Saturday 29 January 2022

ठाणे- भिवंडी -नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, प्रवाशांचा तीन तासांपासून खोळंबा !!

ठाणे- भिवंडी -नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, प्रवाशांचा तीन तासांपासून खोळंबा !!


भिवंडी, दिं,29, अरुण पाटील (कोपर) :
          भिवंडी -नाशिक -ठाणे (घोडबंदर) ते नाशिक महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.शनिवार -रविवार सुट्टी असल्याने या मार्गांवरून नासिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहणांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचा गेल्या तीन तासांपासून वाहतूक कोंडीत खोळंबा झाला आहे. प्रवाशांना गाडीत बसून रहावे लागल्याने त्यांचा संतापाचा पारा चढला आहे.
            तसेच भिवंडी-नाशिक महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावरुण अंजूर -फाटा (भिवंडी) दिशेला जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने येथील स्थानिकांना दिखील याचा मोठा फटका बसला आहे. अंजूर फाटा -कशेळी गावा दरम्यान मेट्रो रेल्वेचे काम सुरु असल्याने ठीक ठिकाणी खड्यांचे साम्राज्य पसरल्याने या ठिकाणी धीम्या गतीने वाहतूक सुरू होती. मात्र या मार्गावरील माणकोली - अंजूर फाटा व अंजूर फाटा -कशेळी या दरम्यान तैनात वाहतूक पोलीस हे वाहतूक कोंडी सोडवण्यापेक्षा वाहन चालकांकडून पैसे वसुली कारण्याकडे जास्त लक्ष देत असल्याने त्याचा फटका वाहतूक कोंडीवर देखील होत असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिक करत आहेत. 
           आज सकाळ पासून ठाणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानंतरही वाहतूक कोंडी हटवण्यासाठी ठाणे वाहतूक विभागाचे अधिकारी या ठिकाणी फिरकलेले नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडी कशी सुटणार? असा सवाल केला जात आहे. एमएमआरडीने या महामार्गाचं काँक्रिटीकरण करावं, चांगले रस्ते बनवावेत अशी मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत. एमएमआरडीएने दोन तीनवेळा या रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे रस्त्याचे काँक्रिटीकरण हाच त्यावर एकमेव पर्याय आहे, असंही स्थानिकांचं म्हणणं आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...