Saturday, 27 June 2020

उद्धव ठाकरे यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय, एवढीच राहणार मूर्तीची उंची!

उद्धव ठाकरे यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय, एवढीच राहणार मूर्तीची उंची!


' येणारा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करू यात. श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्वाची नाही तर भक्ती महत्वाची आहे.'


मुंबई 26 जून: महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने गणेशोत्सवाबाबत सरकार काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व मोठ्या गणेश मंडळाशी चर्चाही केली होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांशीही चर्चा केली. त्यानंतर आज त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करूया. श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्वाची नाही तर भक्ती महत्वाची आहे. मूर्ती 4 फुटापर्यंत असावी व गणेशोत्सव काळात कुणीही कुठेही गर्दी करू नये  असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपण सारे येणारा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करू यात. श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्वाची नाही तर भक्ती महत्वाची आहे. मूर्ती 4 फुटापर्यंत असावी व गणेशोत्सव काळात कुणीही कुठेही गर्दी करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, 'कोरोना'मुळे प्रत्येक क्षेत्रात संकट आले आहे. त्या संकटापासून धर्म, परंपरा, संस्कृतीही सुटलेली नाही. गर्दी टाळण्यासाठी देशभरातील सर्वच प्रार्थनास्थळे बंद ठेवली आहेत, हे क्लेशदायक असले तरी मनुष्यहानी टाळण्यासाठी याशिवाय दुसरा उपाय आज नाही.

आता सणांचा राजा गणेशोत्सव येत आहे. गणेशोत्सवाची एक उज्ज्वल परंपरा महाराष्ट्राने जपली आहे. मुंबई-पुण्यातील भव्य गणेशमूर्ती, देखावे जगाचे आकर्षण ठरते. ते पाहण्यासाठी 11 दिवस प्रचंड गर्दी होत असते. निदान या वर्षी तरी आपल्याला हे सर्व टाळावे लागेल.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मुंबईसह महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेश मंडळांशी माझी चर्चा झाली. शिस्तीचे व सामाजिक भान ठेवून उत्सव करावा यावर एकमत झाले.

"Corona चा खरा धोका मुंबईबाहेर? धक्कादायक आकडेवारी आली पुढे".

गणरायांचे आगमन घरी होईल तसे सार्वजनिक उत्सवी मंडपांतही होईल. गणराय येताना महाराष्ट्रासाठी आशीर्वाद, सुरक्षा कवच घेऊनच येतील. पण भव्य मूर्तीऐवजी 4 फुटांपर्यंतच्या मूर्तीचीच मंडपात प्रतिष्ठापना व्हावी, यावर एकमत झाले आहे.

मोठ्या मूर्तीमुळे त्यांचे आगमन व विसर्जनप्रसंगी जास्त कार्यकर्ते लागतात. ते टाळावे लागेल. शेवटी मूर्तीची उंची नाही तर भक्ती महत्वाची आहे. मंडपात नेहमीची गर्दी नको. गणरायांचे विसर्जन कमीत कमी गर्दी, नियमांचे पालन करत होईल. मंडप देखील लहान आणि साधेच पण सुंदर असावेत याची काळजी घ्या. उत्सवास भीतीचे गालबोट लागू नये यासाठीच सार्वजनिक मंडळांशी चर्चा करून हे सर्व ठरले आहे.

महाराष्ट्र हादरला! एकाच दिवसात विक्रमी 5024 जणांची वाढ, संख्या गेली दीड लाखांवर

कोरोनामुळे आषाढीचा भव्य पालखी सोहळा व लाखो वारकऱ्यांची पंढरी वारीही रद्द केली आहे. पण पालखीची परंपरा न मोडता हे केले. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहेच! ती परिस्थिती समजून घेईल. विघ्नहर्ता गणराया पाठीशी आहेच असंही मुख्यमंत्र्यांनी आपल्या आवाहनात म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment

विकसित भूखंड द्या, अन्यथा बेमुदत आंदोलन सुरू रहाणार - कॉम्रेड रामचंद्र म्हात्रे.

विकसित भूखंड द्या, अन्यथा बेमुदत आंदोलन सुरू रहाणार - कॉम्रेड रामचंद्र म्हात्रे. उरण दि ४, (विठ्ठल ममताबादे) : सिडको भवन येथील प...