Saturday, 6 December 2025

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दादर जुना फुल बाजार व दादर कट फ्लावर्स असोसिएशनतर्फे चैत्यभूमीकडे येणाऱ्या- जाणाऱ्या अनुयायांना अल्पोहार वाटप करण्यात आले. गेली तब्बल १२ वर्षे सुरू असलेल्या या उपक्रमात यंदा सुमारे ५ हजार वडापाव वाटप करण्यात आले. 

यावर्षी प्रथमच केशवसुत उड्डाणपुलाखाली फुल-हार विक्री करणाऱ्या महिलांकडून पाणी वाटपाचीही व्यवस्था करण्यात आली. अनुयायांच्या सोयीसाठी केलेल्या या सेवाकार्यात स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. 

या उपक्रमाचे मुख्य आयोजक सोपान शेठ दुराफे, अभिजित दुर्वे, विनोद केदार, गजानन गावडे, गणेश मोकल, दीपेन सयानी यांच्यासह असोसिएशनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त समाजसेवेचे व मानवी मूल्यांचे दर्शन घडविणारा हा उपक्रम अनुकरणीय ठरला.

केंद्रीय लोक निर्माण विभागातील सेवानिवृत्त कर्मचा-यांचे पहिले स्नेहसंमेलन संपन्न !!

केंद्रीय लोक निर्माण विभागातील सेवानिवृत्त कर्मचा-यांचे पहिले स्नेहसंमेलन संपन्न !!

मुंबई (शांताराम गुडेकर)

केंद्रीय लोक निर्माण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी - कर्मचा-यांचे पहिला स्नेहमेळावा, ठाणे पश्चिम, येथील क्लब  हाऊस, दोस्ती विहार, फोखरण रोड नं 1 येथे मोठ्या उत्साहात  संपन्न झाला. 

अरविंद आगाशे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गोवा, मुंबई, पालघर, पुणे, विरार, आदी विभागातून अनेक सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चित्रपट अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचे वडील -ए. व्ही बेंद्रे हे वयाच्या ९१ वर्षी उपस्थित होते त्यांचे कौतुक व सन्मान करण्यात आला. तसेच वय वर्षे ८१ पूर्ण केलेल्या - डी. बी वाघमारे, एस. एस  नातू,  नारायण पितांबरम, हेमन खिलनानी, बी. डी. माणगांवकर व आर. डी. उपाध्याय यांचाही सत्कार करण्यात आला. उपस्थित सेवानिवृत्त कर्मचा-यांनी अभंग, चित्रपट गीते, लावणी, नृत्ये सादर करून फारच मनोरंजन करून धमाल केली. 

प्रस्तावना  - सोनाली भांगले, माधुरी सारंगपाणी व दीपक खोत यांनी सूत्रसंचालन व आभार अरविंद आगाशे यांनी मानले.

Thursday, 4 December 2025

'व्हाईस ऑफ मिडिया’चा कोकण मुंबई अध्यक्ष, पत्रकार अरुण ठोंबरे व भुजंगराव सोनकांबळे यांना अटक !!

 'व्हाईस ऑफ मिडिया’चा कोकण मुंबई अध्यक्ष, पत्रकार अरुण ठोंबरे व भुजंगराव सोनकांबळे यांना अटक !!
 
कापूरबावडी पोलिस स्टेशन, ठाणे यांची कारवाई 

ठाणे : कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात ‘व्हाईस ऑफ मिडिया’ या पत्रकार संघटनेचे कोकण-मुंबई अध्यक्ष अरुण सदाशिव ठोंबरे तसेच भुजंगराव नागराव सोनकांबळे यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ०४ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली असून, आरोपींच्या नातेवाईक व मित्रांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम ४८ अंतर्गत अधिकृत सूचना बजावण्यात आल्या आहेत.

कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक ८६४/२०२५ अंतर्गत आरोपींविरोधात बीएनएस २०२३ चे कलम ३०८(५), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिला आरोपी अरुण सदाशिव ठोंबरे (वय ५८, रा. चिखोली, अंबरनाथ पश्चिम) हा ‘व्हाईस ऑफ मिडिया’ संघटनेचा कोकण-मुंबई विभागाचा अध्यक्ष असून, त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेची माहिती देण्यासाठी त्याचा मित्र सुरेश बजरंग जगताप (वय ५२, व्यवसाय – पत्रकार, रा. उल्हासनगर) यांना अधिकृत सूचना बजावण्यात आली आहे. ठोंबरे यांना पुढील कारवाईसाठी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, न्यायालय क्रमांक २, ठाणे येथे हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीच्या वतीने वकील नेमून जामीन प्रक्रियेसाठी कार्यवाही करण्यात यावी, असेही सूचनेत नमूद करण्यात आले आहे.

याच गुन्ह्यातील दुसरा आरोपी भुजंगराव नागराव सोनकांबळे (वय ३७, रा. वर्तकनगर, ठाणे पश्चिम) यालाही अटक करण्यात आली असून, त्याची बहीण उषा मनोज जाधव (वय ३५, रा. मनोरमा नगर, ठाणे पश्चिम) यांना देखील अधिकृत सूचना देण्यात आली आहे. त्यालाही लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार असून, जामीन प्रक्रियेसाठी वकील नेमण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, आरोपी अरुण ठोंबरे यांच्याविरोधात यापूर्वीही म.फु.चौ. पोलीस ठाणे, कल्याण येथे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी गुन्हा क्रमांक ११६१/२०२४ अंतर्गत भा.न्या.सं. कलम ३५६(१), ३५६(२), ३५६(३) तसेच ॲट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात त्यांचा सहकारी मित्र सुरेश जगताप हाही आरोपी आहे.

ही संपूर्ण कारवाई कापूरबावडी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, पुढील तपास सुरू आहे. या अटक कारवाईमुळे ठाणे शहर आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मानवता आभियान संस्थे मार्फत दिव्यांग दिन साजरा !!

मानवता आभियान संस्थे मार्फत दिव्यांग दिन साजरा !!

दिनांक - ३ डिसेंबर,२०२५ रोजी उल्हासनगर कॅम्प ४ येथे मानवता अभियान संस्थे मार्फत आंतराष्ट्रीय दिव्यांग दिवस साजरा कारण्यात आला. या वेळी संस्थेच्या संचालक निवेदिता जाधव यांनी दिव्यांग दिनाचे महत्व सांगत माहिती दिली व प्रा. विकास जाधव यांनी दिव्यांग व्यक्तींच्या सन्माना बद्दल व अधिकार या जागृती वर मार्गदर्शन केले त्याच बरोबर  सामान्य व्यक्ती ची दिव्यांगा प्रती कर्तव्य या बद्दल ची माहिती दिली. 

यावेळी भारतीय मानवधिकार परिषद उल्हासनगर शहर चे अध्यक्ष अभिजीत भाऊसाहेब चंदनशिव व दिव्यांग संघटनेचे राजेश साळवे व बहुजन समाज पक्षाचे प्रमोद गायकवाड, प्रफुल्लता मोहोड, ब्ल्यू रिव्हॉलुशन चे श्याम चंदनशिव उपास्थित होते. तसेच परिसरातील सर्व दिव्यांग बांधव या कार्यक्रमास उपस्थित होते. सर्व उपस्थिताना संविधान प्रस्तावने ची प्रत देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. राजेश साळवे यांनी आभार व्यक्त केले.

Wednesday, 3 December 2025

कलारंग प्रॉडक्शन्स प्रस्तुत व कोकणी निखिल निर्मित आणि जनहित आधार हेल्प फंड आयोजित दोन अंकी कॉमेडी नाटक "गाव गोंधळ..." शनिवारी दादरला !!

कलारंग प्रॉडक्शन्स प्रस्तुत व कोकणी निखिल निर्मित आणि जनहित आधार हेल्प फंड आयोजित दोन अंकी कॉमेडी नाटक "गाव गोंधळ..." शनिवारी दादरला !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :

           मुंबई ही मायानगरी मानली जाते. येते हवशे- नवशे येतात आणि आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात. तसाच प्रयत्न आपले पंजोबा,आजोबा मग वडील जसे मुंबईत पुर्वी एकत्रीत मिळून खोली घ्यायचे आणि मग त्यात सोबत रहायचे. एकमेकांना सुख-दुःखात आधार असायचा, आता तर महागाई आणि आजारपण येवढे भरमसाठ वाढले आहेत त्याला सिमा उरलीच नाही यात आपला बांधव, सहकारी भरडला जात असेल, त्याला मुंबईत वास्तव्य करण्यासाठी रहाण्याची सोय नसेल त्याला येणाऱ्या अडीअडचणीला अपेक्षित तात्काळ आर्थिक सहाय्य उपलब्ध होत नसेल तर त्याचा उदरनिर्वाह धकाधकीच्या जीवनात चालणार कसा, हाच मुळ गाभा लक्षात घेऊन दिनांक - १२ नोव्हेंबर २०१७ या वर्षी या जनहित आधार हेल्प फंड ची स्थापना करण्यात आली.
         स्वप्न पहावित पण ती पुर्ण होतीलच असे नाहीत परंतु जनहित आधार हेल्प फंड याला अपवाद ठरला. त्यांनी स्वप्न पाहिले आणि ते साकार करण्यासाठी जिद्द धरली होती ती मुंबईत स्वत:च्या मालकी हक्काची एखादी खोली असावी आणि ते स्वप्न सत्यात उतरविले. विक्रोळी सुर्यनगर येथे जनहित आधार हेल्प फंड यांनी स्वतःच्या मालकीची खोली घेऊन पाहिलेले स्वप्न पुर्ण केले.
          आजारपण कोणालाही सांगून येत नाही,जनहित आधार हेल्प फंड हा अनेक रूग्णांसाठी आर्थिक सहकार्यारूपी नवसंजीवनी बनुन काम करत आहे. आज तागायत यांनी १०,०००/-  ते ५०,०००/- एवढी मोठी रक्कम एक हाती रुग्णांना देऊन त्याचा परतावा ही कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त दर न लावता घेतला आहे.
           मराठी शाळा वाचायला हव्यात असे प्रत्येकाला मनापासून वाटतं, परंतु त्या वाचण्यासाठी आपण खारीचा वाटा म्हणून सहभागी किती होतो यावर अवलंबून असते. असाच खारीचा वाटा उचलला तो जनहित आधार हेल्प फंड यांनी शाळेतील मुलांना गर्मी आणि अंधुक प्रकाश ही वारंवार भेडसावणारी समस्या आवश्यक विद्युत उपकरणे देऊन दूर केली. त्यामध्ये एल ई डी ट्युब लाईट आणि पंखे व इतर साहित्य जि. प. पुर्ण प्राथमिक शाळा, वाकी. ता. गुहागर, जि. रत्नागिरी. या शाळेतील शिक्षकांना स्वतंत्र दिनानिमित्ताने सुपुर्द केले.तसेच प्रति वर्षी शाळेतील मुलांना १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला खाऊ वाटप करताना या हेल्प फंडातील सभासद स्वतः शाळेत हजर असतात.
           कोरोना सारख्या महाभयंकर महामारी आधी सुरू असलेल्या अनेक छोट्या मोठ्या संस्था, फंड, बीसी यांसारखे आर्थिक सहकार्य करणारे मार्ग कोरोना काळात लोप जरी पावले असले तरी जनहित आधार हेल्प फंड हि संस्था कोणत्याही परिस्थितीत डगमगली नाही. यातील सर्व सभासदांनी सुरूवातीच्या काळात स्वतःच्या खिशाला कात्री लावली मात्र यश खेचून आणलेच. 

         अशी ही जनहित आधार हेल्प फंड संस्था सामाजिक व शैक्षणिक बाजू सांभाळत असताना आता मात्र सांस्कृतिक सहभाग घेण्यासाठी सज्ज होत आहे.शनिवार दिनांक - ०६ डिसेंबर २०२५ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर नाट्यगृह, दादर येथे सामाजिक आणि शैक्षणिक मदतीकरीता कलारंग प्रॉडक्शन्स प्रस्तुत व कोकणी निखिल निर्मित आणि जनहित आधार हेल्प फंड आयोजित दोन अंकी कॉमेडी नाटक "गाव गोंधळ..." या नाटकाचे आयोजन केले आहे.रसिक हो आपण हे नाटक पहाण्यासाठी आणि सामाजिक व शैक्षणिक मदतीकरीता तिकीट घेऊन नाटकाचा आनंद घ्यावा असे आवाहन जनहित आधार हेल्प फंड तर्फे करण्यात आले आहे.

“बहिणाबाईंच्या कवितांनी आणि घोषणांनी दुमदुमले उद्यान – बहिणाबाईं चौधरींच्या स्मृतिदिनाला मोठी उपस्थिती‌ !!


“बहिणाबाईंच्या कवितांनी आणि घोषणांनी दुमदुमले उद्यान – बहिणाबाईं चौधरींच्या स्मृतिदिनाला मोठी उपस्थिती‌ !!

डोंबिवली, प्रतिनिधी : डोंबिवली पूर्व, सुनील नगर येथील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मालकीच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानात आज बुधवार, दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी कवयित्री बहिणाबाई नथुजी चौधरी यांचा ७५ वा स्मृतिदिन कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून उद्यानात व्यायामसाठी नियमित येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक सरोजिनीताई पाटील यांच्या शुभहस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीचे सदस्य श्री कृष्णा मारुती सोमार्डे सर यांनी केले. याप्रसंगी उपस्थितांनी “कवयित्री बहिणाबाई चौधरी अमर रहें!”,

“बहिणाबाईंची लेखणी – महाराष्ट्राची शान!”
“ग्रामीण संस्कृतीची अभिमान, कवयित्री बहिणाबाई महान!” 
या घोषणांनी उद्यानाचा परिसर दुमदूवून टाकला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी बहिणाबाईंचा स्मृतिदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

सदर उद्यानात दररोज सकाळी ते संध्याकाळपर्यंत परिसरातील शेकडो ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष तसेच लहान मुले व्यायाम, चालणे व खेळण्यासाठी येत असतात. नियमित व्यायाम करणाऱ्या नागरिकांनी एकत्र येऊन "कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समिती" हा व्हाट्सअप समूह तयार केला असून समितीच्या वतीने बहिणाबाईंचा जन्मदिन, स्मृतिदिन तसेच काही मोजके सण लोकवर्गणीतून साजरे केले जातात.

या स्मृतिदिनानिमित्त आज सकाळी आयोजित अभिवादन कार्यक्रमासाठी हास्य कवियत्री व डोंबिवलीकर रहिवासी माननीय सौ. लताताई पाटील यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी बहिणाबाईंच्या जीवनातील काही संस्मरणीय प्रसंग कथन केले तसेच अनेक लोकप्रिय कविता सादर करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

सदर कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीमधील महिला वर्गाच्या वतीने लताताई पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तर सदरचे उद्याना मधील पडणारा प्लास्टिकचा कचरा नित्य नियमाने उचलणारे श्री केशव करकेरा यांचा समितीचे सदस्य श्री कोटियन (दिव्यांग बांधव) यांच्या शुभहस्ते जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उद्यानामधील सर्वात ज्येष्ठ असलेल्या सरोजिनीताई पाटील यांचा देखील बहिणाबाई उद्यान व्यायाम समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

अभिवादन कार्यक्रमाचे सुव्यवस्थित सूत्रसंचालन माजी नगरसेवक व सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाचे श्री. प्रकाश माने यांनी केले.

या कार्यक्रमाला प्रदीप पवार, विक्रम म्हात्रे, शरदचंद्र जोशी, हेमंत बारस्कर, सार्थक चव्हाण, सौ. प्रतिक्षा माने, सौ. यशोदा करकेरा, केशव करकेरा, सुरेश भुवड, श्रीकांत काळे, शशिकला महानूर, आनंदा नेने, टी आर कुंभार, किशोर वाणी, डी बी चिरमडे, अल्फेंसा सिग्युरा, सत्यविजय साईल, हेमंत म्हापणकर, चिंतामण भडसावळे, बाबू वारके, संदीप देवकर, रघुनाथ राणे, फुलचंद माळी, संदीप शेट्टी, संगम भुजबळ, सार्थक चव्हाण, प्रमोद शेट्ये, यशोदा करकेरा,  केशव करकेरा, दीपक पाटील, प्रसाद सावंत, भगवान सातपुते, निवृत्ती पाडवेकर, रेखा गुप्ता, शार्दुल जोशी, गिरीश कुलकर्णी, अक्षय शहा, ममता तिवारी, जितू ठक्कर, अर्चना शिरोडकर, वंदना झाडे, माधुरी कोरडे, श्रीकृष्ण वाणी, शैलेंद्र कमलाकर, सुनीती पुचेरकर, नंदा शाळीग्राम, मेघा ठोंबरे, गीता निवळकर, स्नेहा भोसले, मंदा ठाकूर, अनंत पाटील, परशुराम म्हात्रे, घनश्याम मालवी तसेच व्यायाम समितीचे साधारण १०० पेक्षा अधिक महिला व पुरुष सदस्य उत्साहाने उपस्थित होते.

सौजन्य - प्रकाश शांताराम माने (मा. नगरसेवक)

Tuesday, 2 December 2025

कोकण सुपुत्र सुशांत आगरे यांच्या कडून पॉवरलिफ्टिंगमध्ये भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई !!

कोकण सुपुत्र सुशांत आगरे यांच्या कडून पॉवरलिफ्टिंगमध्ये भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई !!

प्रतिनिधी - निलेश कोकमकर 

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुका मधील रावारी गावाचा सुपुत्र आणि भारतीय पॉवरलिफ्टिंग संघाचा कर्णधार कुमार सुशांत सोनू आगरे याने खडतर परिस्थितीवर मात करत अतुलनीय मेहनतीच्या जोरावर जगाला आपली ताकद दाखवली आणि भारतासाठी सुवर्ण पदक मिळवून देण्याचे मोलाचे काम केले आहे.

      श्रीलंका (कोलंबो) येथे २७ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान झालेल्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये १२ देशांच्या स्पर्धकांमध्ये ६९ किलो वजनी गटात तब्बल २२२ किलो वजन उचलून भारताच्या नावावर सुवर्ण पदक पटकावण्याची उत्तम कामगिरी  केली. रावारी गावाचा अभिमान. गावच्या मातीत आणि सामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्म, लांजा तालुका – रत्नागिरी जिल्हा येथील साधं आयुष्य, गावी शिक्षण पूर्ण करून मुंबईत काकांकडे राहून नोकरीसोबत पॉवरलिफ्टिंग मध्ये सातत्य ठेऊन , मेहनत आणि जिद्दीने सहभाग घेत आणि त्या मेहनतीचं फळ आज जागतिक पातळीवर सुवर्ण यशात रूपांतर. तसेच हे यश मेहनत, शिस्त, जिद्द आणि असामान्य क्षमतेचे प्रतीक आहे. 

        कुणबी पाऊल पडते पुढे आणि तू प्रेरणा आहेस नव्या पिढीची आणि  हा सुवर्ण क्षण संपूर्ण कुणबी समाजासाठी, महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी अभिमानाचा आहे. अशा प्रकारे कु. सुशांत सोनू आगरे यांच्यावर अनेक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा येत आहे.

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...