Thursday, 30 April 2026

डॉ.रवींद्र भोळे यांचे त्यागमय निष्काम कर्मयोगी कार्य स्फूर्तीदायक आहे... नामदार रवींद्र साठे

डॉ.रवींद्र भोळे यांचे त्यागमय  निष्काम कर्मयोगी कार्य  स्फूर्तीदायक आहे... नामदार रवींद्र साठे 

पुणे, (प्रमोद सुर्यवंशी) दि. २९ : वरकरणी सर्वसामान्य वाटणारे परंतु सेवाव्रती कर्मशिल्पी कार्यकर्त्यांचा एवढा मोठ्या स्तरावर सत्कार, पुरस्कार करणे ही साधी गोष्ट निश्चितच नाही. पुरस्कारामुळे प्रेरणा प्रोत्साहन मिळते व प्रेरणेमुळे राष्ट्र घडते. समाजाप्रती काहीतरी देणे आहे ही भावना प्रत्येकाने जपून प्रत्यक्षात आचरणात आणली पाहिजे. त्यागमय समर्पित कार्य करून डॉ.मणी भाई देसाईंच्या जयंतीदिनी  प्रेरणा देण्याचे स्फूर्तीदायक कार्य समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे करीत आहे. त्यांनी स्वतःचा विचार न करता समाजाचा विचार करून निष्काम कर्मयोगी कार्य केलेली आहेत. डॉ. रवींद्र भोळे यांचे 
त्यागमय निष्काम कर्मयोगी कार्य स्फूर्तीदायक आहे असे मत नामदार रवींद्र साठे खादी आणि ग्रामोद्योग मंत्री स्वतंत्र कार्यभार मंत्रालय मुंबई यांनी येथे व्यक्त केले. मॅगसेस अवॉर्ड विनर पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई यांच्या एकशे सहाव्या जयंती निमित्ताने येथे राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पद्मश्री डॉ. मणी भाई देसाई प्रतिष्ठान क्रीडा मंत्रालय, नीती आयोग, एम एस एम इ उद्यम मंत्रालय भारत सरकार सलग्नित संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पद्मश्री डॉ मणी भाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार समारंभात मार्गदर्शन करताना नामदार रवींद्र साठे यांनी वरील मत व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर सौ ममता यशवंत पाटील, स्वीय सहाय्यक खादी ग्रामोद्योग मंत्रालय मुंबई, रमेश सुरुंग जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी, माननीय डॉ. भावार्थ देखणे, मुख्य ट्रस्टी संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट आळंदी, कृष्णा त्र्यंबक खडसे सल्लागार लेवाभ्रातृमंडळ, जयश्री पुरुषोत्तम पाटील राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या,पीएसआय, विजय वासुदेव खर्चे राष्ट्रपती पुरस्कार विजेते  अकोला, डॉ हरी निवृत्ती पाटील, प्रमोद सूर्यवंशी संपादकआम्ही मुंबईकर, सुभाष कट्यारमल अध्यक्ष जय श्रीराम शिक्षण संस्था पुणे, रुपेश ताओरी, बापूराव बबन चौधरी दैनिक महाराष्ट्राची भूमि पत्रकार, फकीरा भगवान राजगुरू साहित्यिक, प्राध्यापक दिलीप चौधरी उपाध्यक्ष लेवाभ्रातृमंडळ पुणे हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विकास वारके उपाध्यक्ष महाराष्ट्र लेवा महासंघ हे होते. या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार, स्वर्गीय दिनकरराव भोळे (संस्थेला तीस वर्षे आर्थिक मदत देणारे आश्रयदाते)स्वर्गीय शंतनु गटने (संस्थेला तीस वर्ष स्मृतीचिन्ह पुरविणारे,) स्व तुकाराम रावबा मदने (संस्थेला तीस वर्षे पुष्पहार पुरविणारे)यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.ह्या वेळी संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक, समाज सुधारक प्रवचनकार अपंगसेवक डॉ.रवींद्र भोळे यांनी प्रास्ताविकात सांगितले की गीतेतील अध्याय दोन मधील सत्तेचाळीस व्या श्लोकानुसार पद्मश्री मणीभाई देसाई जीवन जगले. कर्मफलाची अपेक्षा न करता त्यांनी जीवन पर निष्काम कर्मयोग केला. तसेच गीतेतील अध्याय अठराव्या अध्यायातील तिसऱ्या स्लोकानुसार त्यांनी जीवनभर आचरण केले. या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने भक्तांना मार्गदर्शन केलेले आहे की प्रत्येकाने जीवनामध्ये यज्ञ, दान, तप,  कर्म करणे जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. ह्याच श्लोकानुसार पद्मश्री डॉ. मनीभाई देसाई जीवन जगले त्यांनी दुग्धोत्पादन, निसर्गोपचार, पर्यावरण, कृत्रिम गो पैदास, सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक,शैक्षणिक, इत्यादी क्षेत्रांमध्ये समर्पित भावनेने महत्त्वपूर्ण कार्य करून यज्ञ ,दान, तप, कर्म साध्य केले, मनीभाईजींनी निष्काम कर्मयोग साधला, कर्मफलाचा त्याग केला असे मत जेष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. डॉ.मणी भाई देसाई जयंती म्हणजे विभूती पूजा आहे आणि ह्या विभूती पूजेचा प्रसाद म्हणजे हा पुरस्कार आहे असे ते म्हणाले. गेली तीस वर्षापासून हा महायज्ञ सुरू आहे. याप्रसंगी पद्मश्री डॉ. मणी भाई दिसे राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभाचे वितरण प्रमुख पाहुण्यांचे हस्ते झाले. डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे, डॉ.भरत सिंह शैक्षणिक कार्य ग्रेटर नोएडा युपी, विजय वासुदेव खर्च राष्ट्रपती पुरस्कार विजेते अकोला, मुरलीधर खर्चे, हरी प्रल्हाद बढे,जितेंद्र बच्चन ज्येष्ठ पत्रकार दिल्ली, बापूराव बबन चौधरी पत्रकार महाराष्ट्राची भूमी, सौ रीना देशमुख प्राचार्य एंजल हायस्कूल, जयश्री पुरुषोत्तम पाटील राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या पीएसआय ठाणे, रुपेश ताओरी, फकीरा भगवान राजगुरू, सौ विद्याताई यादव, डॉ. लक्ष्मण माधवराव शिवनेकर, शिवराज ज्ञानोबा साने संगीत शिक्षक,श्रीमती रश्मी नरेंद्र जोशी, डॉ.स्मिता विनायक सहस्रबुद्धे, प्रदीप श्रीकृष्ण पुराणिक, रज्जाक शेख, अहमद किरण साहब शेख,किरण लक्ष्मण तोडकर, विजया कौतिक जंगले, नीता यशवंत वायकोळे, दिलीप गोविंदराव डहाके, भाग्यश्री पवन कट्यारमल, अर्चना शशिकांत धूरदेव, आरती शशिकांत गाडेकर, चंद्रकांत प्यारे मॅडम, दत्ता श्रावण खंदारे, राम मिस्त्री, धनेश्वर  पतंगराव भोस, हे म्हणता प्रतीक गीते, सरोज प्रभाकर आल्हाट, विवेक भागचंद्र शेलार, खेमगर वसंत बाळू, रेणुका रवींद्र पातारे, शहाजी भिकाजी शेळके, संतोष शेरकर, विठ्ठल महाराज खेडकर, समीर निंभोरे अंकुश तुकाराम भोरडे, वैद्य उद्धव ज्ञानदेव साळुंखे सत्तर सामाजिक कार्यकर्त्यांना पद्मश्री डॉक्टर मनिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्मृतिचिन्ह सन्मानपत्र शाल व पुष्पगुच्छ असेच पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी अंकुश दळवी, प्रफुल्ल झोपे, सौ किरण पाचपांडे,नॉर्मल नॉटन, एकनाथ धनवट, नितीन पारकर, नाना डोंगरे, या कार्यकर्त्यांनी व्यवस्थापन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल.डी साळवे सर यांनी केले. आभार प्रदर्शन सुभाष कट्यारमल सर यांनी आपल्या सुमधुर स्वरात केले. शेवटी पसायदान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.हा कार्यक्रम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह टिंबर मार्केट येथे संपन्न झाला.


डॉ. रवींद्र भोळे ज्येष्ठ समाजसेवक,समाजसुधारक, अपंग सेवक, प्रवचनकार 
संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मणी भाई देसाई प्रतिष्ठान उरुळी कांचन

No comments:

Post a Comment

महेंद्रशेठ घरत यांच्यातर्फे 'महाराष्ट्र दिना' निमित्त कामगार आणि पत्रकारांना'राजा शिवाजी' चित्रपटाची पहिल्या शोची मेजवानी !

महेंद्रशेठ घरत यांच्यातर्फे 'महाराष्ट्र दिना' निमित्त कामगार आणि पत्रकारांना 'राजा शिवाजी' चित्रपटाची पहिल्या शोची मेजवानी !...