सरपंच कल्पेश राऊत यांच्या विकासकामांमुळे आनंदाचे वातावरण !!
जव्हार-जितेंद्र मोरघा
जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत कासटवाडी मध्ये लोकनियुक्त सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून नरेगा मार्फत कासटवाडी, जाधवपाडा, गणेशनगर येथे गल्लीबोळ पेव्हर ब्लॉकचे कामे चालू असून ग्राम. हदितील सर्व गावातील प्रत्येक खेड्या-पाड्यातील गळीबोळ होणार असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. गेली अनेक वर्ष रखडलेली कामे पूर्ण होत आहेत, ग्रामपंचायतीचे सरपंच आपल्या ग्रामस्थांच्या अडी- अडचणी गावा गावात जाऊन प्रत्यक्ष भेट देवून त्यांच्या अडचणी सोडवत आहेत, प्रत्येक गावात विकासकामांच्या बरोबर ग्रामस्थांना रोजगार मिळत आहे. त्यामुळे लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरपंच, ग्रामविकास अधिकारी, उपसरपंच, सदस्य यांचे मोलाचे सहकार्य ग्रामस्थांना लाभत असून प्रत्यक्षात कामे होताना दिसत आहेत.
No comments:
Post a Comment