हिंदूंचा पराक्रम, शौर्याचा इतिहास नव्या पिढीला सांगणं आवश्यक असून त्याला सावरकर चरित्राची जोड देणं गरजेचे आहे - स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी, अभ्यासक व वक्ता पार्थ
बावस्कर
डोंबिवली, प्रतिनिधी : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ डोंबिवली विभागातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करत सावरकर जयंतीला सावरकर विचारांचा जागर करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थाचे ह्या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले.
राष्ट्राच्या सीमा या खडगांची तिखट धार आणि तोफांचे गोळे ठरवित असतात, हे तात्याराव सावरकरांचे वाक्य आज ही किती योग्य आहे आणि त्याचा आशय समजून घेत हा कार्यक्रम सर्वेश हॉल, डोंबिवली येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नाशिकचे माननीय महंत श्री. सुधीर दासजी हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी, अभ्यासक आणि प्रथितयश वक्ता श्री पार्थ बावस्करजी यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत सावरकरांचे प्रखर हिंदुत्व समजावत, सावरकरच्या जीवनातील खडतर आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर हे विराजमान होते. तसेच स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थाचे अध्यक्ष निवास कुलकर्णी हे स्टेजवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व गणेश वंदनाने झाली. ऑपरेशन सिंदूर मधील हुतात्म्यांना आदरांजली वाहून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष शशांक खेर यांनी महासंघ चालवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जावे यासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींनी सावरकरांची पुस्तके खरेदी करण्याचा आनंद घेतला.
आपल्या पूर्वजांनी त्या अटकेपार झेंडे लावलेले आहेत. तो हिंदूंच्या पराक्रमाचा, शौर्याचा, स्वाभिमानाच्या इतिहासाची आठवणं, पुन्हा एकदा नव्या पिढीपुढे सांगणे आवश्यक आहे आणि त्या सगळ्याला वीर सावरकर चरित्राची जोड देणं आवश्यक आहे. त्याच कारण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र हे तेजोमय चरित्र आहे. आणि हे तरुणपिढी पुढे मांडले जाणे अत्यंत आहे गरजेचे आहे असे श्री पार्थ बावस्कर ह्यांनी आवर्जून सांगितले. नियोजनबद्ध कार्यक्रम आयोजनाबद्दल पार्थ जी ने दोन्ही संस्थांचे कौतुक केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डोंबिवली आणि कल्याण मधील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे सदस्य यांचे मोलाचे सहकारी लाभले. या कार्यक्रमाला सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता मधुर आवाजात वंदे मातरम, राष्ट्रगीताने झाली.
No comments:
Post a Comment