Tuesday, 17 June 2025

कोकण कट्टा कडुन बालग्राम बालकांना एक हजार सातशे पन्नास किलो धान्य भेट !!

कोकण कट्टा कडुन बालग्राम बालकांना एक हजार सातशे पन्नास किलो धान्य भेट !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
               विलेपार्ले येथील सेवार्थ उपक्रम करणारी नामवंत संस्था कोकण कट्टा या संस्थे कडुन बालग्राम पेण संस्थेच्या अनाथ, गरीब, गरजू आदिवासी पाड्यातील शालेय विध्यार्थीयांसाठी तांदूळ व डाळ १७५० किलो धान्य व पेन पेन्सिल भेट देण्यात आली, ग्राम संवर्धन संस्थेचे सर्वेसर्वो रायगड भूषण संतोष ठाकूर, राजेश रसाळ, राजू पाटील, मानसी ताई यांच्या कडे सुपूर्द केले, कोकण कट्टाचा फणस जंगल या उपक्रम ही येथे मुलांकडून रोप वाटिकासाठीसाठी १०० हुन अधिक बिया रोपण करण्यात आल्या संस्थांपक अजित पितळे मार्गदर्शक दादा गावडे, सुजित कदम, अशोक भोईर आणि निशिकांत मोरे उपस्थित होते. पार्लेकर तसेच श्री स्वामी समर्थ मठ पारले, वीर हनुमान सोसायटी, २ नं, अचानक क्रीडा मंडळ यांचे ही योगदान भिक्षा फेरीला लाभले होते... 

संतोषजी ठाकूर यांनी देणगीदार नागरिकांचे आभार मानले. कोकण कट्टाच्या माध्यमातून साई आधार भाताणे येथे २००० किलो तर कुडाळ येथील जीवन आनंद संस्थेला १२५ किलो तर बोरिवली येथील टच संस्थेला ५०० किलो धान्य देण्यात आले आहे. सह्याद्री संस्था देवबांध यांना ५०० किलो धान्य देण्यात येईल. कोकण कट्टा संस्थापक अजितदादानीं या सेवेत सहभागी सर्व सदस्य आणि नागरिक यांचे मनापासुन आभार मानले व प्रतीवर्षी अशीच मदत करत करावी असें नम्र आवाहन केले.

No comments:

Post a Comment

मुलींना कोणीही त्रास देत असल्यास भीती न बाळगता पोलिसांची मदत घ्यावी - पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांचे आवाहन

मुलींना कोणीही त्रास देत असल्यास भीती न बाळगता पोलिसांची मदत घ्यावी - पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांचे आवाहन लैंगिक शोषण ...