Sunday, 28 June 2026

सुभाष टेकडी येथे महामोर्चासाठी नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन !!

सुभाष टेकडी येथे महामोर्चासाठी नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन !!
उल्हासनगर : सुभाष टेकडी परिसरात आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत 29 तारखेला होणाऱ्या महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी बुद्धभूमी प्रकरणावर आपली भूमिका ठामपणे मांडत जोरदार घोषणा दिल्या.

"बुद्धभूमी आमच्या हक्काची आहे, कोणाच्या बापाची नाही" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. उपस्थितांनी बुद्धभूमीच्या संरक्षणासाठी आणि आपल्या हक्कांसाठी एकजूट दाखवण्याचे आवाहन केले. तसेच 29 तारखेला होणारा महामोर्चा शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने काढण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामोर्चामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन करण्यात आले.

महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर परिसरात जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आयोजकांनी सर्व समाजबांधवांना 29 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण तालुका पोलीस ठाण्यातंर्गत साडेचार हजार घरगुती व शंभरच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव, विसर्जन घाटांची 'बिकट, अवस्था ?

कल्याण तालुका पोलीस ठाण्यातंर्गत साडेचार हजार घरगुती व शंभरच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव, विसर्जन घाटांची 'बिकट, अवस्था ? क...