Tuesday 29 March 2022

काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द झाल्यानंतर आतापर्यंत फक्त ३४ लोकांकडून संपत्ती खरेदी !!

काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द झाल्यानंतर आतापर्यंत फक्त ३४ लोकांकडून संपत्ती खरेदी !!


भिवंडी, दिं,२९, अरुण पाटील (कोपर) :
           पृथ्वीवर स्वर्ग समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द झाल्या नंतरही संपत्ती खरेदी करण्यास पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी आतापर्यंत  राज्यातील ३४ लोकांनी जम्मू-काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी केली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. ५ ऑगस्ट, २०१९ रोजी केंद्र सरकारने जम्मू- काश्मीरसाठीचे कलम ३७० संपुष्टात आणून जम्मू-काश्मीर तसेच लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली होती.
           जम्मू-काश्मीरमधील संपत्ती खरेदीबाबत बसपाचे खासदार फजलुर रहमान यांनी प्रश्न उपस्थित केला होता. बाहेरच्या राज्यातील लोकांनी ज्या भागात संपत्ती खरेदी केली आहे. त्यात जम्मू, रियासी, उधमपूर आणि गांदरबल जिल्ह्यांचा समावेश आहे, असे नित्यानंद राय यांनी नमूद केले.
           कलम ३७० रद्द होण्याआधी तत्कालीन जम्मू काश्मीरला विशेष दर्जा प्राप्त होता आणि तेथे केवळ स्थानिक नागरिकच संपत्तीची खरेदी करू शकत होते. दरम्यान, गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत निमलष्करी दलाशी संबंधित बाराशे कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याची माहितीही सरकारकडून लोकसभेत देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेल्या जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश स...