कल्याण, (संजय कांबळे) : तोक्ते चक्रीवादळामुळे ठाणे जिल्हात पावसाला सुरुवात झाली,यांनतर पावसाचा हुकमी जुलै महिना सुरु झाला ,त्यामुळे या सर्व घटनांचा विचार करुन बळीराजाने भातपेरणी उरकून घेतली, पंरतू यानंतर वरुणराजाने दडी मारल्याने मात्र बळीराजा पूरता हादरुन गेला आहे, अजून पाऊस लांबला तर मात्र शेतक-यावर दूबार पेरणीचे संकट येवू शकते, अशी भिती व्यक्त केली जातेय.
कोरोनाच्या सततच्या संकटामुळे शेतक-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, भाजीपाला पिकवूनही लाँकडाऊण मुळे बाजारपेठा न उपलब्ध झाल्याने शेतमाल रस्त्यावर फेकून देण्यात आला होता, आता काही प्रमाणात कोरोनाचे संकट कमी झाले आहे.त्यामुळे यंदा पिक चांगले येईल या आशेवर बळीराजा होता, ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शेतक-यांच्या मदतीसाठी सुमारे १ हजार ३४० क्विंटल भात बियाणे ५० टक्के अनुदानावर वाटप करण्यात आले यामध्ये सुवर्णा, जया म्हसोरी ,कर्जत ३,७, कोयम्टूर ५१, आदी जातींचा समावेश असून सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिक घेतले जाते, त्यामुळे जमीनीत थोडा ओलावा झाल्याने शेतक-यांनी पेरणी केली, पंरतू आता पावसाने ओड दिल्याने शेतक-यामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे,ज्या ठिकाणी सखल जमीन आहे, किवा जेथे ओल आहे तिथे कसेतरी भातरोपे उगवली आहेत ,परंतू इतर ठिकाणचे काय?दिंवसेदिवस कडक ऊन पडत असल्याने चिंतेत भरच पडत आहे, त्यामुळे कोरोनाने मारले ,पण निसर्गाने तारले असे म्हणायचे असेल तर वरुणराजाची कृपा अत्यावश्यक आहे.


No comments:
Post a Comment