पाच वर्षांपासून न्याय नाही? मुलांच्या शिक्षण, घरचा त्रास सुरेखा गोरेगावकर याचं माणगाव, रायगड येथे आमरण उपोषण...
दि. २५ नोव्हेंबर २०२५ | रायगड प्रतिनिधी
पाच वर्षांपासून सुरू असलेल्या अन्यायाविरोधात न्याय न मिळाल्याचा आरोप करत सुरेखा गोरेगावकर यांनी २४ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करण्याची घोषणा देऊन उपोषण सुरू केले. त्यांच्या निवेदनानुसार, मुलाला शाळेत मानसिक त्रास दिल्याचा तसेच स्वतःवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गोरेगावकर यांनी पुढे म्हटले की, त्यांना घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न, सामाजिक बदनामी आणि लाच मागितल्याचे प्रकार घडल्याची तक्रार स्थानिक पोलिसांकडे करण्यात आली होती. मात्र योग्य कारवाई न झाल्यामुळे उपोषणाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, उपोषणाबाबत प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment