स्वराज अभियानच्या कार्यालय उध्दघाटनांचा धडाका .....
नालासोपारा, प्रतिनिधी :- नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या विविध समस्यांचे निवारण करण्याकरिता स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे यांच्या संकल्पनेतून प्रभाग तिथे कार्यालय स्वराज अभियान आचोळे विभागातील दुसरे कार्यालयाचे एव्हरशाईन नालासोपारा येथे जल्लोषात उध्दघाटन धनंजय गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या सामाजिक कार्याने वसई तालुक्यात वेगळ स्थान निर्माण करणार व्यक्तिमत्व धनंजय गावडे यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने कार्यालय उध्दघाटन प्रसंगी सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यामुळे वसई तालुक्यातील राजकीय वर्तुळात एक तडफदार, डॅशिंग आणि स्वराज अभियान चे फायरब्रँड नेता अशी त्यांची ओळख झाली आहे. विविध पक्षातील नेत्यांना हि धनंजय गावडे यांचे राजकीय वजन माहिती असल्याने त्यांचा राजकीय दबदबाही वाढत आहे.
तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असुन प्रत्येक कार्यक्रमात तरुण मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत तरुणांमध्ये त्यांच्याबद्दल ‘क्रेझ’ दिसून आली. त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी तरुणाईने गर्दी केली होती. धनंजय गावडे यांचा विजय असो”, कोण आला रे कोण आला”, ” नालासोपाराचा वाघ आला”, येऊन येऊन येणार कोण, धनंजय गावडे शिवाय आहेच कोण” अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
सर्वच कार्यक्रमांना हजेरी लावून आपल्या परीने सर्व कार्यक्रमाला मदत करणे आरोग्य विषयक लोकांना मदत करणे एखाद्यावर अन्याय होत असेल तर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरणे अशी अनेक कामे करत जनतेच्या मनात स्थान निर्माण केला. अनेक गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम सुद्धा केला आहे शिक्षणापासून एखादा वंचित राहत असेल तर त्यालाही मदत करणे अपंग व्यक्तीला मदत करणं रस्ते वीज पाणी यासारखे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा धनंजय गावडे नेहमी पुढे असतात.
उत्तम संघटक वकृत्व आणि समाजातील तळागाळातील घटकांच्या प्रश्नाची जाण आहे नेहमी जेष्ठ व युवकांमध्ये योग्य समन्वय राखला, तसेच समाजातील विविध घटकांना बरोबर घेऊन राजकारणाच्या पलिकडे जाऊन त्यांनी समाजाचा सर्वांगीण विकास केला आहे. हे त्यांचा यशस्वी कार्य कर्तुत्वाच गमक आहे. कार्यकर्त्यानचा गराडा आणि भेटणारया नागरीकांची सततची गर्दी धनंजय गावडे यांच्या व्यक्तीमहत्वाचा भाग बनली आहे
यावेळी शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक व उपशहर प्रमुख आशा सातपुते यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
महेश धनावडे, दाऊत शेख, आयुष मिश्रा, जसवंत मौर्य, ऐसनाथ पांडे, अमित मिश्रा, रोहित गोड, जयकिशन यादव यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम उत्साहात पार पाडला...
No comments:
Post a Comment