मुंबई, ठाणेसह अर्धा महाराष्ट्र गारठला !! 'अवकाळी पाऊस व बोचरे वारे ठरले कारणीभूत'
पहाटेपासूनच पावसाची संततधार लागली ती रात्री उशिरापर्यंत कायम होती. अशीच स्थिती 3 डिसेंबरपर्यंत राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, 17 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बुधवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, कसारा, कर्जतसह, रायगड, पालघर पुणे, सातारा जिल्ह्यासह कोकणातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू झाला. मुंबईसह उपनगरांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि पावसाची रिपरिप सुरू होती. पाऊस मुसळधार नसला तरीही सर्वत्र धुक्याची चादर आणि कमालीचा गारठा असे वातावरण होते. अनेक ठिकाणी धुक्यामुळे समोरचे काहीच दिसत नव्हते. मुंबईत लोकलमधून पाऊस आणि झोंबणार्या वार्यामुळे अनेकांनी स्वेटर घातल्याचे चित्र होते. चाकरमानी कामावर जाताना छत्री आणि स्वेटरसह घराबाहेर पडले होते.
No comments:
Post a Comment