'स्वच्छता ही सेवा' या अभियान अंतर्गत बोरिवली पश्चिम येथे श्रमदान आणि स्वच्छता मोहीम !!
*एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेकडून बोरिवलीत स्वच्छता मोहीमेत सहभाग*
मुंबई, (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) :
स्वच्छतेसाठी 'एक तारीख, एक तास' या रविवारी १ ऑक्टोबर रोजी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल बनवुयात असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. 'स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा' या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र नागरी तसेच ग्रामीण भागात 'एक तारीख- एक तास' या उपक्रमांतर्गत प्रत्येकाला ते जिथे कुठे असतील तिथे स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात सहभाग घेण्यात आला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या २ ऑक्टोंबर जयंती निमित्त भारतात स्वच्छतेचा जन जागरण पुकारण्यात आला आहे. निरोगी आयुष्यासाठी स्वच्छताही सर्व श्रेष्ठ या संकल्पनेतून आज भारतात स्वच्छ भारत अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात आले. या मोहिमेत सर्व संस्था, संघटना, पोलीस बांधव, पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले. आजच्या आवाहन करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने देखील सहभाग घेत जन जागृती केली. आर मध्ये विभाग वार्ड उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्या आवाहनाने शिंदे गटाचे शिवसेना विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बोरिवली पश्चिम विधानसभा प्रमुख यांच्या वतीने बोरिवली पश्चिम विभाग येथील मुख्य रस्त्याची सफाई करण्यात आली. या मोहिमेत नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बृहन्मुंबई महानगर पालिका मार्फत १ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वच्छता हीच सेवा अभियान आयोजीत केले गेले.बृहन्मुंबई महानगर पालिकाचे अधिकारी सोबत लोकसभा संपर्क प्रमुख श्री.सचिन म्हात्रे, बोरिवली विधान सभा प्रमुख सौ.अलका ताई सापळे, उपविभाग प्रमुख सौ. प्रियांका ताई करलकर, बोरिवली विधानसभा संघटक सौ. वंदनाताई नार्वेकर, शाखाप्रमुख श्री.संतोष हिवाळे, शाखा संघटक सौ. चैताली तावडे, शाखा समन्वयक सौ.शयनी सुर्वे, उपशाखा संघटक सौ.आरती मट्टू,शाखा समन्वयक (शाखा क्रमांक -१७) हेमांगी माळी, कार्यालय प्रमुख (शाखा क्रमांक -१७) सौ मंजू नाभी या सर्वांनी अभियानात सहभागी होऊन श्रमदान केले.
याच अनुषंगाने आपल्या सर्वांना 'स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा' हे अभियान यशस्वी करायचं आहे. 'एक तारीख एक तास' या उपक्रमाला स्वच्छता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला एक तास तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे. आपण, आपले कुटुंबिय किंवा सहकारी जिथे कुठे असाल, तिथे आपण स्वच्छता मोहिम राबवून या अभियानात योगदान द्यायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
No comments:
Post a Comment