Thursday, 26 January 2023

मनीष कलवानीया यांना दुसरयांदा शौर्य पदक !

मनीष कलवानीया यांना दुसरयांदा शौर्य पदक !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २६ : पाच जहाल नक्षलवाद्यांचा एन्काऊंटर मध्ये खात्मा करून एक नक्षल जिवंत पकडल्या बाबत  मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांना महामहिम राष्ट्रपती यांचेकडुन दुस-यांदा शौर्य पदक जाहिर  ….  
यासह गृहमंत्रालय भारत सरकार यांचे कडुन आंतरिक सुरक्षा पदक सुध्दा जाहिर …

मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण हे सप्टेंबर/2019 ते सप्टेंबर/2021 या दरम्यान अपर पोलीस अधीक्षक (अभियान) म्हणुन गडचिरोली येथे कार्यरत होते. 

दिनांक 29/03/2021 रोजी श्री. मनिष कलवानिया, यांचे नेतृत्वात सी-60 कमांडो पथकासह उत्तर गडचिरोलीतील खोबरामेंढा घनटाद जंगलात नक्षल विरोधी सर्च ऑपरेशन राबवित असतांना त्या परिसरात दबा धरून बसलेल्या 80 ते 90 नक्षलांनी सकाळी 05:00 वाजेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन  पथकांचे दिशेने जोरदार गोळीबार सुरू  केला. यावेळी मा. मनिष कलवानिया, यांचे सह त्यांचे सी-60 कमांडो पथकाने प्रत्युतरात नक्षलींच्या दिशेने जोरदार कारवाई फायरिंग सुरू केली. यावेळी पोलीसांचा वाढता दबाब पाहुन दुपारी 01:00 वाजेच्या सुमारास नक्षल तेथून पळुन गेले. सदर ठिकाणी सी-60 कमांडो आणि नक्षल यांची 8 ते 9 तास भीषण चकमक चालली. 

यानंतर तेथे सर्च ऑपरेशन राबवले असता तेथे पथकाला एक नक्षल यास जिवंत पकडण्यात तर 05 जहाल ठार करण्यात यश आले होते. यामध्ये नक्षली कारवाईत अग्रेसर असणारा त्यांचा कुख्यात नक्षली कंमाडर यास सुध्दा टिपण्यात पथकांला यश आले होते. या पुर्ण कारवाईत नक्षलींचा मोठया प्रमाणावर शस्त्र, दारूगोळा, बॉम्ब, स्फोटके व ईतर नक्षली साहित्य ही मिळुन आले होते.  

नक्षलीना प्रत्युत्तर देतांना मा. मनिष कलवानिया यांचे सह त्यांचे तीन सी-60 कमांडो जवान जखमी झाले होते. यावेळी स्वत: जखमी असुन सुध्दा त्यांचे जखमी जवांनाना भरीव आत्मविश्वास देत त्यांचे मनोबल यशस्वीरित्या उंचावत ठेवले होते. हे संपुर्ण ऑपरेशन अत्यंत घनदाट जंगलात जवळपास 80 किमी आतमध्ये सुरू होते. संपुर्ण ऑपरेशन तीन दिवस चालले होते.

मा. मनिष कलवानिया, यांचे सह त्यांचे सी-60 कमांडो पथकाने आपले प्राणाची बाजी लावुन नक्षल हल्ला परतावुन लावला. या साहसी आणि नक्षल चळवळीला हादरा देणा-या शौर्यपूर्ण कामगिरी बाबत पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांना देशाचे महामहिम राष्ट्रपती यांचे कडुन दुस-यांदा  “शौर्य पदक”  Gallantry Medal जाहिर करून सन्मानित करण्यात आले आहे.

तसेच गडचिरोली सारख्या नक्षल प्रभावित, व दुर्गम क्षेत्रात दोन वर्ष अतिउत्कृष्ट सेवा बजावल्यामुळे त्यांना गृहमंत्रालय, भारतसरकार यांचेकडुन “ आंतरिक सुरक्षा पदक ” सुध्दा जाहिर करण्यात आले आहे. 

यापुर्वी सुध्दा त्यांना दिनांक 18/10/2020 रोजी किसनेली गावाजवळील घनदाट जंगलात नक्षली च्या   टिपागड दलम, कोरची दलम, आणि प्लाटुन 15 मधील 05 जहाल नक्षलवादींचा खात्मा करून त्यांचा मोठया प्रमाणावर  शस्त्र, दारूगोळा, कुकर बॉम्ब, स्फोटके व इतर नक्षली साहित्य ही  मिळुन आले होते.

या कारवाई बाबत मा. मनिष कलवानिया यांना 14/8/2022 रोजी सुध्दा देशाचे महामहिम राष्ट्रपती यांचे कडुन “ शौर्य पदक”  Gallantry Medal  जाहिर करून सन्मानित करण्यात आले  होते.

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ !

छत्रपती संभाजी महाराजांवरील अजिंक्य योद्धा हे दोन अंकी नाटकाचा बुधवार १२ रोजी शुभारंभ ! मुंबई, प्रतिनिधी‌ : आत्ताच्या सोशल मिडिय...