Sunday, 20 July 2025

मुलींना कोणीही त्रास देत असल्यास भीती न बाळगता पोलिसांची मदत घ्यावी - पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांचे आवाहन

मुलींना कोणीही त्रास देत असल्यास भीती न बाळगता पोलिसांची मदत घ्यावी - पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांचे आवाहन

लैंगिक शोषण असो की अन्य कोणीही त्रास देत असल्यास मुली व महिलांनी कोणतीही भीती न बाळगता पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन वाडा पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवसानिमित्त "जनविश्वास सप्ताह" साजरा करण्यात येत असून या अंतर्गत पालघर जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रोहिणीताई शेलार यांच्यावतीने वाडा तालुक्यातील परळी आश्रमशाळा येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर व वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना दत्तात्रेय किंद्रे यांनी महिला कायदे व सायबर क्राईम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने परळी येथे वृक्षारोपण उपक्रमही राबविण्यात आला.

यावेळी महिला राष्ट्रवादीच्या उपजिल्हाध्यक्षा चित्रा ताई पाटील, वाडा तालुका सचिव रंजनाताई भागडे, परळी गावच्या सरपंच सौ. वैशालीताई पवार तसेच पंचायत समिती माजी सभापती रघुनाथ माली, पोलीस पाटील बबन पाटील, परळी माजी उपसरपंच रुपेश दत्तू पाटील, परळी आश्रम शाळेतील सर्व महिला शिक्षिका व शिक्षक वर्ग सर्व उपस्थित होते.

वृत्तांत - जयेश शेलार 
जेष्ठ पत्रकार / संपादक/ वाडा तालुका अध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस)

मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांची “वीर तानाजी मालुसरे”पुरस्कारासाठी निवड !!

मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांची “वीर तानाजी मालुसरे”पुरस्कारासाठी निवड !!

मुंबई, (पी. डी. पाटील) : 'श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल) ही संस्था छत्रपती शिवाजी महाराजांचे सिद्धांत ठेऊन सामाजिक कार्य करणाऱ्यांचा सत्कार करते. संस्थेच्या वतीने २०२५ सालासाठी देण्यात येणाऱ्या वीर तानाजी मालुसरे पुरस्कारासाठी मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे साहेब यांची निवड केली आहे. या पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह, शाल, श्रीफळ व रु. ११,००१/- (अकरा हजार एक रोख) असे आहे.
      संस्थेच्या वतीने यापूर्वी श्री. संभाजी राजे छत्रपती, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे, प्रो. मोहन आपटे, श्री. पांडुरंग बलकवडे, श्री. प्रमोद मांडे, श्री. पी. आर. मुंडले, प्रा. पी. के. घाणेकर, डॉ. जयसिंगराव पवार, श्री. सुनील पवार व डॉ. सुचित्रा ताजणे यांना पुरस्काराने तर महावीरचक्र प्राप्त कॅप्टन मोहन ना. सामंत, शौर्य चक्र व सेना मेडल प्राप्त भा. नौ. निवृत्त ले. कर्नल तुषार जोशी, निवृत्त लेफ्ट. कर्नल एस. एस. हेरवाडकर, निवृत्त मेजर अनिल माटवणकर, निवृत कॅप्टन प्रफुल तावडे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविले आहे.
     छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि विचार यांचा अभ्यास करण्यासाठी 'श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल)' ची स्थापना डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी केली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला जागतिक स्थान मिळवून देणे हे 'श्री शिवाजी ज्ञानपीठ (इंटरनॅशनल)' चे मुख्य उ‌द्दिष्ठ आहे.याच उ‌द्देशाने डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी 'शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट' हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जगातील १० महान योद्ध्यांशी केली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे या सर्व योद्ध्यांपेक्षा कसे श्रेष्ठ आहेत हे सिद्ध केले आहे. या पुस्तकाला ग्रंथालय भारतीचा पुरस्कार परमपुज्य मोहनजी भागवत यांच्या हस्ते मिळाला आहे.
    श्रीमती. प्रतिभाताई पाटील (माजी राष्ट्रपती), श्री. मोहन भागवत, श्री. उदयनराजे भोसले, श्री. अशोक चव्हाण, श्री. अण्णा हजारे, श्री. मनोहर जोशी, श्री. पृथ्वीराज चव्हाण, श्री. राज ठाकरे, श्रीमती. वर्षा गायकवाड यांनी पुस्तकाला शाबासकीची थाप दिली आहे.या पुस्तकावर आधारीत 'शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट' या मराठी डॉक्युमेंटरी फिल्मची निर्मिती केली आहे. तसेच हि फिल्म इंग्रजी, हिंदी, कन्नड, संस्कृत आणि बंगाली मध्ये भाषांतरित केली आहे.मा. रवींद्र मालुसरे यांना हा पुरस्कार दादर येथील श्री शिवाजी मंदिर येथे दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी दु. ३:०० ते सायं. ६:०० या वेळेत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
   या पुरस्कार निवडी बद्दल संघाचे सर्व पदाधिकारी, वृत्तपत्र लेखक, पत्रकार, मित्र मंडळी व नातलग ,परिवार यांच्याकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

गावच्या परंपरेचं वैभव ; फौजी आंबवडे गावचा "पालवी जत्रोत्सव" विक्रोळी येथे उत्साहात साजरा !!

गावच्या परंपरेचं वैभव ; फौजी आंबवडे गावचा "पालवी जत्रोत्सव" विक्रोळी येथे उत्साहात साजरा !!

मुंबई (पी. डी. पाटील): फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळ, मुंबई मंडळाने दरवर्षी प्रमाणे पालवी जत्रोत्सव दि.१३ जुलै २०१५ रोजी विजय बँकेट हॉल, विक्रोळी (पू) मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळ मुंबई आपल्या ग्रामदेवताची राखण देण्यासाठी दरवर्षी पालवी जत्रा आयोजित करते. ग्राम देवतांचे सर्व कुळाचार पार पाडण्या बरोबर समस्त गावकरी एकत्र येऊन परस्पर स्नेह आणि सामाजिक जाणीव वाढविण्यासाठी एकत्र येतात. यावेळी पालवी जत्रोत्सव कार्यक्रमात 'ऑपरेशन सिंदूर मोहिमेत सहभागी झालेल्या गावच्या सुपुत्रांचा तसेच गावच्या आजी-माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच गावातील १०वी, १२ वी व पदवीधर विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित करून त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. गावचे समाजसेवक सुभाष पवार यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबदल आमदार संजय केळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

       याप्रसंगी सैनिक संघटनेतर्फे आमदार संजय केळकर यांना फौजी आंबवडे-संघटनेतर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सा पोलादपूर टाईम्स आणि मराठी वृत्तपत्र लेखक -संघ, मुंबई चे अध्यक्ष रविंद्र मालुसरे यांचा मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . गावचे उद्योजक निवृत्ती डोंगे व वामिका मसाल्याचे पार्टनर राजेंद्र पवार यांचा मंडळाचे सचिव जयदीप पवार यांनी सत्कार केला. यावेळी महिलांसाठी संगीत खुर्ची व पैठणीचा खेळ आयोजित करण्यात आला होता. महिलांच्या उस्फुर्त सह‌भागाने जत्रोत्सवाला उत्साह आणि आनंदी वातावरण आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय पवार यांनी करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे माजी अध्यक्ष नितीन पवार, चंद्रकांत पवार, महेंद्र पवार, प्रमोद पवार, सुशिल पवार, विश्वास पवार रघुनाथ आयरे, मंडळाचे सभासद, सल्लागार, वर्गणीदार यांनी मोलाची कामगिरी केली.

मुरबाड मध्ये शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ता मेळावा संपन्न !!

मुरबाड मध्ये शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ता मेळावा संपन्न !!

**आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागा - शिवसेना नेते -प्रकाश पाटील

मुरबाड, (मंगल डोंगरे) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागा, असा आदेश शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रकाश पाटील यांनी मुरबाड तालुक्यातील सरळगाव कावेरी हाॅल येथील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, आणि युवती सेना, आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना सांगितले.आगामी निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटना बांधणी करताना,प्रथमतः सभासद नोंदणी वर जोर दिला पाहिजे. आपण ज्या गावात -शहरात राहतो त्या ठिकाणी आपल्या कामातून आपली ओळख निर्माण करा. तसेच ज्या पक्षात आपण काम करतोय, त्या पक्षनेत्रुत्वानी म्हणजेच माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी केलेल्या योजना, घराघरात पोहचवा , जनतेला जाऊन सांगा, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत जनता तुम्हाला नक्कीच सहकार्य करेल. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण लोकसभा, विधानसभा निवडणुका लढलो आणि त्या जिंकलो सुद्धा, त्याच प्रमाणे आगामी जि.प.पं.स. निवडणुका जिंकायच्या आहेत. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या झंझावाताचा आपण उपयोग करून घ्यायचा आहे.आपण शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, महिलांसाठी अनेक विकासाची कामे केली आहेत. त्या सर्वांना सोबत घेऊन काम करा. यासाठी लाडक्या बहिणींचीही ताकद पक्षाला कामी येणार आहे. तरच आगामी निवडणुकीत यश मिळविता येईल. असा मार्मिक सल्ला ही प्रकाश पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. शिवसैनिक कधीही खंत व्यक्त करत नाही.तो लढवय्या आहे. विरोधकांवर टिका टिप्पणी करण्यापेक्षा आपलं काम नीटनेटके करा, आणि स्वमेहनतीने  आपलं अस्तित्व निर्माण करा. आपल्या कर्तृत्वाचा लोकांनी सन्मान केला पाहिजे. चांगली माणसं जोडण्याचे काम करा. पक्षहितासाठी कर्तृत्ववान माणसांची निवड करा. आणी निवडणुका जिंकण्यासाठी सभासद नोंदणी वाढवा. आपण तिथेच कमी पडतो. असा ही मोलाचा सल्ला प्रकाश पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन करताना दिला. तर आगामी निवडणुकी पुर्वी तुमच्या पक्षात नव्याने येऊ इच्छिणाऱ्या दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यां बाबत तुमची काय भुमिका असेल ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय असेल. आमच्या पक्षात नव्याने येणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागतच असेल.असे त्यांनी सांगितले.    

यावेळी या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी, शिवसेना नेते प्रकाश पाटील, जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, उप जिल्हा प्रमुख सुदाम पाटील, महाराष्ट्र उपसचिव एकनाथ शेलार, जेष्ठ नगरसेवक एकनाथ भोईर, उपजिल्हा प्रमुख विलास देशमुख, संजय भानुशाली, तालुका प्रमुख कांतीलाल कंटे, सहसंपर्कप्रमुख संतोष जाधव, कल्पेश धुमाळ, आप्पा यशवंतराव, नगरसेवक नितीन तेलवणे, नगरसेवक विनोद नार्वेकर, नगरसेवक अक्षय रोठे, नगरसेविका नम्रता तेलवणे, महिला आघाडीच्या जेष्ठ कार्यकर्त्या उर्मिला ताई लाटे, सुनिता पवार, दिपा शिंदे, रामचंद्र सासे, प्रदिप घिगे, विष्णू चौधरी, निलेश चौधरी यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

रिपब्लिकन सेना उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष पदी ॲड महेंद्र निकम यांची नियुक्ती !!

रिपब्लिकन सेना उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष पदी ॲड महेंद्र निकम यांची नियुक्ती !!

रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी मा आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार रिपब्लिकन सेना उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष पदी ॲड.महेंद्र निकम यांची निवड करण्यात आली आहे, त्यांचा आंबेडकर चळवळी त नेहमी सक्रिय सहभाग असतो, त्यांना सामाजिक जाणीव असल्याने, उल्हासनगर शहर हे ठाणे जिल्ह्यातील व्यापारी केंद्र म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, मागील अनेक वर्षांपासून या शहराचा झपाट्याने विकास होत आहे. हा भाग तसा मिश्र भाषिकांचा असला तरी मोठ्या प्रमाणात झोपडपट्टयांनी आणि दाटीवाटीने वसलेल्या घरांनी गजबजलेला आहे, आंबेडकरी बालेकिल्ला असलेले काही महत्त्वाची ठिकाणं या शहरात आहेत, या बाबत ॲड महेंद्र निकम यांच्या बरोबर सविस्तर चर्चा करून पक्षनेते मा. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या इच्छेप्रमाणे पक्षबांधणी करण्याबाबत कोणी सक्षम कार्यकर्ता तूमच्या संपर्कात असल्यास माझी भेट करून द्यावी असं सांगीतलं, रिपब्लिकन सेनेत बरेच पदाधिकारी अनेक वर्षे पदं अडवून बसले आहेत, ते साधी कार्यकारिणी सदस्य नोंदणी करु शकत नाहीत, आम्ही फार जूने आहोत आम्ही आंबेडकरी घराण्याचे कट्टर निष्ठावान कार्यकर्ते आहोत, आम्ही पक्ष टिकवून ठेवला आहे, असं सांगत असतात परंतू आपल्या नेत्याच्या पक्ष संघटना वाढीसाठी  भ्रमनिरास करून ते आनंदराज आंबेडकर साहेबांचा विश्वासघातच करीत नाही का हा प्रश्न पडतो.

अशी चर्चा सुरू असताना ॲड महेंद्र निकम यांनी आणि प्रविण मिर्के यांनी उल्हासनगर शहर जिल्ह्याची पक्ष बांधणीसाठी जबाबदारी स्विकारली आणि संपूर्ण उल्हासनगर शहर महापालिका क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेऊन रिपब्लिकन सेनेची परिपूर्ण शहर कार्यकारिणी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले, या वेळी माझ्या मनात विचार आला की ॲड महेंद्र निकम यांनीच उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली पाहिजे, आणि हा विचार त्यांना बोलून दाखवला, तेव्हा ते म्हणाले आपण द्याल ती जबाबदारी स्विकारण्याची माझी तयारी आहे, मा आनंदराज आंबेडकर साहेब आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना खूप सन्मानाची वागणूक देतात, मग त्यांनाही आपल्याकडून पक्षाच्या वाढीसाठी खूप अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, त्यामुळे कमी वेळात मी उल्हासनगर शहर जिल्हा कार्यकारिणी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन दिले. 

रिपब्लिकन सेना उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष  ॲड महेंद्र निकम साहेब यांना हार्दिक शुभेच्छा !
**** आबासाहेब चासकर अध्यक्ष ठाणे जिल्हा रिपब्लिकन सेना

वृत्तांत - प्रकाश पवार, जेष्ठ पत्रकार व समाजसेवक 

गोरगरिबांच्या मशीहा, निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संस्थेचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद !!

गोरगरिबांच्या मशीहा, निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संस्थेचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद !!

**** तळागाळातील लोकांना जिजाऊ संघटना देतेय मदतीचा हात 

मुरबाड, (मंगल डोंगरे) :  **जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे** या काव्य पंक्ती प्रमाणे, संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यात ज्यांचे समाजकार्य गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय जोमाने आणि विश्वासाने  सुरू आहे. ज्यांना गोरगरिबांचा मशीहा म्हणून ओळखले जाते. ते त्यांच्या जिजाऊ या संस्थेच्या माध्यमातून हजारो गोरगरीब जनतेला कुठलीही जात धर्म न विचारता फक्त समोरच्या व्यक्तीची अडचण काय आहे. आणि ती कशी सोडवता येईल याकडेच प्राधान्याने लक्ष केंद्रित करून मदतीचा हात पुढे करतात. मग ती मदत शैक्षणिक कामासाठी असो, आजारपणासाठी असो, निलेश सांबरे आणि त्यांची जिजाऊ संघटना ही आघाडीवर असते. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची संस्था सध्या शाळा सुरू झाल्या पासून विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप करत आहे. यावर्षी हजारो विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर, चटई,असे साहित्य देत आहे. काल असाच साहित्य वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा खोपीवली येथे संपन्न झाला.त्यात जवळपास येथील 300 हून अधिक विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप करण्यात आले. 

खोपिवली गावामध्ये मोफत वह्या वाटप ,पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना एकूण 300 विद्यार्थ्यांना 665 वह्या मोफत वाटण्यात आल्या. याप्रसंगी धीरज सांबरे जिजाऊ संघटना कार्याध्यक्ष व शिवसेनेचे मुरबाड तालुका अध्यक्ष कांतीलाल कंटे, संजय भानुषाली सज्जन जमदरे, वैभव मसने, जिजाऊ मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश  धलपे, सुरज सिरोसे, गोपाल दादा  भोडिवले, बबलु शिरोसे, व ग्रामस्ध मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांचा बोनस प्राप्त शेतकऱ्यां कडून ह्रदय सत्कार !!

मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांचा बोनस प्राप्त शेतकऱ्यां कडून ह्रदय सत्कार  !!

मुरबाड, (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुक्यातील बोनस प्राप्त  शेतकऱ्यांकडून आज मुरबाडचे तहसीलदार उत्तम प्रशासक, "आदर्श प्रशासकीय अधिकारी अभिजित देशमुख" यांचा ह्रदय सत्कार तर शेतकरी संघर्ष समितीचे नेते 'लोक मित्र रमेश  हिंदुराव सर' यांचा महसूल प्रशासनास योग्य असे सहकार्य केल्याबद्दल प्रशासना कडून, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तब्बल13 वेळा धरणे आंदोलन, उपोषण, मोर्चा काढुन, पण शांततेच्या मार्गाने संघर्ष करुन प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल तहसीलदार अभिजित देशमुख यांच्या तर्फे शाल, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी शेतकरी संघर्ष समितीचे शेतकरी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना २०२०-२०२१ या वर्षातील बोनस मिळण्यासाठी समितीने अनेकदा धरणे-आंदोलने मोर्चे काढून शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केले. त्या-त्या वेळी उत्तम प्रशासक असलेले तहसीलदार श्री.अभिजित देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे, अर्ज, निवेदने यांची दखल घेऊन तातडीने वरिष्ठ पातळीवर पाठवुन, त्याचा पाठपुरावा करून ख-या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. तदनंतर दिनांक 23 जुन 2025 ला शेतकरी संघर्ष समितीने पुन्हा एकदा बोनस मिळण्यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण केले. यावेळी ही तहसीलदार महोदयांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता वरिष्ठ पातळीवर चर्चा करून शेतकरी हिताचा निर्णय घेतला.आणि आठ दिवसांच्या कालावधीत थकबाकीत असलेली बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात जमा झाली. या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाचा दुव्वा ठरलेल्या मुरबाड चे तहसीलदार अभिजित देशमुख यांच्या प्रति क्रुतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी नेते रमेश हिंदुराव सर व प्रातिनिधिक स्वरूपात तालुक्यातील शेतकरी, यावेळी उपस्थित होते.

मुलींना कोणीही त्रास देत असल्यास भीती न बाळगता पोलिसांची मदत घ्यावी - पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांचे आवाहन

मुलींना कोणीही त्रास देत असल्यास भीती न बाळगता पोलिसांची मदत घ्यावी - पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांचे आवाहन लैंगिक शोषण ...