बालकामगार एक समस्या !!
"एका बाजूने घर शाळेत घुसले पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने शाळा घरात आली पाहिजे"
*✒️लेखन पत्रकार चेतन महाजन ९८२३५९३१४८*
बालपण प्रत्येकालाच प्रिय असते परंतु प्रत्येकाचं बालपण रम्य असते. आज पण आपण बालकामगार एक समस्या या विषयी बघणार आहोत, एक भीषण समस्या आहे सर्व सामाजिक समस्यांचे मूळ हेच आहे. ज्या देशातील तरुण निरोगी उत्साही, असतात तो देश प्रगत असतो. परंतु बाल कामगारांना अशी समस्या आहे. जीचा शेवट गुन्हेगारीने होतो. याला जबाबदार असते की आर्थिक परिस्थिती निरक्षरता समाजातील दुर्बल घटक इत्यादी चला तर मग आता मूळ विषयाकडे वळू या.
*🛑ठळक मुद्दे🛑*
📌बालकामगार विरोधी कायदा अस्तित्वात.
📌 लाखो बालकामगार अजूनही कार्यरत.
📌 दरिद्री मुळे बालकामगार निर्माण होतात हॉटेल मध्ये टेबल पुसणे पासून कारखान्यापर्यंत बालमजूर आहेत.
📌 बाल कामगार विरोधी कायदा अपुरं बालपण हरवते रम्यतेचा अभाव वाट्याला लाड कौतुक कधीच येत नाही प्रसंगी मारझोड
📌डोक्यावर भीषण परिणाम होऊन समाजविरोधी वृत्ती
📌 कधीतरी कोणीतरी त्यांचे कौतुक करावे
📌काही शासकीय योजना असायला पाहिजेत समाजातील लोकांनी पुढाकार घ्यायला हवा.
*बालकामगारांच्या समस्या काय असतात ते जाणून घेऊया मागे एकदा दिवाळीत तमिळनाडू तूं एका फटाक्याच्या कारखान्यात आग लागली या कारखान्यातील पंचेचाळीस कामगार दगावले कित्येक जण गंभीर जखमी झाले अनेकांची दृष्टी गेली काही जणांना बहिरेपण आले त्या कामगारांचे वय होते नऊ वर्ष ते सोळा वर्ष दिवाळीचे शोककळा पसरली देशभर जेव्हा मुले आनंदाने फटाके वाजवत असतात तेव्हा त्याच वयाची मुले आपला जीव धोक्यात घालून त्या कारखान्यात काम देखील करत असतात, आणि हे केवळ पोटासाठी देशातील काही बालकांच्या वाटेला आहे भूक का यावेत बालकामगार निर्माण होतो. तो दरिद्यातून काही मुलांना बालपणी पोरके व्हावे लागते आई मरण, पावते तर बाप तुरुंगात असतो. मग या मुलांना पोसणार कोण काही मुले लहानपणी हरवतात; तर काही मुलांना जाणून-बुजून सोडून दिले जाते काही मुलांना घर असते पण ते घर चालवण्यासाठी त्यांना बालवयातच चाकरी करावी लागते. बालकामगार हॉटेलमधून टेबलावर फडके मारण्याचे व पाणी देण्याचे काम करतात फलाटावर कचरा उचलण्याचे काम करतात तर काहीवेळा घरकाम करणे गाड्या पुसणे वर्तमानपत्र टाकण्याची.*
अशी मोलमजुरीची कामे करतात त्याला अतिशय धोकादायक कामे त्यांच्या वाट्याला येतात शिवकाशी च्या फटाक्याच्या कारखान्यात अशी मुले कामे करतात जी कामे जीवघेणे असतात काश्मीरमधील गल्लीची आपण नाचवतो पैसे तो बालके त्यांच्यासोबत राबत असतात काही बालके कचऱ्यातील भंगार गोळा करून अनेक रोगांना जवळ करतात तर दुसरे महायुद्ध आणि तसेच झालेल्या इजराइल पॅलेस्टाइन युद्धात अनेक बालकामगारांना सहभागी व्हावे लागले.
अशा सर्व प्रसंगी बालकामगार विरोधी कायदा लंगडा पडतो, या मुलांचा विचार करताना मनात येते, ती रम्य ते बालपण युक्ती त्यांना कशी पटावी किंबहुना यांचे बालपण त्यांच्या वाटेला येण्यापूर्वी हरवलेले असते लाड कौतुक वात्सल्य या गोष्टी त्यांच्या वाटेला कधीच येत नाहीत याउलट त्यांना अर्धपोटी राहावे लागते मालकाची मारहाणही सहन करावी लागते. अशा मुलांना शिक्षण संस्कार कुठून देणार..? शिक्षण मोफत केले तरी शाळेत जाण्यासाठी इतर साधने नसतात. म्हणून विनोबा भावे म्हणतात एका बाजूने घर शाळेत घुसले पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने शाळा घरात आली पाहिजे या बांधकाम करायच्या वृत्तीवर शरीरावर त्यांचा परिणाम झाल्यावाचून कसा राहणार या मुलांची वृत्ती खडबडीत होतात समाजाविषयी देशा विषयी त्यांच्या भावना तिरस्काराच्या बनतात आणि मग त्यातून ते गुन्हेगारी वृत्ती वाढीस लागते हा धोका समाजातील काही विचारवंतांनी ओळखला आहे. त्यामुळे घरात असलेल्या बालकांसाठी काही लोकांनी संस्था काढल्या ; त्यांना घराची उपमा या वात्सल्य देण्याचे प्रयत्न केला आहे. काही तरुण-तरुणी अशा मुलांसाठी रस्त्यावर शाळा चालवतात त्यांच्या सुखदुःखाची एकरूप होण्याचा प्रयत्न करतात. बालदिन सारख्या दिवशी आवर्जून या मुलांना आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हे प्रयत्न फार अपुरे आहेत. बालपण हरवलेले बालकांना त्यांचे बालपण मिळवून देण्यासाठी कुटुंब वात्सल्य घरादाराचे उघडली गेली पाहिजे.
बालकामगार समस्या हा विषय कसा वाटला हे कमेंट करून निश्चितपणे कळवा. तसेच समाजात जर तुम्हाला असे काही बालकामगार आढळले जात असलेल्या हॉटेलमध्ये बस स्टॅन्ड रेल्वे स्टेशन इत्यादी ठिकाणी असे लहान मुले जर आढळून आले तर त्यांची सूचना चिल्ड्रन्स हेल्पलाईन यांना जरूर द्या.
कारण बालपण हे प्रत्येकाचा हक्काचं घडवण्याचे स्वतःला बनवण्याचे उत्कर्ष करण्याचा आनंदाचा मौजेचे असतात त्यामुळे आपले सामाजिक योगदान आणि जबाबदारी नागरिकत्वाचे याचे भान नेहमी ठेवा. धन्यवाद!


No comments:
Post a Comment