Tuesday, 28 July 2026

*'नेत्रदान, अवयवदानाविषयीची अनास्था चिंताजनक' ; लेखक पत्रकार राजेंद्र घरत यांचे प्रतिपादन !!

*'नेत्रदान, अवयवदानाविषयीची अनास्था चिंताजनक' ; लेखक पत्रकार राजेंद्र घरत यांचे प्रतिपादन !!

*नवी मुंबई, प्रतिनिधी*

लेखक पत्रकार राजेंद्र घरत यांनी नेत्रदान आणि अवयवदानाविषयी समाजात असणारी अनास्था चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. 

वांगणी येथील देशमुख कृषी पर्यटन केंद्रात दृष्टीहीनांसाठी घरत यांच्या 34 व्या 'लेकुरे उदंड झाली' आणि 35 व्या 'प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि त्यांची भाषा' या ब्रेल लिपीतील पुस्तकांचे प्रकाशन 27 जुलै रोजी झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

*श्रीलंकेचे उदाहरण*  
घरत म्हणाले, "श्रीलंका हा देश भारताच्या एखाद्या राज्याइतकाच आहे. परंतु तेथे नेत्रदान करणाऱ्यांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. तर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या आपल्या भारतात मरणोत्तर नेत्रदान करणारे केवळ 10 ते 12 टक्के आहेत. देहदानाची परिस्थितीही अशीच आहे."

"मौल्यवान डोळे, यकृत आणि इतर मानवी अवयव मृत्यूनंतर त्या देहासोबतच जाळून टाकून राख करण्याऐवजी ते अवयवदान म्हणून दिल्यास कित्येकांना नवजीवन मिळू शकते," असेही त्यांनी सांगितले.

*पुस्तक प्रकाशन*  
'लेकुरे उदंड झाली' या पुस्तकाचे प्रकाशन विद्यानिकेतन संगीत विद्यालयाच्या संचालिका सुरेखा थिगळे यांच्या हस्ते झाले. त्या म्हणाल्या, "दृष्टीहीनांच्या संगीत साधनेबद्दल आपण जाणतो. डोळ्यांच्या उणीवेच्या बदल्यात नियतीने त्यांना अतिरिकीत इंद्रिय दिले असावे इतके तन्मयतेने ते संगीत सादर करतात. आपले अवयव शाबूत असल्याने आपण मोठ्या आरोग्यसंपदेचे धनी आहोत."

'प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आणि त्यांची भाषा' या पुस्तकाचे प्रकाशन घरत यांचे महाविद्यालयीन सहकारी प्रा. एकनाथ जाधव यांच्या हस्ते झाले. जाधव म्हणाले, "आपल्यावर समाजाचे कर्ज आहे. त्याची फेड करताना घरत यांना पाहून समाधान वाटते. असाच ज्ञानप्रकाश सर्वत्र पसरावा."

*उपस्थिती*  
या कार्यक्रमाला डॉ. श्रद्धा सोमण, अध्यापिका विभावरी तरटे, शुभदा बोराडे आणि देशमुख पर्यटन केंद्राचे प्रमुख दिलीप देशमुख उपस्थित होते. देशमुख यांनी घरत यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

केडीएमटीच्या डोंबिवली बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीने आणि अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त !             कल्याण डोंबिवली महापाल...