पिक विमा योजनेची ३ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ !
*मुदतवाढ साठी प्रदिप वाघ यांनी केली होती तहसिलदारांकडे मागणी*
जव्हार, जितेंद्र मोरघा :
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या एक रुपयात पिक विमा योजनेला तालुक्यात चांगला प्रतिसाद लाभलेला असतांना दोन दिवसा पासुन फाॅर्म भरण्याचे सर्व्हर डाऊच होते.त्यामुळे शेतकर्यासह सी.एस.सी.केंद्र चालक यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शासनाने आता पिक विमा योजनेची मुदतवाढ ३ ऑगस्ट केली असुन मोखाडा तालुक्यातील शेकडो शेतकरी हे पिक विमा योजनेचा अर्ज भरण्या पासुन वंचित राहणार होते.त्यातच लाईट ची समस्या, नेटवर्क प्रोब्लेम अशा अडचणी मुळे शेतकरी बांधवांना अडचण येत होती.
या बाबतीत पंचायत समिती चे उपसभापती प्रदीप वाघ यांनी तहसीलदार यांना मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी देखील केली होती.अता शासनाने ३ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे असे प्रतिपादन प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment