अजित पवार पाचव्यांदा व पंचवार्षिक मध्ये तिसऱ्यांदा उप मुख्यमंत्री !
ईडीची नोटीस देऊन सत्तेत सामील करून घेऊन सिंचन घोटाळ्यातून मुक्त केले - शरद पवार
भिवंडी, दिं, २, अरुण पाटील (कोपर) :
अजित पवार यांनी पुन्हा एकदा मोठा धक्का देताना रविवारी उप मुख्य मंत्रीपदाची शपथ घेतली. यासोबतच अजित पवार पाचव्यांदा व पंच वार्षिक मध्ये तिसऱ्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री बनले आहे. राज्याच्या राजकारणात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा त्यांचाच विक्रम त्यांनी मोडला आहे. अजित पवार व छगन भुजबळ यासह अनेकांना पंत प्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी काही दिवस पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर सिंचन घोटाळ्या आरोप करत ईडीच्या नोटिसा दिल्या होत्या. त्या नंतर आता भाजपने अजित पवारांना सत्तेत घेऊन त्यांना या घोटाळ्यातून मुक्त केले आहे अशी उपरोक्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री.शरद पवार यांनी दिली आहे.
तसेच पुढे बोलताना श्री.शरद पवार म्हणाले की,राष्ट्रवादी पक्षावर श्री.मोदींनी काही दिवसापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मग त्याच लोकांना पुन्हा राज्याच्या मंत्री मंडळात स्थान दिले.याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप वास्तव नव्हते, त्यामुळे मी पंतप्रधानांचा आभारी आहे त्यानीं पक्षावरील आरोपाला मुक्त केले असे ते पुढे म्हणाले
तसेच श्री.शरद पवार यांनी पुढे बोलताना सांगितले की, ज्यांना जायचे नाही ते थांबले नाही,आमच्या पक्षाची नवीन टीम तुम्हाला दिसेल शापत्विधी नंतर मला कोणाचाही फोन आला नाही, त्यामुळे त्याचा विचार करायचा नाही. प्रफुल्ल पटेल सुनिल तटकरे यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही.उभी करू शकतो कर्तुत्वाची नवीन पिढी असे मत शरद पवार यांनी व्यक्त केला आहे
अजित पवार यांनी ११ नोव्हेंबर २०१० रोजी सर्वप्रमथ उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तब्बल १ वर्ष ३१९ दिवस या पदावर राहिल्यानंतर २५ सप्टेंबर २०१२ रोजी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते.
यानंतर तीनच महिन्यांत पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वात ७ डिसेंबर २०१२ रोजी अजित पवार यांनी पुन्हा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत ते या पदावर कायम राहिले. एकाच पंचवार्षिकमध्ये दोन वेळा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
अजित पवार यांनी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली ती २३ नोव्हेंबर २०१९ रोजी. त्यांचा हा शपथविधी संपूर्ण देशभरात चांगलाच चर्चेत राहिला. सकाळीच घेतलेल्या या शपथेला पहाटेचा शपथविधी म्हणून संबोधले गेले. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नेतृत्वात तीन दिवसांसाठी अजित पवार हे उपमुख्यमंत्री राहिले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दर्शवल्याने अजित पवार यांचे हे बंड तीनच दिवसांत फोल ठरले.
देवेंद्र फडणवीसांसोबत पहाटेच्या शपथविधीचा प्रयोग फसल्यानंतर अजित पवारही पुन्हा महाविकास आघाडीसोबत आले आणि पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. ३० डिसेंबर २०१९ रोजी अजित पवार यांनी चौथ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषवले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळेपर्यंत २ वर्षे १८१ दिवसांसाठी ते या पदावर कायम राहिले.
..आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी आज म्हणजेच २ जुलै २०२३ रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते पाचव्यांदा या पदावर विराजमान झाले आहे. विशेष म्हणजे एकाच पंच वार्षिक मधील हे त्यांचे तिसरे उपमुख्यमंत्रीपद आहे.
No comments:
Post a Comment