Friday, 2 July 2021

राज्यात रुग्णसंख्येचा आकडा स्थिर ! मृत्यूदर २.०१ टक्के ! "शनिवार रविवार कडक लाॅकडाऊण"

राज्यात रुग्णसंख्येचा आकडा स्थिर ! मृत्यूदर २.०१ टक्के ! 

"शनिवार रविवार कडक लाॅकडाऊण"


मुंबई : राज्यात रुग्ण वाढीचा दर कमी झाला असून मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात आज 8,385 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 8,753 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 16 हजारांच्या जवळ आली आहे. याच दरम्यान राज्यात 156 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत 60 लाख 79 हजार 352 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 58 लाख 36 हजार 352 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.01 टक्के इतके झाले आहे. कोरोनामुळे आजपर्यंत 1 लाख 22 हजार 353 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.01 टक्के एवढे आहे. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 867 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...