॥ भात शेती, आपली समृद्धी ॥
माणगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा कंबर कसूया आपल्या काळ्या आईला हिरवेगार करूया : किरण पडवळकर तालुका कृषी अधिकारी माणगाव
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) : माणगाव तालुक्यातील शेतकरी मित्रांनो, गेल्या काही वर्षांत आपल्या तालुक्यातील भात शेतीचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. भात हे केवळ आपले पीक नसून ती आपली परंपरा आणि ओेळख आहे. चला, पुन्हा एकदा एकत्र येऊया आणि आपल्या शेतात सोन्यासारखा विषमुक्त भात पिकवूया !
भात शेती का करावी?
✓ स्वयंपूर्णता : स्वतःच्या कुटुंबासाठी शुद्ध आणि विषमुक्त तांदूळ उपलब्ध होतो.
✓ पशुधनास आधार : भात शेतीतून मिळणारा पेंढा आपल्या गुरांसाठी मुख्य चारा आहे. जमिनीची सुपीकता: पीक फेरपालट आणि मशागतीमुळे जमिनीचा कस टिकून राहतो.
✓ शासकीय योजना : सुधारित बियाणे, खते आणि अवजारांसाठी कृषी विभागाकडून विशेष अनुदान.
✓ "शेत सोडू नका, साथ सोडू नका... कष्टाची भाकरी, सन्मानाने खा!"
अडचणींवर मात करण्यासाठी आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत!
बियाणे निवड, खत व्यवस्थापन किंवा आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल माहितीसाठी आजच संपर्क साधा. तालुका कृषी अधिकारी कार्यालय माणगाव, जि. रायगड.
No comments:
Post a Comment