वसई- मनमाड- शिर्डी - इंटर सिटी रेल्वे सुरू करण्याची बहुजन विकास आघाडीची मागणी.....
नालासोपारा ता, ९ :- वसई ते मनमाड- शिर्डी इंटरसिटी रेल्वेची मागणी प्रलंबित आहे. ही नवीन ट्रेन वसई मार्गे सुरु केल्यास व्यापारी, विद्यार्थी, सामान्य नागरिक आणि साई भक्तांना याचा फायदा होणार आहे. दररोज वसई ते शिर्डी प्रवास करीत असताना महामार्गावर वाहतूक कोंडी अपघात आणि बराच वेळ प्रवासात जातो. शिर्डी ला जाणार्या ट्रेन या मुंबई वरुन असल्याने प्रवासाची गैरसोय होत असते.
साई भक्तांसाठी वसई मार्गे साईनगर शिर्डी पर्यंतच्या गाडीची मागणी करताना विविध साईभक्त मंडळांकडून आलेली निवेदने व त्याला पत्र जोडून बहुजन विकास आघाडीचा रुचिता नाईक महेश निकम यांनी लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर साहेब यांची भेट घेत निवेदन सादर केले.
आप्पांनी ही त्वरित दखल घेत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले व त्वरित यासंदर्भात पत्र बनवून DRM यांना देतो असे सांगितले
No comments:
Post a Comment