Sunday, 28 June 2026

वालधुनी नदी पुनर्जीवनासाठी नगरसेविका सौ. माया कांबळे यांचा पाहणी दौरा !!

वालधुनी नदी पुनर्जीवनासाठी नगरसेविका सौ. माया कांबळे यांचा पाहणी दौरा !!

वालधुनी नदी स्वच्छता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील सिताराम उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेविका मा. सौ. माया कांबळे यांनी वालधुनी नदी परिसराचा पाहणी व पाणी दौरा केला. या दौऱ्यात नदीच्या विविध पाच ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून नदीच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.

नदीतील वाढलेले प्रदूषण, साचलेला गाळ, दुर्गंधी आणि नदीची झालेली दयनीय अवस्था पाहून सौ. माया कांबळे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. "कल्याण हे एक सुंदर शहर असून शहरातील नदीची अशी अवस्था असणे दुर्दैवी आहे. आपण सर्वांनी मिळून ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारली पाहिजे. नदी ही आपली आई आहे आणि तिचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे," असे त्या म्हणाल्या.

वालधुनी नदीच्या पुनर्जीवनासाठी संबंधित वरिष्ठ अधिकारी व प्रशासनाशी चर्चा करून येणाऱ्या सभागृहात हा विषय लक्षवेधी स्वरूपात मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात संस्थेचे प्रमुख सदस्य श्री. अनिल गायकवाड, श्रीमती सुनीता खेताडे, श्री. अनिल सरदार, श्री. किरण म्हात्रे, श्री. दिलीप दादा गायकवाड तसेच संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुधीर उदयकर यांनी नदीची सद्यस्थिती, प्रदूषणाची  आणि पुनर्जीवनासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती देऊन प्रशासनाने लवकरात लवकर काम सुरू करण्याची विनंती केली.

दौऱ्याच्या शेवटी सौ. माया कांबळे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि पाहणी दौऱ्याची सांगता झाली.

1 comment:

  1. वालधुनी नदी प्राधिकरण बनविण्यात आले होते. त्या नुसार केमिकल युक्त पाणी वाहून जाण्या साठी वेगळी पाईप लाइन टाकण्याचे काम सुरू झाले होते पण ते काम मध्येच बंद पडले.

    ReplyDelete

कल्याण तालुका पोलीस ठाण्यातंर्गत साडेचार हजार घरगुती व शंभरच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव, विसर्जन घाटांची 'बिकट, अवस्था ?

कल्याण तालुका पोलीस ठाण्यातंर्गत साडेचार हजार घरगुती व शंभरच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव, विसर्जन घाटांची 'बिकट, अवस्था ? क...