Monday, 19 May 2025

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल कुर्ला (प), मुंबई या शाळेचा निकाल 87.5% टक्के !!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल कुर्ला (प), मुंबई या शाळेचा निकाल 87.5% टक्के !!

मुंबई, प्रतिनिधी - पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी संचालित - *संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल,* बैल बाजार, कुर्ला पश्चिम, मुंबई -400070 या रात्र शाळेचा फेब्रुवारी-2025  एस.एस.सी. परीक्षेचा निकाल 87.5% लागला असून विद्यार्थी पालक व शिक्षक वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येते. 

या रात्र शाळेची स्थापना 1971 ची असून शासन अनुदानित मान्यता आहे. रात्र शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत रात्र शाळेचे शैक्षणिक कार्य यशस्वीपणे राबवले जात आहे. आज रात्र शाळा परिसरामध्ये नावारूपाला येत आहे. मराठी माध्यमाची रात्र शाळा ही ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अपूर्ण आहे किंवा नोकरी मध्ये प्रमोशन घेण्यासाठी अधिक शिक्षणाची आवश्यकता लागत आहे असे विद्यार्थी व नियमित विद्यार्थी रात्र शाळेत येऊन आपले शिक्षण पूर्ण करत आहेत. रात्र शाळेत वयाची अट नसल्याकारणाने 14 वयोगटाच्या पुढील कितीही वयापर्यंतचा विद्यार्थी रात्र शाळेत प्रवेशित होऊ शकतो व त्याचे शिक्षणाचे राहिलेले स्वप्न तो पूर्ण करू शकतो. 
 
रात्र शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत व सहकारी शिक्षक श्री समाधान खैरनार सर तसेच मासूम संस्थेकडून इंग्रजी विषय शिकविण्यासाठी देण्यात आलेले श्री शहाजी ओव्हाळ सर गणित विज्ञान विषयासाठी श्री योगेश विरकर सर यांनी एसएससी परीक्षेचा निकाल शंभर टक्के कसा लावता येईल त्यासाठी खूप प्रयत्न केले. मागील पाच वर्ष रात्र शाळेचा निकाल शंभर टक्के देण्यात आलेला आहे. परंतु या शैक्षणिक वर्षात एसएससी परीक्षेचा निकाल *87.5%* देण्यात आला आहे. 
 
एसएससी परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त झालेला विद्यार्थी प्रवीण सुधाकर साळवे -61.8% द्वितीय क्रमांक स्वप्निल संतोष साळवे- 60 %, तृतीय क्रमांक साक्षी दीपक मानकर -53.4% गुण प्राप्त करून यश संपादित केले आहे.* पास झालेले सर्व विद्यार्थी आपले पुढील शिक्षण चालू ठेवणार आहे. 
 
रात्र शाळेला सपोर्ट करणारी मासूम संस्था रात्र शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे करिअर घडवण्यासाठी मदत करत असते. त्याबद्दल मासूम संस्थेच्या संस्थापिका माननीय निकिता केतकर मॅडम व त्यांचे कार्य सांभाळणारी संपूर्ण टीम यांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत व संस्थेने मानले आहेत.* पास झालेल्या प्रत्येक विद्यार्थी यापुढे चांगलं कौशल्यपूर्ण शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा विचार करत आहे. 

आपले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच आठवी, नववी व दहावीच्या वर्गात प्रवेश घेण्याचे आवाहन मुख्याध्यापक राऊत सर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

मिरॅकल फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्राचे, क्षयरोग मुक्त भारत अभियानासाठी मोलाचे सहकार्य !!

मिरॅकल फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्राचे, क्षयरोग मुक्त भारत अभियानासाठी मोलाचे सहकार्य !! ठाणे, (पी. डी. पाटील) : राष्ट्रीय क्षयरो...