Sunday, 9 March 2025

नविन शैक्षणिक धोरणातुन उत्तम शिक्षण आणि योग्य प्रशिक्षणाने राष्ट्र विकासाला गती मिळेल - वरिष्ठ पोलिस निरिक्षक लालू तुरे यांचे प्रतिपादन

नविन शैक्षणिक धोरणातुन उत्तम शिक्षण आणि योग्य प्रशिक्षणाने राष्ट्र विकासाला गती मिळेल - वरिष्ठ पोलिस निरिक्षक लालू तुरे यांचे प्रतिपादन 

विरार, प्रतिनिधी : वसई तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी आयोजित “शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.०” या पाच दिवसीय शिबिराचा समारोप शनिवार दिनांक ८ मार्च रोजी  यश विद्या निकेतन स्कूल, विरार (पूर्व) येथे संपन्न झाला.

या प्रशिक्षणासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संभाजी भोजने, वसई पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौं. माधुरी पाटोळे आणि यश विद्यानिकेतन शाळेच्या प्राचार्या सौ रुचिता ठाकूर मॅडम यांनी भेटी दरम्यान मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. लालू तुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी “उत्तम शिक्षण आणि योग्य प्रशिक्षणामुळे राष्ट्र विकासाला गती मिळते” असे सांगत शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट केले.

प्रशिक्षक प्रा. स्वाती जयकर यांनी “नवीन शिक्षण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांनी आधुनिक स्पर्धात्मक जगातील क्षमता आत्मसात करणे गरजेचे आहे व त्या क्षमता आपल्या विद्यार्थ्यांना गरूडझेप घेण्यास सक्षम करतील” असे प्रतिपादन केले.

यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून महिला शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात सहभागी शिक्षकांना कार्यमुक्ती प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

नवीन शिक्षण धोरणावर प्रा विलास खोपकर व प्राचार्या मुग्धा लेले या तज्ञांचे सखोल व प्रेरक मार्गदर्शन झाले. विद्यार्थ्यांसाठी क्षमताधिष्ठित कौशल्य  विकसित करण्याचा रोड मॅप प्रशिक्षणात प्रा. प्रज्ञाकिरण वाघमारे, प्रा महेश पाटील, भक्ती राऊत मॅडम, संजय चौधरी सर यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना दिला. शाळेचे मुल्यांकन प्रणाली SQAAF व समग्र प्रगती पुस्तक यावर प्रभावी भाष्य कॅरल रॅाड्रीक्स मॅडम, चंद्रकांत वीरकर सर, संघवी ठाकूर मॅडम यांनी केले. वसई तालुका शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षणात समन्वयिका प्रिती राठोड मॅडम यांनी उत्तम व्यवस्थापन पाहिले व डॅा. प्रा. महादेव इरकर यांचे सहकार्य लाभले.

या उपक्रमात प्रश्न निर्मिती व ‘काऊट’ हे विशेष आकर्षण ठरले.

No comments:

Post a Comment

  डोंबिवली येथे आखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे‌ समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार ! जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'सन्मान स्त्र...