Friday 30 December 2022

नववर्ष - नव्या सुरुवातीची सोनेरी संधी- संत राजिन्दर सिंह जी महाराज


नववर्ष -  नव्या सुरुवातीची सोनेरी संधी
-  संत राजिन्दर सिंह जी महाराज


आपण सर्वजण हे चांगल्या प्रकारे जाणून आहोत की, संपूर्ण जगभरात नवीन वर्षाचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. ही एक अशी ही वेळ असते जेव्हा आपण आपल्या जीवनातील सामान्य कामकाजाला काही काळ थांबवून, आपले लक्ष त्या कार्यांकडे करतो, ज्यामुळे आपणांस आनंद मिळतो. ही अशी वेळ असते जेव्हा आपण गतवर्षाला मागे सोडतो आणि येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या आनंदाने करतो.

जर आपण आपल्या मागील वर्षावर एक नजर टाकली असता, आपणांस असे दिसून येईल की, व्यतीत केलेल्या वर्षांमध्ये अशा अनेक वेळा आपल्या जीवनात ईश्वरीय कृपेचा आपण अनुभव केला असेल. ठीक याच्या विपरीत आपल्या जीवनात अनेक वेळा असे सुद्धा प्रसंग येतात की, जेव्हा आपण कठीण आणि दुःखी-कष्टी परिस्थितीतून सुद्धा जातो. अशावेळी आपल्याला या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे की, प्रत्येक गुलाबाला काटे सुद्धा असतात, त्यांची ही भूमिका आहे आणि त्यांचेही स्वतःचे असे महत्त्व आहे. ठीक अशाच प्रकारे आपल्याही जीवनात सुख आणि दुःख दोन्हीही येतात, जर आपण या बाबींवर विचार केला  तर आपणांस असे दिसून येईल की, आपण प्रत्येक परिस्थितीत शांत व सुखी राहू शकतो.

नववर्ष फक्त भौतिक आनंदच साजरा करण्याची वेळ नसून, ही आपल्या  जीवनात सुधारणा घडवून आणण्याची सोनेरी संधी सुद्धा आहे. 

आपण असे पाहतो की नवीन वर्षारंभी बरेचसे लोक चुकीच्या सवयी सोडून चांगल्या सवयी धारण करण्याचा सुद्धा संकल्प करतात. हा एक असा प्रसंग आहे जेव्हा ते स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. काही लोक धूम्रपान न करण्याचा प्रण घेतात, जेव्हा की बरेचसे लोक असेही असतात की जे मांसाहार सोडून शाकाहारी जीवन जगण्याचा संकल्प करतात, काही लोक असेही असतात जे क्रोध न करण्याचा, सर्वांशी प्रेमपूर्वक व्यवहार करण्याचा आणि इतरांची मदत करण्याची प्रतिज्ञा घेतात. बरेच विद्यार्थी असे असतात की जे इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपला अभ्यास अधिकाधिक करण्याचा संकल्प करतात. लक्षपूर्वक पाहिले असता, प्रत्येक जण आपापल्या स्तरावर आपल्या जीवनात काही चांगले करण्याचा प्रयत्न करतात.

नववर्षाच्या याप्रसंगी खूप कमी लोक असे असतात की जे अशी प्रार्थना करतात की, नववर्षात आपण अधिकाधिक अध्यात्मिक विकास करूया. जर आपण सुद्धा नववर्षी आध्यात्मिक रूपाने प्रगती करू इच्छित असु तर, यासाठी आपल्या दिनचर्येला लक्षपूर्वक पहावे लागेल. अशा मध्ये आपला हाच प्रयत्न असावा की आपण असे कोणतेच कार्य करू नये जे आपणांस या उद्देशापासून दूर करेल. अध्यात्मिक रूपाने प्रगती करण्याकरिता आपणांस ध्यानाभ्यासाला धारण करावे लागेल. याकरिता आपणास वर्तमान काळातील एखाद्या पूर्ण संतांकडून ध्यानाभ्यास करण्याची पद्धती शिकावी लागेल. आपण आपल्या दिनचर्येमध्ये ध्यानाभ्यास शामिल करतो, तेव्हां आपणांस आपल्या अंतरी प्रभुच्या ज्योति आणि श्रुति चा अनुभव होतो. या शिवाय आपल्याला असाही अनुभव येतो की, प्रभुची जी ज्योत मला प्राणशक्ती देत आहे, तीच इतरांमध्ये सुद्धा  आहे. त्यानंतर आपणास या बाबीवर  पक्का विश्वास होतो की, आपण सर्वजण एकाच पिता-परमेश्वराची संतान आहोत.

येणाऱ्या या नवीन वर्षी आपण हे समजून घेतले पाहिजे की, आपण जो प्रयत्न करू तो कितीही  थोडा जरी असेल, आपण जे पाऊल उचलू ते  जरी कितीही छोटे का असेना ते आपल्याला आपल्या ध्येयाजवळ घेऊन जाईल. नववर्षी आपला असा प्रयत्न असावा की, आपला भूतकाळ जरी कसाही असेल, परंतु आपले भविष्य कलंक रहित राहील. आपण आपले विचार सदैव सकारात्मक ठेवूया याकरिता अध्यात्मिक मार्गच आपल्याला मदतगार होऊ शकतो.
चला तर!  आपण सुद्धा नववर्षी अध्यात्मिक प्रगती करण्याचा संकल्प करूया, कारण की आपल्या अंध्यात्मिक प्रकृती वरच आपली शारीरिक व मानसिक प्रकृती निर्भर आहे. जर आपण अध्यात्मिक मार्गावर चालण्याचा प्रण केला तर, आपण असे पाहू की याने केवळ आपले अंध्यात्मिकच नाही तर शारीरिक व मानसिक प्रकृती सुद्धा ठीक होईल. नववर्षाच्या प्रसंगी आपण आपल्या चुकांकडे लक्ष न देता, एका आशावादी अंतःकरणाने एका नवीन वर्षांची सुरुवात करूया. आपणा सर्वांना जीवनातील सफलते करिता खूप खूप शुभेच्छा !

सौजन्य - अमृता - +91 84510 93275


No comments:

Post a Comment

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !!

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !! कल्याण, प्रतिनिधी : जिजाऊ संघट...