Tuesday 31 August 2021

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे जिल्हा परिषद शाळा, लेंडी पाडा, पो. सायबान केंद्र, भाताने येथे स्वाध्याय पुस्तिका, वह्या, शैक्षणिक साहित्य, गोष्टींची पुस्तके आणि कपाट वाटप !!

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे जिल्हा परिषद शाळा, लेंडी पाडा, पो. सायबान केंद्र, भाताने येथे स्वाध्याय पुस्तिका, वह्या, शैक्षणिक साहित्य, गोष्टींची पुस्तके आणि कपाट वाटप !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

         सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था. या संस्थांची संघटना एका विशिष्ट हेतूने व उद्दिष्टासाठी केलेली असते आणि त्यांत काम करणारे स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींत सापडलेल्यांना साहाय्य करतात; प्रसंगी आर्थिक मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळतर्फे गेली अनेक वर्षे केले जात आहे. सामाजिक बांधिलकीचा वारसा अखंडपणे जपत आलेल्या पंचरत्न मित्र मंडळातर्फे रविवारी जिल्हा परिषद शाळा, लेंडी पाडा, पो. सायबान केंद्र भाताने, ता. वसई, जि. पालघर ,येथे स्वाध्याय पुस्तिका, वह्या, शैक्षणीक साहित्य, गोष्टींची पुस्तके आणि कपाट वाटप कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री.अश्विन कांबळे (वरिष्ठ प्रबंधक -आरसीएफ), तसेच विशेष पाहुणे श्री. डी. एफ. निंबाळकर (महासचिव - सैनिक फेडरेशन महाराष्ट्र) तसेच पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.अशोक भोईर, सचिव श्री प्रदीप गावंड तसेच मंडळाचे पदाधिकारी वैभव घरत, हनुमंता चव्हाण, एम डिसोझा, डी. एम. मिश्रा, रहीम शेख, संतोष नाईक, रमेश पाटील, संदीप पाटील, मंदार भोपि आदी मान्यवर   उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील मेस्त्री यांनी तर आभार प्रदर्शन अशोक भोईर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाला मदत करणारे देणगीदार, शुभचिंतक, तसेच सर्व कार्यकर्ते यांचे मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. यापुढेही आपले असेच सहकार्य मंडळाला लाभेल या अपेक्षाही या निमिताने व्यक्त करण्यात आली. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने कोकण सोडून मुंबईत आलेल्या मात्र कोकणाचे म्हणजेच आपल्या जन्मभूमी ऋण फेडण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पर्यावरण क्षेत्रात सातत्याने गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष-अशोक भोईर, सचिव प्रदिप गावंड, खजिनदार सचिन साळुंखे यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. मंडळाची स्थापना २००६ मध्ये करण्यात आली असून आजपर्यंत मंडळाच्या वतीने मुंबईसह उपनगरात व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अनाथश्रम,वृध्दाश्रम व खेडेगावातील तसेच आदिवासी भागातील शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप व आरोग्य शिबिर आणि वृक्षारोपण तसेच विविध स्पर्धांचेही आयोजन केलेले आहे. कोविड-१९ काळातही लाँकडाऊन सुरु झाल्यापासून अनेक ठिकाणी अन्नधान्य वाटप करण्यात आले. यापुर्वीही चेंबुर येथील वाशी गाव, मुंबई-७४ येथेही अन्नधान्य व मास्क वाटप करण्यात आले. प्रस्तावना करताना सांगितले की, पंचरत्न मित्र मंडळाने आजवर महाराष्ट्रात विविध ठिकाणी आवश्यकच तेथे मदतीचा हात सातत्याने दिला आहे. देत आहे न यापुढेही देत राहिल. मंडळाचे कार्यकर्ते समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेने सतत मदतीचा हात देत असतात. प्रत्येकाने गरजूंना मदत करावी ही मदत करत असताना जो आनंद मिळतो त्याची तुलना होऊ शकत नाही. तर प्रमुख पाहुणे आर.सी.एफचे वरिष्ठ प्रबंधक अश्विन कांबळे  यांनी मंडळ राबवित असलेल्या या उपक्रमांचे कौतुक केले. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने पालन करा. स्वःता सुरक्षित रहा व इतरांनाही सुरक्षित ठेवण्याचा मोलाचा सल्ला यानिमिताने दिला. कोविड-१९ चे सर्व नियमानुसार हा वाटप कार्यक्रम अंत्यत साधेपणाने पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ पदाधिकारी,सदस्य व सभासद, हितचिंतक यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अशोक भोईर यांनी करुन कार्यक्रमाची सांगता केली.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...