह्या निर्बुद्ध सरकारला, असं ट्वीट मनसेने केलं आहे.    

      महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक खाजगी एजन्सी – सवलतधारक नियुक्त केले आहेत. एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव म्हणाले की नियुक्त केलेले सवलतधारक २०२६  पर्यंत टोल वसूल करतील. पाच प्रवेश बिंदूंवरील टोल वसुली २०२६ पर्यंत वैध आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेना ( उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा आणि सामाजिक कार्यकर्ते संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर राज्यस्तरीय समाजभूष पुरस्कार -२०२४, आदर्श संस्था पुरस्कारने सन्मानित !!

शिवसेना ( उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा आणि सामाजिक कार्यकर्ते संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर राज्यस्तरीय समाजभूष पुरस्कार -२०२...