Wednesday, 25 June 2025

जिल्हा परिषदेच्या नववी व दहावीच्या वर्गांना शिक्षकच नाही -* विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे? पालकांना प्रश्न !

जिल्हा परिषदेच्या नववी व दहावीच्या वर्गांना शिक्षकच नाही -
* विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे? पालकांना प्रश्न !

वाडा, प्रतिनिधी : वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या डाहे व वरसाळे या दोन शाळांमध्ये इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र या दोन्ही शाळांमध्ये यावर्षी अजूनही शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षकाविनाच शाळेत बसून राहावे लागत आहे.

पालघर जिल्हा परिषदेकडून २०१७ पासून इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत, या दोन वर्गांसाठी मानधन तत्वावर खाजगी शिक्षणाची नेमणूक करण्यात आली असून त्यांचे मानधन जिल्हा परिषद सेस फंडातून दिले जाते. मात्र यावर्षी शाळा सुरू होऊन 15 दिवस होत आले तरीही सदर शिक्षकांची नेमणूक केली नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

वाडा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या डाहे व वरसाळे या दोन शाळांमध्ये इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या दोन्ही शाळा अतिदुर्गम गावात आहेत, मात्र या दोन्ही शाळांमध्ये यावर्षी अजूनही शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आले नसल्याने पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया
2023 सालापासून पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 44 शाळांमध्ये इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत मात्र दरवर्षी या दोन वर्गांसाठी शतकांची मानधन तत्वावर नियुक्ती केली जाते ही संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत खूप उशीर उशीर होतो त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याबाबत तातडीने कार्यवाही करून शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात.
- जयेश शेलार
अध्यक्ष : पालक संघ वाडा तालुका

कार्यसम्राट आमदार व शिवसेना विभागप्रमुख दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न !

कार्यसम्राट आमदार व शिवसेना विभागप्रमुख दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न !

घाटकोपर, (केतन भोज) : कार्यसम्राट आमदार व शिवसेना विभागप्रमुख दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच घाटकोपर पश्चिम शिवसेना उपविभागप्रमुख हरेश (अण्णा) धांद्रूत यांच्या सहयोगाने घाटकोपर पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १२६/१२७ या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी यांच्या समवेत पर्यावरण जपण्याचा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी उपविभागप्रमुख हरेश(अण्णा) धांद्रूत तसेच शाखा १२६ चे शाखप्रमुख मनीष कळबे, महिला शाखासंघटिका सौ.सुवर्णा वाळुंज, शाखा क्रमांक १२७ चे शाखप्रमुख विजय कोईलकर, महिला शाखासंघटिका श्रीमती ज्योती ताई शेळके तसेच प्रभाग क्रमांक १२६/१२७ चे समन्वयक दत्ता शेट्ट केसरकर आणि शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी उपस्थित होते.

कोकण सुपुत्र राजेंद्र भुवड, मोहन कदम राज्यस्तरीय"कोकण दीप पुरस्कार-२०२५ ने सन्मानित !

कोकण सुपुत्र राजेंद्र भुवड, मोहन कदम राज्यस्तरीय"कोकण दीप पुरस्कार-२०२५ ने सन्मानित !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
                   कोकणदीप मासिकाचा २३ वा वर्धापन दिन मुबंई मराठी ग्रंथ संग्रालय दादर येथे मा.ना.श्री योगेशदादा कदम (राज्यमंत्री गृह (शहरे) यांच्या उपस्थितीत मोठया थाटामाटात संपन्न झाला.यावेळी सामाजिक शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना कोकणदीप  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
           मंचावर श्री.सुधीरभाऊ कदम (शिवसेना संपर्क प्रमुख -दापोली विधानसभा), डॉ.सुकृत खांडेकर (जेष्ठ पत्रकार, संपादक दैनिक प्रहार), श्री संतोष परब (महाराष्ट्र शासन समाज भूषण पुरस्कार प्राप्त), डॉ.राम मेस्त्री (साहित्यिक), श्री.प्रवीण घाग (गिरणी कामगार नेते), श्री रणजित जाधव, विनय शेडगे आदी मान्यवर  उपस्थित होते.
          या कार्यक्रमात कोकण सुपुत्र राजेंद्र भुवड, मोहन कदम यांना मा.ना.श्री योगेशदादा कदम (राज्यमंत्री गृह (शहरे) यांच्या शुभ हस्ते सन्मान पत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून मोहन जयराम कदम जमेल तशी जनसेवा करत आहेत. गावांमध्ये विकासात्मक गोष्टींना चालना देणे, आजारी व्यक्तीला उपचारासाठी योग्य  मार्ग दाखवणे, विद्यार्थी वर्गाला मदत करणे आदी कामात सदैव तप्तर असलेले कदम, राजेंद्र भुवड यांना राज्यस्तरीय "कोकण दीप पुरस्कार-२०२५ देऊन गौरव झाल्याबद्दल अनेकांनी त्यांना यानिमित्ताने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
              कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्याधर शेडगे, सागर शेडगे, संदीप शेडगे, नितीन सुकदरे, निशांत शेडगे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रसाद महाडिक यांनी केले. तर आभार प्रदर्शन संपादक श्री.दिलीप शेडगे यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.

Tuesday, 24 June 2025

श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) तर्फे "कलगी-तुरा" कलेचं आयोजन !!

श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) तर्फे "कलगी-तुरा" कलेचं आयोजन !!

** समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा "समाजरत्न पुरस्कार - २०२५" देऊन होणार गौरव 
 

मुंबई - ( केतन भोज )

कोकणातील पारंपरिक लोककला होळी आणि गणेशोत्सव हे कोकणातील खरे खुरे उत्सव. या दोन्ही उत्सवासाठी येथील शेतकरी मोकळा असतो. भाताची लावणी संपली की घरोघरी गणपती येतात आणि भाताची कापणी /मळणी संपताच शिमग्याचे म्हणजेच होळीचे वेध लागतात. कोकणातील या दोन्ही सणांशी येथील लोककला निगडीत आहेत. शक्ती-तुरा (जाखडी ) हा सामूहिक नृत्याचा प्रकार आहे. गणेशोत्सवात गावतल्या प्रत्येक वाडीत जाखडीचा संच असतो. आठ गडी फेर धरून वादकांच्या भोवती नाचतात. ढोलकी आणि घुंगरू ही पारंपरिक वाद्य आणि आधुनिक ढंगाची गाणी यांचा मेळ जाखडीत असतो.जाखडीत आता अनेक बदल झालेत. वेशभूषा, प्रकाश योजना, संगीत आणि वाद्यवृंद यांनी सध्याची जाखडी वेगवान आणि रंगीतसंगीत बनली आहे.आता जाखडीचा जंगी सामना जणू प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. कोकणातील लोककला हीच जतन करण्यासाठी आणि रसिक मनोरंजनासाठी  रायगड - रत्नागिरी असा दिग्गज शाहिरांचा जंगी मुकाबला होणार आहे. यामध्ये शक्तीवाले शाहीर प्रभाकर धोपट यांच्याविरुद्ध तुरेवाले शाहिर ज्ञानदीप भोईनकर शक्ती-तुरा रसिकांचे मनोरंजन करणार आहेत. रसिक हो आपली उपस्थिती अनमोल असून हा सामना मंगळवार दि.१५ जुलै २०२५,रोजी रात्रौ ८.३० वा.मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले, पूर्व ( मुंबई ) येथे होणार आहे. या सामन्याचे आयोजन श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) यांनी केले असून अधिक माहितीसाठी किंवा तिकीटसाठी ९९३०५८५१५३ /९८३३६८९६४२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

      तसेच या कार्यक्रमानिमित्त सामाजिक पटलावर अधोरेखित व्हावा असा स्तुत्य उपक्रम समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा श्री पाणबुडी देवी कलमंच,मुंबई यांच्यावतीने गौरव होणार असून त्यांना "समाजरत्न पुरस्कार - २०२५" देऊन त्यांच्या कार्याचा गौरव होणार आहे. यामध्ये प्रमोदजी गांधी -( उद्योजक/संपर्क अध्यक्ष - मनसे ता. गुहागर ), रविंद्रजी मटकर -( अध्यक्ष - नमन लोककला संस्था ( रजि.), रंगनाथ गंगाराम गोरीवले - ( चिकन्या भाई ) अध्यक्ष - भैरी भवानी देवस्थान कमिटी, धोंडिबा दळवी -(संचालक-श्री गुळंबाई देवी विकास सेवा सोसायटी,कळसगादे), दिनेशजी कुरतडकर- (संस्थापक - कोकण कलामंच, मुंबई,), अरविंद मोरे "माऊली"- ( अध्यक्ष - श्री समर्थ कृपा भजन मंडळ (नालासोपारा -विरार ) या सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समाजरत्न पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे निवेदन शाहीर शाहीद खेरटकर करणार आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळ, सामाजिक मंडळांना आले सुग्गीचे दिवस !

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळ, सामाजिक मंडळांना आले सुग्गीचे दिवस !  

*** गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गोपाळकाला मंडळांना मिळणार मोठया प्रमाणात आर्थिक मदत.

*** गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गोपाळकाला मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण.

उरण, दि २४, (विठ्ठल ममताबादे) : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात  महानगर पालिका, नगर परिषद,जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्या आधी गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव व नवरात्रोत्सव पार पडणार आहे. त्यामुळे उत्सव साजरा करण्यासाठी दारोदारी फिरणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना किमान या वर्षी राजकीय घटकांकडून आर्थिक सहकाऱ्यासाठी फिरावे लागणार नाही. त्यामुळे या वर्षी उत्सव साजरे करणाऱ्या सामाजिक मंडळांना सुगीचे दिवस येणार आहे.यामुळे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, गोपाळकाला मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने अ, ब व क वर्गातील महापालिकांच्या प्रभाग रचनेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्या वेळापत्रकानुसार, ११ जूनपासून ते १ सप्टेंबरपर्यंत आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेनुसार प्रसिद्ध करायची आहे. तसेच निवडणुकासंबंधी विविध कार्यक्रम या वेळापत्रकानुसार पार पडायचे आहे. त्यामुळे नवी मुंबई सह इतर महानगरपालिकांची निवडणूक नोव्हेंबरपर्यंत होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे याच कालावधीत गणेशोत्सव, गोपाळकाला, नवरात्रोत्सव व दीपावली हे सण नोव्हेंबर महिन्याच्या अगोदर येत आहेत.नवी मुंबईत तसेच रायगड जिल्ह्यात गणेशोत्सव, गोपाळकाला व नवरात्रोत्सव हे उत्सव येथील सार्वजनिक मंडळे, सामाजिक संस्था आयोजित करतात. अशा वेळी त्यांना या कार्यक्रमांच्या वर्गणीसाठी आपापल्या परिसरातील महत्वाच्या व्यक्ती, व्यावसायिक, उद्योजक, विविध पक्षातील राजकीय घटकांकडे देणगी स्वरूपात मदत मागत फिरावे लागायचे. मात्र, आता वर्गणीसाठी दारोदारी फिरणाऱ्या विविध मंडळांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना निवडणुकीची आयती संधी चालून आल्याने त्यांची चंगळ होणार असल्याचे मानले जात आहे.


कोट (चौकट ):- 

निवडणुकीपूर्वी येणारे सण, उत्सव :- 

१६ ऑगस्ट-गोपाळकाला, २७ ऑगस्ट-गणेशोत्सव सुरू, ६. सप्टेंबर-विसर्जन, २२ सप्टेंबर-घटस्थापना, २ ऑक्टोबर-दसरा, १८ ऑक्टोबर-धनत्रयोदशी, २० ऑक्टोबर-नरक चतुर्दशी, २१ ऑक्टोबर-लक्ष्मीपूजन, २२ ऑक्टोबर-बालप्रतिपदा, दीपावली पाडवा, २३ ऑक्टोबर-भाऊबीज 

================================================================================

निवडणुकीच्या कालावधीत किंवा त्याच्या आधी इच्छुक राजकीय घटकांकडून  विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक उपक्रम,हळदी कुंकू सभारंभ, तीर्थस्थळे, फार्महाऊस पार्ट्या यांना मोठया प्रमाणात आर्थिक मदत मिळणार आहे.आता गणेशोत्सव, गोपाळकाला, नवरात्रोत्सव, दीपावलीनंतर निवडणूक होणार असल्याने गणेशोत्सव मंडळ, गोपाळकाला मंडळ, नवरात्रौत्सव मंडळ यांना सुगीचे दिवस आले आहेत  यात शंका नाही.
देवेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते, उरण

पनवेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सप्टेंबरपासून उड्डाण !!

पनवेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सप्टेंबरपासून उड्डाण !!

** खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतला आढावा.

उरण, दि २४, (विठ्ठल ममताबादे) : मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल येथील लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला वेग आला आहे. इंटर टर्मिनल कनेक्टिव्हिटी असणारा भारतातील हे पहिलेच विमानतळ असणार आहे. वार्षिक दोन कोटी प्रवासी क्षमता असलेले टर्मिनल एक सप्टेंबर २०२५ पासून सुरु होईल. येथून आंतरराज्यीय विमानसेवा प्राथमिक स्तरावर सुरु होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

          मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट दिली. कामाचा संपूर्ण आढावा घेतला. अधिकाऱ्यांना कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या. अदानी एरपोर्ट विभागाच्या सीईओ  मिनल नाईक, सिडको प्रोजक्ट मॅनेजर गीता पिल्ले यांनी विमानतळाच्या कामाचे सादरीकरण दिले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, जिल्हा प्रमुख अतुल भगत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विनोद साबळे, शिवसेना पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, पनवेल शिवसेना तालुका प्रमुख रघुनाथ पाटील, उरण तालुका प्रमुख दिपक ठाकूर, शिवसेना शहर प्रमुख प्रसाद परब, तुकाराम सरख, सुनिल गोवारी, प्रसाद सोनवणे, शिवसेना उपमहानगर प्रमुख महेश सावंत, शिवसेना संपर्क प्रमुख मंगेश राणवडे, शिवसेना महिला उरण विधानसभा जिल्हा संघटिका मेधाताई दमडे व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


          खासदार बारणे म्हणाले, पुणे आणि मुंबईला जोडणाऱ्या पनवेलमध्ये हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे.  मेट्रो १, मेट्रो २, मेट्रो ३ यासह वॉटर टॅक्सी, स्थानिक लोकल ट्रेन सेवा आणि भविष्यातील मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन यांची थेट कनेक्टिव्हिटी आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून नवी मुंबई विमानतळापर्यंत देखील थेट कनेक्टिव्हिटी असणार आहे. प्रदूषण रहित 'ग्रीन एअरपोर्ट' कन्सेप्ट राबविली जाणार आहे.११५० हेक्टर इतक्या मोठ्या परिसरात एअरपोर्टचा विस्तार होत आहे. विमानात इंधन भरण्याची अंडरग्राउंड पाईपलाईन तर्फे (ASF) प्रणाली कार्यन्वित केली जाणार आहे. सप्टेंबर २०२५ पासून टर्मिनल वन सुरू होणार आहे. त्याची वार्षिक दोन कोटी प्रवासी क्षमता असणार आहे. २०२९ पर्यंत टर्मिनल टू सह जवळजवळ ८० टक्के कामकाज पूर्ण होईल असे अपेक्षित आहे. सन २०३६ पर्यंत चार टर्मिनल्स, एक व्हीआयपी टर्मिनल, जनरल एव्हिएशन (खाजगी विमाने) देशातील सर्वात मोठे कार्गो डेपो असे संपूर्ण विमानतळ शंभर टक्के विकसित होणार आहे. ३.७ किलोमीटरचा सर्वाधिक लांबीचा रनवे असणार आहे. त्यावर मोठी कार्गो विमाने व एअरबस ए ३८० सारख्या विमानांचे लँडिंग आणि उड्डाण शक्य होणार आहे. मुंबईच्या सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ जवळ दुप्पट प्रवासी व विमानांच्या दळणवळणाची क्षमता आहे.

कोट (चौकट) :- 
विमानतळाच्या कामाने गती घेतली आहे. सप्टेंबर २०२५ रोजी आंतरराज्यीय विमानसेवा प्राथमिक स्तरावर चालू होईल. सर्व वाहतूक व्यवस्थेला विमानसेवा जोडल्या जाणार आहेत. यामध्ये मेट्रो, भूमिगत रेल्वे, बुलेट ट्रेन या सेवेचा समावेश आहे. २०२९ पर्यंत आंतरराष्ट्रीय विमाने पूर्णपणे उड्डणे घेतील. देशातील महत्वाचे व मोठे विमानतळ म्हणून याकडे पाहिले जाते. विमानतळासाठी केंद्र सरकार, सिडको यांच्या माध्यमातून लागणारे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.
श्रीरंग बारणे
खासदार, मावळ

नवीमुंबई विमानतळाला दिबांच्या नावाबाबत आजतरी सरकारला सुबुद्धी सुचेल का ?

नवीमुंबई विमानतळाला दिबांच्या नावाबाबत आजतरी सरकारला सुबुद्धी सुचेल का ?

** महेंद्रशेठ घरत यांचा दि.बा.पाटील साहेबाना अभिवादन करत सरकारला सवाल
उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) : शेतकरी प्रकल्पग्रस्तांचे नेते, लोकनेते दि. बा. पाटील शेवटच्या श्वासापर्यंत न्याय हक्कांसाठी लढले. देशपातळीवरील गोरगरिबांसाठी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलेल्या नेत्यांमध्ये ते आहेत. उरणमध्ये प्रकल्पग्रस्तांचे जे ऐतिहासिक आंदोलन झाले, त्यांचे ते प्रणेते आहेत. त्या आंदोलनात पाच हुतात्मे झालेत. त्यामुळे यांची जाण ठेवून तरी नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावाबाबत आजतरी सरकारला सुबुद्धी सुचेल का ? दिबांचा आज १२ वा स्मृतिदिन आहे. म्हणजे ते जाऊन एक तप झाले. सरकार किती दिवस चालढकल करणार, असे रोखठोक मत आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी दिबांच्या स्मृतीस अभिवादन करताना व्यक्त केले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबाबत काॅ. भूषण पाटील जासई येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांना महेंद्र शेठ घरत यांनी काँग्रेसच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला. दि. बा. पाटील साहेब ही आमची अस्मिता आहे तिला नख लावण्याचे धाडस कुणी करू नये, असे मतही महेंद्रशेठ घरत यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी मंगळवारी (ता. २४) लोकनेते दि.बा. पाटील साहेबांना सकाळी ९ वाजता जासई येथे अभिवादन केले. यावेळी दिबांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्मरण केले.त्यानंतर त्यांनी पनवेल येथील संग्राम बंगला येथे दिबांना अभिवादन केले. यावेळी दिबांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी अतुल पाटील, मनीषा पाटील आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

केडीएमटीच्या डोंबिवली बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीने आणि अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त !

केडीएमटीच्या डोंबिवली बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीने आणि अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त !             कल्याण डों...