कल्याण, प्रतिनिधी :- तलवारबाजी संघटना ठाणे जिल्हा, यांच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये कल्याणच्या पाच महिला खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करत खेलो इंडिया स्पर्धेमध्ये आपली निवड सार्थ ठरवली. दिल्ली येथे होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये निवड हे नशीब आजमावणार असून या स्पर्धेतील या संपादन करण्यासाठी जोमाने सराव करत आहेत ही स्पर्धा 25 ते 29 जुलै दरम्यान पार पडणार आहे. निवड करण्यात आलेल्या खेळाडू...मध्ये......
मानसी विलास भोईर ; हंसिका विजय सिंग ; कार्तिक विजय सिंग ; विला प्रशांत बुरघाटे ; उर्वरी रमेश मानकर या खेळाडूंचा समावेश आहे.
या खेळाडूना ठाणे तलवारबाजी संघटनेचे पदाधिकारी भूषण जाधव, विलास वाघ, महादेव क्षीरसागर, गजानन वाघ विजय सिंग अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment