Saturday, 14 August 2021

भिवंडीत धान्य व्यावसायिका कडून एक लाखांची खंडणी, महिला पत्रकारासह तिघांना अटक !

भिवंडीत धान्य व्यावसायिका कडून एक लाखांची  खंडणी, महिला पत्रकारासह तिघांना अटक !


भिवंडी, दिं.14, अरुण पाटील (कोपर) :
           भिवंडी शहरातील रकीब मतलुब खान हे विविध धान्य विक्री करणारे व्यापारी आहेत. त्यांचे गोदाम भिवंडी परिसरात असून हे गोदाम सुरू ठेवण्यासाठी या त्रिकुटाने पत्रकार असल्याची धमकी देत, १५ लाख रुपयांची मागणी व्यापारी रकीब यांच्याकडे केली होती.
        एका यूट्यूब चॅनेलची महिला पत्रकार व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून खंडणी उकळणाऱ्या दोन महिलांसह त्यांच्या एका साथीदाराला एक लाख रुपये खंडणीच्या गुन्ह्यात भिवंडी तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
         विनिता किरण लांडगे, असे अटक केलेल्या महिला पत्रकाराचे नाव असून ती नवी मुंबई परिसरात राहणारी आहे. तर तिच्यासह ह्यूमन राईट संस्थेच्या स्वयंघोषित पदाधिकारी निशा प्रदीप कुरापे (रा. नवी मुंबई) या दोघींसह भीम आर्मीची  पदाधिकारी म्हणून वावरणाऱ्या  महिला आरोपीचा साथीदार अविनाश गरुड (रा. चेंबूर, मुंबई) यालाही खंडणीप्रकरणी अटक केली आहे.
             भिवंडी शहरातील रकीब मतलुब खान हे विविध धान्य विक्री करणारे व्यापारी आहेत. त्यांचे गोदाम भिवंडी परिसरात असून हे गोदाम सुरू ठेवण्यासाठी या त्रिकुटाने पत्रकार असल्याची धमकी देत, १५ लाख रुपयांची मागणी व्यापारी रकीब यांच्याकडे केली होती. मात्र तक्रारीचा ससेमिरा उगाच मागे लागायला नको, म्हणून १५ लाख न देता तडजोड करीत ४ लाख देण्याचे आरोपी सोबत ठरवले होते.
       मात्र, जर धान्य व्यापारी रकीब मतलुब खान हा कायदेशिर मार्गाने व्यापार करत असेल तर त्याला घाबरण्याचे कारणच नव्हते, त्यामुळे एक लाख रुपये खंडणी देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. तरी संभंधित तालुका पोलिसांनी धान्य व्यापारी रकीब मतलुब खान याचा व्यवसाय हा कायदेशीर की बेकायदेशीर सुरु आहे, तसेच रेशनच्या धान्याचा काळाबाजार तर करत नाही ना? याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे जेणे करून नेमका काय प्रकार सुरु आहे हे सर्व सामान्य नागरिकांना कळू शकेल. 
        या त्रिकुटाने एक लाख रुपयाची खंडणी १ ऑगस्ट रोजी मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या सोनाळे गाव येथे स्वीकारली होती. याच दरम्यान खंडणी बहाद्दर त्रिकुटावर ७ ऑगस्ट रोजी मुंबई एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करीत खंडणी मागण्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर १० ऑगस्ट रोजी फिर्यादी रकीब मतलुब खान यांनी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात या त्रिकुटा विरोधात तक्रार दिल्याने मुंबई येथील गुन्ह्यात जामिनावर या त्रिकुटाची सुटका होताच या तिघांना भिवंडी तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
           या तिघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम 384, 385, 447, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गुरुवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती या गुन्ह्याचा तपास करणारे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

खेरशेत बेंडलवाडी तर्फे स्टार प्रवाह वाहिनीवर झळकलेल्या कु. अनन्या खेराडे हिचा सत्कार !!

खेरशेत बेंडलवाडी तर्फे स्टार प्रवाह वाहिनीवर झळकलेल्या कु. अनन्या खेराडे हिचा सत्कार !! प्रतिनिधी - निलेश कोकमकर     चिपळूण तालु...