Saturday, 28 February 2026

मराठी भाषेने मराठी माणसाला स्वाभिमानाचा ताठ कणा दिला आहे.- साहित्यरत्न प्रा.एल.बी.पाटील

मराठी भाषेने मराठी माणसाला स्वाभिमानाचा ताठ कणा दिला आहे.- साहित्यरत्न प्रा.एल.बी.पाटील

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण एसटी डेपोमध्ये मराठी भाषा दिन साहित्यरत्न रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.पाटील आपल्या भाषणात म्हणाले की,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम पासून कुसुमाग्रज आणि आजच्या लहान मोठ्या लेखकांनी मराठीला समृद्ध केले आहे.मराठी भाषेचा स्वाभिमानाचा ताठ " कणा " जगण्यासाठी दिला आहे.तसेच पाटील यांनी "माय बोली "" "सारेबाराचा पलाट " आगरीबोलीत कविता सादर केल्या.

    दुसरे वक्ते कवी संजीव पाटील यांनी वि.वा.शिरवाडकर यांच्या जीवनावर विचार मांडून आपल्या कविता सादर केल्या. विशेष म्हणजे प्रवासाची निघालेल्या प्रवाशांनी ही मनसोक्त ऐकून भरपूर दाद दिली.

        कार्यक्रमाला अधिक्षिका दीपा कोंढारकर,विभागिय नियंत्रक तुषार शिंदे, तानाजी भोईर,रोहन खलिपे, चंद्रकांत देसले, संतोष दळवी,संदिप चौहान, प्रभाकर म्हात्रे,पंकज म्हात्रे इत्यादी प्रमुखांची लक्षणीय उपस्थिती होती

No comments:

Post a Comment

कल्याण पूर्व व श्री मलंग विभागात अखंड वीजपुरवठ्यासाठी MSEDCL अधिकाऱ्यांसोबत बैठक; स्विचिंग स्टेशन व RDSS प्रकल्पांवर चर्चा !!

कल्याण पूर्व व श्री मलंग विभागात अखंड वीजपुरवठ्यासाठी MSEDCL अधिकाऱ्यांसोबत बैठक; स्विचिंग स्टेशन व RDSS प्रकल्पांवर चर्चा !! *क...