Friday 23 August 2024

देवरुख -बोंड्ये एस. टी सुरु, सहा महिन्यांपासून होती बंद !!

देवरुख -बोंड्ये एस. टी सुरु, सहा महिन्यांपासून होती बंद !!

** गावकऱ्यांची प्रतीक्षा संपली.. आता होणार सुखाचा प्रवास 

कोकण (शांताराम गुडेकर) :
                   रत्नागिरी जिल्ह्यामधील  संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर मार्गांवरील बोंड्ये गावातील नागरिकांची एस. टी ची प्रतीक्षा संपली असून आजपासून पुन्हा देवरुख -बोंड्ये  एस. टी. ही देवरुख  एस. टी आगार मधून सोडण्यात आली.ही एस. टी सहा महिन्यांपासून खड्डे आणि झाडांच्या वाढलेल्या फांदया, चिखल असं कारण देत बंद करण्यात आली होती.बोंडये बससाठी पत्रकार संदीप गुडेकर, माजी सरपंच ललिता गुडेकर, विद्यमान सरपंच नम्रता पांचाळ यांनी देवरुख आगार व्यवस्थापक यांना पत्रव्यवहार करून झाडीची असलेली अडचण तसेच पडलेले खड्डे ही समस्या मार्गी लागली असून देवरुख -बोंड्ये एस. टी सुरु करावी अशी मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामस्थ यांनी वाढलेली झाडे, फांदया तोडून मार्ग मोकळा केला. पडलेले खड्डे भरले.झालेल्या मागणीचा विचार करून तसेच सतत होत असलेला पाठपुरावा लक्षात घेऊन  देवरुख आगार व्यवस्थापक यांनी एस. टी सुरु केली. त्यामुळे बोंड्ये गावच्या नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून  लोकप्रतिनिधी, संबंधिक अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रसिद्धी माध्यम यांचे आभार मानले आहेत. कारण काही दिवसांवर गणपती उत्सव आहे. हजारो मुंबईकर, अन्य भागातील पाहुणे, दिव्यांग, गरोदर महिला, या मार्गांवरून ये -जा करणार असून त्यांनाही या समस्याला तोंड द्यावे लागणार होते. विद्यार्थी, चाकरमनी (मुंबईकर), नोकरदार वर्ग यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार होता. मात्र लोकप्रतिनिधी, देवरुख आगार- रत्नागिरी विभाग यांनी मागणीची दाखल घेत एस. टी. सुरु त्यामुळे संभाव्य त्रासातून बोंड्ये गावातील लोकांची सुटका झाली आहे

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...