दिव्यांग कल्याण विभागाचे नागरिकांना जाहिर आवाहन !!
सातारा, प्रतिनिधी : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ४९-५३ नुसार दिव्यांगांच्या कल्याण पुनर्वसन आणि सक्षमीकरण क्षेत्रात काम करणा-या नागरी समाज संघटना/ संस्थांची नंदिणी अनिवार्य आहे. यासाठी मा. आयुक्त, दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात करण्यात आलेले आहे.
जिल्हयातील ज्या व्यक्ती, संस्था, संघटना यांना दिव्यांग क्षेत्रात कार्य करावयाचे आहे. त्यांनी दि. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत मा. आयुक्त दिव्यांग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे नोंदणी करावी व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, आयुक्त, दिव्यांग कल्याण यांचेकडे नोंदणी नसलेल्या संस्था, व्यक्ती दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असल्याचे दिसून आल्यास संबंधिताविरुदध दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ९१ नुसार कारवाईस पात्र असतील.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील कलम ४९-५३ नुसार दिव्यांगांच्या कल्याण पुनर्वसन आणि सक्षमीकरण क्षेत्रात काम करणा-या नागरी समाज संघटना संस्थांची नंदिणी अनिवार्य आहे. यासाठी मा. आयुक्त, दिव्यांग कल्याण महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात करण्यात आलेले आहे.
दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील शासन निर्णय दि.१७ ऑक्टोंबर २०२५ नुसार कोणतीही व्यक्ती अथवा नागरी समाज संघटना/संख्या दिव्यांग क्षेत्रात वैध नोंदणी शिवाय कार्य करू शकत नाही. वैध नोंदणी शिवाय कार्यरत नागरी समाज संघटना/संस्था निदर्शनास आल्यास त्यांच्यावर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ व इतर अनुषंगिक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल अशी तरतुद आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद येथे संपर्क साधावे असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा स्तरीय समिती दिव्यांग यांनी कळविले आहे
No comments:
Post a Comment