Monday 27 September 2021

भिवंडी तालुक्यातील महिला पोलीस कर्मचारी ऑस्ट्रेलियातील भारतीय दूतावासात सुरक्षा अधिकारी पदावर !

भिवंडी तालुक्यातील महिला पोलीस कर्मचारी ऑस्ट्रेलियातील भारतीय दूतावासात सुरक्षा अधिकारी पदावर !


भिवंडी, दिं,27, अरुण पाटील, (कोपर) :
        जिल्ह्यातील एका पोलीस कर्मचारी असलेल्या महिलेची विदेश मंत्रालय भारत सरकारच्या वतीने सहायक सुरक्षा अधिकारी या पदावर निवड करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांच्यावर पहिलीच जबाबदारी ऑस्ट्रेलिया येथे भारत सरकारच्या दूतावास (इंडियन एम्बेसी) आस्थापनेवरील सुरक्षा मिशनवर सोपविण्यात आली आहे. माया पाटील उर्फ आरती आनंद बेळगली, असे पोलीस नाईक असलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्या भिवंडी तालुक्यातील अलिमघर गावातील रहिवाशी आहेत.
       आरती आनंद बेळगली या ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या विशेष शाखा आस्थापनेत महिला पोलीस नाईक पदावर कार्यरत आहेत. त्यांची नुकतीच विदेश मंत्रालय भारत सरकारमार्फत निवड केल्या जाणाऱ्या सहायक सुरक्षा अधिकारी पदावर निवड झाली आहे.आरती यांच्या एकूणच गुणवत्तेवर ऑस्ट्रेलिया येथील भारत सरकारच्या दूतावास (इंडियन एम्बेसी) कार्यालयाच्या आस्थापनेवरील मिशनवर नियुक्ती झाली आहे. त्या सध्या ठाण्यातील बाळकुम परिसरात कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत.
            अनेक गुणवत्ता व निष्कर्षावर निवडविदेश मंत्रालय भारत सरकारच्या वतीने सहायक सुरक्षा अधिकारी म्हणून होणारी निवड अनेक गुणवत्ता व निष्कर्षावर केली जाते. त्यात इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे, वक्तृत्त्व, धाडसीपणा मेहनत घेण्याची तयारी सचोटी प्रामाणिकपणा व निष्ठा इत्यादी गुणांसह खेळ, वाहन चालविणे इत्यादी कला गुणांचाही विचार केला जातो. या साऱ्या निष्कर्षांवर पोलीस नाईक आरती बेळगली यांनी स्वतःला सिद्ध करून दाखविल्याने त्यांची निवड झाली असल्याचे केंद्रीय "पंचायत राज " राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. ठाणे पोलीस दल व भिवंडी तालुक्यातुन आरती  यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !!

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !! मुंबई (शांताराम गुडेकर) :       ...