समृध्दी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच, खासगी बसच्या भीषण अपघात २५ जणांचा होरपळून मृत्यूने महाराष्ट्र हादरला !!
*मदत वेळेवर मिळाली असती तर वाचले असते जीव प्रवाशांचा आरोप*
भिवंडी, दिं,१, अरुण पाटील, (कोपर) :
समृध्दी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून आतापर्यंत कित्येकांना आपला जीव गमावावा लागला असतानाच नागपूरहून पुण्याकडे समृध्दी महामार्गा वरून निघालेल्या एका खासगी लक्झरी बसला शुक्रवारी मध्यरात्री १,३० वा, बुलढाणा जिल्ह्यातील पिंपलखुटा गाव लगत भीषण अपघात होउन अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण ३३ प्रवासी होते, त्यातील ४ प्रवासी अपघाता नंतर बाहेर पडले. मदत वेळेवर मिळाली असतीतर काही प्रवाशांचा जीव वाचला असता असा आरोप वाचलेल्या प्रवाशांनी केला आहे.या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्रीश्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री .देवेंद्र फडणवीस यांनी घटना स्थळी भेट दिली व मृतांना ५ लाखांची मदत घोषित केली आहे.
नागपूरहून समृद्धी महामार्गावर पुण्याकडे निघालेल्या या बस मध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावरून जात असताना बस दुभाजकाला धडकली, त्यानंतर बसने पेट घेतला. बस मध्ये असणाऱ्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. बस पलटी झाल्याने बसचा दरवाजा हा खालच्या भाग बाजूला आला त्यामुळे काही प्रवाशांनी बसच्या काचा फोडून बाहेर पडले.
या अपघाता नंतर समृद्धी महामार्गावर वेग नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रणा बनवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.अपघात स्थळाची पाहणी केल्यानंतर अपघाताची भीषणता जाणवली असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अपघात टाळण्यासाठी उपाय योजना करणार असल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ते सध्या घटनास्थळाची पाहणी करत असून घटनेची माहिती घेत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते घटनास्थळाची पाहणी केली आहे.
वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे हे चालकाच्या हातात असते. या प्रकरणी सविस्तर चौकशी होईलच आणि त्यावेळी सत्य समोर येईलच. मात्र २५ प्रवशांचा मृत्यू झालाय, ही अतिशय दुर्दैवी घटना असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटल आहे.ते घटनास्थळावर पोहोचले असून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर ते औरंगाबाद या मार्गावर बस प्रथम उजव्या बाजूला असलेल्या लोखंडी खांबाला धडकली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या मधोमध असलेल्या काँक्रीटच्या दुभाजकाला धडकल्याने बस पलटी झाली. बस डावीकडे वळली, त्यामुळे बसचा दरवाजा खाली आला. अशा परिस्थितीत लोकांना बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता.
अपघातानंतर बसमधील डिझेल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरले. डिझेल सांडल्यामुळे बसला आग लागली. पोलिसांनी बसमधून २५ मृतदेह बाहेर काढले आहेत. गंभीर भाजल्याने मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले असून आता डीएनए चाचणीची मदत घेणार आहेत.
No comments:
Post a Comment