Friday, 1 January 2021

कोकण कला मंच मुंबई/ग्रामीणतर्फे रविवारी लांजा, देवरुख येथे महत्वपुर्ण सभेचे आयोजन !

कोकण कला मंच मुंबई/ग्रामीणतर्फे रविवारी लांजा, देवरुख येथे महत्वपुर्ण सभेचे आयोजन !


मुंबई (शांत्ताराम गुडेकर) :

         रत्नागिरी जिल्ह्याची ओळख म्हणजे बहुरंगी नमन.बहुरंगी नमन ही लोककला खरं तर फार प्राचीन काळापासून आपल्या करमणूकीचं प्रमुख माध्यम बनून राहीली आहे. या लोककलेत सद्या काही नमन मंडळांनी ग्रामीण तसेच मुंबई सारख्या शहरी भागात व्यसायिकता सुध्दा आणन्याचा प्रयत्न केला आहे. हे खरं तर प्रगतीचं ल‌क्षण आहे. आणि त्याचं स्वागत सुध्दा व्हायला हवं. त्याच बरोबर बहुरंगी नमन कलेचा पाया ज्या गाव मंडळं व वाडी मंडळांनी घातला त्यांच कलेच्या प्रती असणारं  निस्सीम प्रेम, निष्ठा व त्याग यामुळे बहुरंगी नमन ही लोककला आजपर्यंत टीकून राहीली आहे. याचा विचार करता त्या मंडळांना व कलावंताना खरं तर धन्यवाद द्यायला हवे. कारण त्यांच्याच या निस्वार्थी प्रयत्नांमुळे ही लोककला जिवंत राहीली आहे. त्याच बरोबर आज मुंबई सारख्या जागतिक व्यापाराचं केंद्र असणाऱ्या शहरी भागात, मुळचे रत्नागिरीकर असणाऱ्या आपल्याच मुंबईकर कलावंतांनी या कलेमध्ये परंपरा व आधुनिकता यांचा योग्य मेळ बसवून नाविन्यता आणत इतर लोककलांच्या सादरीकरणाचा बाज पहाता नमन लोककला कुठेही मागे नाही हे दाखवून दिले आहे. 

             मात्र आज या लोककलेचा मान आणि सन्मान ज्या पध्दतीने शासन दरबारी व्हायला हवा होता तो मात्र झालेला दिसत नाही. त्याला करणे अनेक आहेत मात्र त्यांचा विचार करता त्याला बहुतांशी आपणच सारे  जबाबदार असल्याचं आपल्या सखोल विचारा अंती लक्षात येईल. सार्वजनिक जिवनात कोणतीही गोष्ट संघटीत होऊन संघर्ष केल्या शिवाय आज पर्यंत कुणालाच  मिळाली नाही. त्या बाबीला आपण तरी अपवाद कसे काय ठरणार... ! आणि म्हणून बहुरंगी नमन या लोककलेला व त्यातील लोककलावंत यांना न्याय मिळवून देण्यासाठी व शासन दरबारी बहुरंगी नमन लोककलेचा शासन मान्य लोककलेचा दर्जा मिळावा यासाठी मागील काही दिवसांपासून जे संघटीत होण्या संबंधी विचारविनिमय करत होतो त्याचाच भाग म्हणून  मुंबई आणि ग्रामीणची महत्वपुर्ण सभा घेण्यात येत आहेत. सभेत शाशन दरबारी या कलेला राजाश्रय मिळवणे,विखुरलेल्या कलाकार मंडळी एकत्र करणे,शासनमान्य महोत्सव मिळवणे,शासकीय अनुदान मिळवणे, सरकारीतर्फे कलाकार मंडळींना जी पेंन्सन मिळते ती आपल्या कलाकार मंडळींना कशी प्राप्त करता येते याचे सखोल योग्य मार्गदर्शन करुन कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची माहीती देणे,संघटनेचा मुख्य गाभा हा मुंबई व ग्रामीण कलाकार मंडळींचा असावा यावर चर्चा होणार आहे.

                संपुर्ण रत्नागिरी जिल्ह्यात संघटनात्मक पध्दतीने सर्वांना सोबत घेऊन संघटनेची बांधणी करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार लांजा- राजापूर तसेच संगमेश्वर तालुका वासियांसाठी रविवार दि.०३/०१/२०२१ वेळ सकाळी १०.०० वा.गजानन  गंगाराम गुरव,सती माता मंदिर,मु पो लांजा(गुरव वाडी)लांजा  एसटी डेपो च्या  मागे ता. लांजा, जि रत्नागिरी येथे पहिला सभा दुसरी सभा हॉटेल पवार,पवार हॉटेल च्या पाठीमागे,वीर सावरकर चौक,देवरुख ता संगमेश्वर येथे सायंकाळी ०४ वाजता आयोजित केली आहे.वरील आयोजना प्रमाणे सभेचे आयोजन लांजा नमन संघटना कार्यकारणी व राजापूर नमन कलावंत, तसेच संगमेश्वर तालुका नमन मंडळांचे चालक, निर्माते, गावकर व अधिकारी मंडळी यांच्या समवेत करत आहोत, तरी सदरची नोंद संबंधीतांनी घ्यावी या महत्वपुर्ण सभेला मुंबई/ग्रामीण नमन कलाकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे निमंत्रक कोकण कला मंचतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

नालासोपारा टाकीपाडा येथे अनधिकृत बांधकाम सर्रास सुरूच...

नालासोपारा टाकीपाडा येथे अनधिकृत बांधकाम सर्रास सुरूच... ***अनधिकृत बांधकाम करणारा भुमाफीया ओवेस पटेल ला महापालिकेचे संरक्षण... ...