Sunday, 7 December 2025

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्हयातील चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली हा दोन नॅशनल हायवेनां व औद्योगिक क्षेत्राला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. सदर रस्त्याचे काम मेसर्स, सुप्रिम इंफ्रास्ट्रक्चर या कंपनी मार्फत बी.ओ.टी. तत्वावर करण्यात आले आहे, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोल खड्डे पडल्याने रस्ता वाहतुकीस योग्य नसल्यामुळे नागरीक, विदयार्थी तसेच, आजारी वयोवृद्ध्द व्यक्ती यांना अतिशय त्रास होता आहे. तसेच वाहनांचे अपघात होवुन लोक मृत्युमुखी पडले असून, जिव घेणे अपघात ही झाले आहेत. या रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात येथील एक सामाजिक कार्यकर्ते विनोद दत्ताराम वैती हे सन २०१७ सालापासून सतत आंदोलने करत आहेत पण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्यांची दिशाभूल करणारी उत्तरे देत असून, या रस्त्यावर साधारणपणे ३ वर्षीत १३ कोटी २७ लाख ३३ हजार रुपयांचा खर्च केलेला असून, रस्त्याची दुरावस्था मात्र कायम आहे. केलेला खर्च हा बोगसकामे केल्याचे दाखवुन लाखो रुपयांची शासनाची फसवणुक लुट केलेली आहे. सदर रस्त्यावर सुप्रिम कंपनी मार्फत टोल वसुली असताना सा.बा. विभागा मार्फत मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. या रस्त्यातील कामात झालेला हलगर्जीपणा व संगनमताने झालेल्या भ्रष्ट कामासंदर्भात दोन वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते विनोद दत्ताराम वैती यांनी भिवंडी उपविभागीय कार्यालय येथे उपोषण केले होते पण निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई न करता आजही रस्त्याची तीच परिस्थिती आहे व नागरिकांचा त्रास तसाच आहे.


तसेच या भिवंडी सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथे सार्वजनिक बांधकाम विभागातील एक वादग्रस्त अधिकारी श्री. गिते उपअभियंता म्हणून उपविभागात कार्यरत झाल्यापासून त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची त्यांनी काढलेल्या बिलांची अंदाज पत्रके, एम.बी., विले, टेस्ट रिपोर्ट, डाबर, रॉयल्टी चलनाच्या पावत्या केलेली कामे आस्तित्वात आहेत काय? सदरची कामे झाली होती काय? या मुद्दयांच्या आधारे उच्च स्तरीय (स्वतंत्र चौकशी अधिकारी) नेमून पण यातून (अधिक्षक अभियंता, दक्षता व गुण नियत्रण मंडळ) यांना वगळून चौकशी करण्यात यावी पण लगेच तात्काळ खड्डे भरावेत तसेच, सदरचे खड्डे भरताना मागिल खड्डे भरण्याचे टेंडर दिलेल्या ठेकेदारा कढुन त्वरीत भरुन रस्ता पुर्ववत करावा अन्यथा आम्हाला या रस्त्यावर नागरिक, प्रवाशी, लोकप्रतिनिधी, विदयार्थी विविध संघटना सोबत घेवुन आंदोलन करावे लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विनोद दत्ताराम वैती यांनी दिला आहे.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला जी. के.एस. महाविद्यालयाच्या विद्यार्थीवर्ग, शिक्षक यांचे चैत्यभूमीला अभिवादन !

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला जी. के.एस. महाविद्यालयाच्या विद्यार्थीवर्ग, शिक्षक यांचे चैत्यभूमीला अभिवादन !

मुंबई (शांताराम गुडेकर) :
              मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जी.के.एस.कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खडवली येथील शिक्षिका प्रा.सौ.रसिका लोकरे  मॅडम व प्रा.श्वेता जाधव मॅडम  यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींसह दादर येथील  चैत्यभूमीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला जाऊन महाविद्यालयाच्या वतीने आदरांजली वाहिली.यावेळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा महत्वाच्या  कार्याचा थोडक्यात आढावा घेऊन विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.रितिका मोरे, कु.प्रणिता गायकवाड, कु. सपना बहादुर, कु.सुश्मिता काटे, कु.श्वेता शिंदे, कु. एकता भस्मे इ. विद्यार्थिनींनी सहभाग दर्शवला. तसेच चैत्यभूमी हे स्थळ केवळ स्मारक नाही तर समता, न्याय आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे. हल्लीच्या तरुण पिढीमध्ये सहनशीलता कमी झाल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडते. या ठिकाणी आल्यावर कधीही हार न मानता आपण सतत प्रयत्न केला पाहिजे अशी प्रेरणा येथे मिळते. तसेच  तेथे उपलब्ध  असलेल्या पुस्तकांच्या स्टॉल वर विद्यार्थिनींनी अनेक पुस्तके विकत घेतली.

नागरी संरक्षण नवीमुंबई समूह, ठाणे यांच्या वतीने आयोजित आपत्ती व्यवस्थापन मुलभूत प्रशिक्षण पाठ्यक्रम क्र. २५/२०२५ चा समारोप उत्साहात संपन्न !!!

नागरी संरक्षण नवीमुंबई समूह, ठाणे यांच्या वतीने आयोजित आपत्ती व्यवस्थापन मुलभूत प्रशिक्षण पाठ्यक्रम क्र. २५/२०२५ चा समारोप उत्साहात संपन्न !!!

मिरा रोड (ठाणे), दि. ६ : नागरी संरक्षण नवीमुंबई समूह, ठाणे अंतर्गत मा. उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांचे आदेश व मार्गदर्शनानुसार व  दि. ०१ ते ०५ डिसेंबर २०२५ या कालावधीत दुपारी १४.०० ते सायं. १८.३० या वेळेत मेगा पार्टी हॉल, दुसरा मजला, जुना पेट्रोल पंप, मिरा रोड(पूर्व), जि. ठाणे येथे आपत्ती व्यवस्थापन मुलभूत प्रशिक्षण पाठ्यक्रम क्रमांक २५/२०२५ आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणासाठी एकूण २३ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

पाठ्यक्रमाच्या पाच दिवसांत संघटनेचे महत्व, कार्यप्रणाली, सशक्तीकरण, बळकटीकरण तसेच प्रत्यक्ष आपत्ती व्यवस्थापन या विषयांवर विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. आजच्या समारोपीय दिवशी श्री. अनिल गावित (सउनि), श्री. नथवाणी (उपमुख्य क्षेत्ररक्षक, क्षेत्र-१, ठाणे व मानसेवी निदेशक) तसेच श्री. हनुमान चौधरी (मानसेवी निदेशक व विभागीय क्षेत्ररक्षक) यांनी महत्त्वपूर्ण व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमादरम्यान श्री. मुरुगन पाल, वरिष्ठ नागरी संरक्षण स्वयंसेवक यांनी प्रात्यक्षिकांना सहकार्य केले. तसेच प्रशिक्षणार्थ्यांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली.

समारोप प्रसंगी मा. विजय जाधव, उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांनी विनियम-५ नुसार यशस्वी प्रशिक्षणार्थींना संघटनेत सभासदत्वाची शपथ देत बहुमूल्य मार्गदर्शन केले. त्यांनी संघटनेचा प्रसार वाढवून सामान्य नागरिकांमधून अधिकाधिक स्वयंसेवक निर्माण करण्याचे आवाहन केले.

या पाच दिवसीय प्रशिक्षणात सउनि श्री. आननसिंग गढरी, श्रीमती दि. दौ. घरत, डॉ. राहुल घाटवळ (मास्टर ट्रेनर, विभागीय क्षेत्ररक्षक), श्रीमती शकुंतला राय (विभागीय क्षेत्ररक्षक व मानसेवी निदेशक) यांनीही व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली.

समारोप कार्यक्रमास उपमुख्य क्षेत्ररक्षक, क्षेत्र-३ (उल्हासनगर–अंबरनाथ–बदलापूर) व मानसेवी निदेशक श्री. कमलेश श्रीवास्तव, तसेच डॉ. हनी मित्तल, अब्राहम पाल आणि अनेक नागरी संरक्षण स्वयंसेवक उपस्थित होते.

नागरी संरक्षण नवीमुंबई समूह, ठाणे – आपत्ती व्यवस्थापन मुलभूत प्रशिक्षण पाठ्यक्रम क्र. २६/२०२५चा समारोप उत्साहात संपन्न !!

नागरी संरक्षण नवीमुंबई समूह, ठाणे – आपत्ती व्यवस्थापन मुलभूत प्रशिक्षण पाठ्यक्रम क्र. २६/२०२५चा समारोप उत्साहात संपन्न !!

ठाणे : दि. ७ डिसेंबर – नागरी संरक्षण नवीमुंबई समूह, ठाणे यांच्या वतीने आयोजित आपत्ती व्यवस्थापन मुलभूत प्रशिक्षण पाठ्यक्रम क्रमांक २६/२०२५ याचा समारोप आज सन्मानपूर्वक करण्यात आला. मा. उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांच्या आदेश व मान्यतेनुसार दिनांक ०२ ते ०६ डिसेंबर २०२५ या कालावधीत सकाळी ९.३० ते दु. १४.०० या वेळेत सहयोग व्यवस्थापन महाविद्यालय, ठाणे येथे हा पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एकूण ३७ प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदवला.

प्रशिक्षणादरम्यान श्री. अनिल गावित (सउनि), श्री. नथवाणी (उपमुख्य क्षेत्ररक्षक, क्षेत्र–१), श्री. कमलेश श्रीवास्तव (उपमुख्य क्षेत्ररक्षक, क्षेत्र–३), डॉ. प्रकाश ठमके (मास्टर ट्रेनर व मानसेवी निदेशक) तसेच श्री. रोहितसिंग राठोड (वि.क्षे. नागरी संरक्षण) यांनी विविध व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर करून प्रशिक्षणार्थींना आपत्ती व्यवस्थापनातील कौशल्ये कसे  आत्मसात करावे याबाबत विस्तृत माहीती दिली. अंतिम दिवशी प्रशिक्षणार्थींची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली.

पाठ्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी मा.उपनियंञक, नागरी संरक्षण यांनी वर्गावर अचानक भेट देऊन संघटनेचे महत्त्व, कामकाज पद्धती, सक्षमीकरण व संघटन बळकटीकरण या विषयांवर विशेष मार्गदर्शन केले. तर अंतिम दिवशी समारोपीय कार्यक्रमात मा. विजय जाधव, उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांनी विनियम–५ नुसार प्रशिक्षणार्थींना सभासदत्वाची शपथ देत संघटनेत सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी नागरी संरक्षणच्या कार्याचा प्रचार व प्रसार करून अधिकाधिक स्वयंसेवक घडविण्याचे आवाहनही केले.

प्रशिक्षणादरम्यान डॉ. राहुल घाटवळ (मास्टर ट्रेनर व वि.क्षे.) व श्री. रामबरण यादव (वि.क्षे. व मानसेवी निदेशक) यांनीही व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली.

समारोप समारंभास उपमुख्य क्षेत्ररक्षक (क्षेत्र–३) व मानसेवी निदेशक श्री. कमलेश श्रीवास्तव, महाविद्यालयाच्या समन्वयक सौ. स्वाती देवकर, श्रुती मॅडम तसेच NSS विद्यार्थी उपस्थित होते.

दि. ६ ते १३ डिसेंबरदरम्यान साजऱ्या होणाऱ्या संयुक्त ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त मा. महासंचालक, नागरी संरक्षण, होमगार्ड्स व अग्निशमन,नवी दिल्ली तसेच सचिव आणि गृहमंत्री, भारत सरकार यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापन, नागरी संरक्षण आणि स्वयंसेवेचा जागर, जागरूकता वाढविणारा हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.

गार्डियन हायस्कूलमध्ये 'वार्षिक संमेलनाचा सोहळा 'मोठ्या उत्साहात साजरा !

गार्डियन हायस्कूलमध्ये 'वार्षिक संमेलनाचा सोहळा 'मोठ्या उत्साहात साजरा !

मुंबई (शांताराम गुडेकर) :
विद्यार्थ्यांमधील अंगभूत सुप्त कलागुणांना वाव देता यावा तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा,या उ‌द्देशाने दि. ४ डिसेंबर २०२५ रोजी गार्डियन हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, भोपर, डोंबिवली या शाळेच्या वतीने 'वार्षिक संमेलन' सोहळा शालेय प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वार्षिक संमेलनाचा विषय होता लाईटस कॅमेरा एज्युकेशन. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या डॉ.उषावती शेट्टी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून स्वागतगिताने करण्यात आली.
              या सोहळ्यातील उल्लेखनीय गोष्ट म्हणजे नृत्यामार्फत नैतिक मूल्ये, कठोर परिश्रम, शिक्षणाविषयी ओढ, हरवलेले बालपण, मस्ती, सकारात्मकता, आशा आकांक्षा आत्मविश्वास यांची सांगड घालत शाळेतील आठवणींना उजाळा दिला. इयत्ता पाचवी ते इयत्ता नववी पर्यंतच्या विद्यार्थी वि‌द्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने, मनाला प्रफुल्लीत करणाऱ्या नृत्यांचे सादरीकरण केले.
              कार्यक्रमाला गार्डियन शैक्षणिक संस्थेचे ट्रस्टी अॅडव्होकेट सुसाना वर्गीस, तसेच गार्डियन शैक्षणिक संस्थेच्या संचालिका सन्माननीय सौ. शालिया थॉमस, सन्माननीय सौ. अॅनी वर्गीस, गार्डियन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी. डॉ. शोभना नायर, विशेष निमंत्रित म्हणून सौ. मिनी अब्राहीम, कुमार अॅजिकल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी वर्ग, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. उपस्थित पालक आणि सर्व विद्यार्थ्यांनी या सोहळ्याचा आस्वाद घेतला. अशा प्रकारे कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाला.

Saturday, 6 December 2025

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!
मुंबई प्रतिनिधी : ता.६ — दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता, जोगळेकरवाडी, सायन (पूर्व), मुंबई येथे संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल सायन (पु.) यांच्या संयुक्त शाळेय समितीची सभा संस्थेचे पदाधिकारी, मान्यवर व शिक्षकवर्ग यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली.

सभेचे अध्यक्षस्थान माननीय बी. डी. काळे सर यांनी स्वीकारले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय जाधव सर तसेच बी.एन.एन. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशिकांत माळुंजकर सर उपस्थित होते. प्रतिमापूजन करून सभेची सुरुवात करण्यात आली. दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक श्री. भीमराव परदेशी सर व श्री. विश्वनाथ राऊत सर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यानंतर राऊत सरांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून सदर इतिवृत्त मंजूर करण्यात आले. त्यानंतर नवीन ठराव सभेपुढे मांडून त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले व त्यांच्या अंमलबजावणीसंबंधी अध्यक्षांकडून आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.

मासूम संस्थेकडून सातत्याने दोन्ही रात्र शाळांना मदत करणारे प्रोजेक्ट मॅनेजर श्री योगेश यादव सर, यांचा संस्थेचे कार्याध्यक्ष यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच श्रीमती अनुराधा बिंगी मॅडम यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आला. माजी विद्यार्थी जितेंद्र कांबळे गुरुजी हे रात्रशाळेसाठी सातत्याने योगदान देत असल्याबद्दल त्यांचेही पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. 

या प्रसंगी माननीय बी. डी. काळे सरांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी या विशाल संस्थेत आज ३५ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व १००० हून अधिक शिक्षक अध्यापनाचे कार्य करीत आहेत. अशा मोठ्या संस्थेच्या रात्र शाळांमध्ये शिकणे ही तुमच्या भाग्याची बाब आहे. आमच्या दोन्ही रात्रशाळा मासूम संस्थेच्या रोल मॉडेलमध्ये पहिल्या दहा क्रमांकात आहेत. तसेच शाळांचा एसएससी निकाल उच्च प्रतीचा लागत असून यापुढे विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाबरोबरच गुणवत्तेतही प्रगती करावी.”
या आश्वासक शब्दांना प्रतिसाद देत दोन्ही शाळांचे मुख्याध्यापकांनी उच्च गुणवत्तेसह शंभर टक्के निकालासाठी पूर्ण प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. संस्थेच्या मान्यवरांकडून दोन्ही शाळांना व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

या सभेस शारदा नाईट हायस्कूलचे प्राचार्य श्री सोनवणे सर, श्री बागुल सर व शिक्षकवर्ग, ज्ञानविकास नाईट हायस्कूलचे श्री पुंडलिक सूर्यवंशी सर, मासूम संस्थेचे शिक्षक तसेच संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूलचे श्री समाधान खैरनार सर व शिक्षकेतर कर्मचारी श्री प्रमोद गीते उपस्थित होते. तसेच मासूम संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर निकिता पोल मॅडम याही उपस्थित होत्या या सर्वांचे सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

सभेचा समारोप सौहार्दपूर्ण वातावरणात झाला. शेवटी सर्वांचे आभार श्री सोनवणे सरांनी मानले.

— संयुक्त शाळेय समिती,
संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.)
व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.)

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दादर जुना फुल बाजार व दादर कट फ्लावर्स असोसिएशनतर्फे चैत्यभूमीकडे येणाऱ्या- जाणाऱ्या अनुयायांना अल्पोहार वाटप करण्यात आले. गेली तब्बल १२ वर्षे सुरू असलेल्या या उपक्रमात यंदा सुमारे ५ हजार वडापाव वाटप करण्यात आले. 

यावर्षी प्रथमच केशवसुत उड्डाणपुलाखाली फुल-हार विक्री करणाऱ्या महिलांकडून पाणी वाटपाचीही व्यवस्था करण्यात आली. अनुयायांच्या सोयीसाठी केलेल्या या सेवाकार्यात स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. 

या उपक्रमाचे मुख्य आयोजक सोपान शेठ दुराफे, अभिजित दुर्वे, विनोद केदार, गजानन गावडे, गणेश मोकल, दीपेन सयानी यांच्यासह असोसिएशनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त समाजसेवेचे व मानवी मूल्यांचे दर्शन घडविणारा हा उपक्रम अनुकरणीय ठरला.

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...