Tuesday 28 July 2020

कोरोना संकटातही शिक्षक -विद्यार्थी संवाद ठेवणारे शिक्षक-भालचंद्र गोडांबे !!

कोरोना संकटातही शिक्षक -विद्यार्थी संवाद ठेवणारे शिक्षक-भालचंद्र गोडांबे !! 



मुरबाड ( मंगल डोंगरे ) :
   गेले चार महिने संपूर्ण जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जगच ठप्प झालेले पाहायला मिळाले . उद्योग ,व्यवसाय ,व्यापार ,शिक्षण ,सर्वच बंद. महाराष्ट्र शासनाने दहावी -बारावीच्या परिक्षा घेऊन बारावीचा निकाल घोषित केला . दहावीचा निकाल आज लागणार आहे  परंतु नविन शाळा प्रवेश व प्रत्यक्ष अध्यापन कधी सूरु करायचे याबाबत शासन ठाम भूमिका  घेताना दिसत नाही. दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या १५ जून पासून सूरु होतात परंतु कोरोना संकटात ते शक्य नसल्याने आॕनलाईन अध्यापनात  अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे .कारण ग्रामीण भागात तर अनेक पालकांकडे मोबाईल फोनच उपलब्ध नाहीत. तर काही ठिकाणी नेटवर्क नसतो. आदिवासी दुर्गम डोंगराळ भागात एका घरात दोन ते तीन मुले असतील तर वडिलांच्या एका फोन वर कसा अभ्यास करायचा अशा एक ना अनेक तांत्रिक अडचणी या आॕनलाईन शिक्षणात येत आहेत. शिवाय अनेक दिवस विद्यार्थ्यांचा शिक्षणाशी संपर्कच तुटलेला आहे. 
      ना वह्या ना दप्तर ना पाटी ना पेन्सिल अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, त्यांच्यात शाळेबद्दल ,शिक्षणाबद्दल ओढ निर्माण व्हावी . विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नयेत म्हणुन मुरबाड शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळा नं.२ येथिल प्राथमिक शिक्षक भालचंद्र गोडांबे यांनी घरी न बसता गेली पंधरा दिवस इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शासनाचे नियम पाळत सामाजिक अंतर राखून विद्यार्थी व पालकांशी संवाद साधून अभ्यासाबाबत चौकशी व मार्गदर्शन करत आहे. लाॕकडाऊन मधे त्यांनी सूरू केलेल्या  स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.तर विद्यार्थ्यांना ही त्यांच्या भेटीने प्रत्यक्ष शाळेत असल्या सारखेच वाटत आहे.मात्र सरकार शाळा सुरु करण्या संदर्भात कधी ,काय ,आणि कसा निर्णय घेईल. हे मायबाप सरकारच जाणे.पण आम्ही आमचे विद्यार्थी, पालकां सोबत असलेले नाते हे अखंडपणे जोपासण्याचा  प्रयत्न करत राहु.असे मत भालचंद्र गोडांबे सर हे ठामपणे सांगत आहेत.

No comments:

Post a Comment

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने  रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :  ...