Sunday, 29 March 2026

रायगड ही शिवरायांची भूमी : डॉ. रागिणी नायक

रायगड ही शिवरायांची भूमी : डॉ. रागिणी नायक 

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रायगड जिल्ह्याची शान राखली : महेंद्रशेठ घरत 

उरण दि २९, (विठ्ठल ममताबादे) : "कॉंग्रेस हा जनता जनार्दनाचा पक्ष आहे. सद्यःस्थितीत देशाचे नेते राहुल गांधी सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. प्रियांका गांधी मोदींना जशास तसे उत्तर देत आहेत. मोदीजी फक्त मन की बात करतात, जनतेला मात्र वार्यावर सोडतात. ही आजची सत्य परिस्थिती आहे. महागाई गगनाला भिडली आहे. मात्र मोदी सरकारला त्याचे देणेघेणे नाही. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या संघटनावर आणि जनतेच्या समस्यांवर काम करत आहे. यापुढे जिल्हाध्यक्षांना अधिकाधिक अधिकार असतील. कॉंग्रेसचे पदाधिकारी निवडीचे निर्णय वातानुकूलित दालनात बसून दिल्लीतून होणार नाहीत, तर जनतेशी संवाद साधून जिल्हाध्यक्षांना विश्वासात घेऊन होतील. रायगड ही शिवरायांची भूमी आहे. शिवाजी महाराज यांची ख्याती जगभर आहे. त्यामुळे रायगडमध्ये कॉंग्रेसचेच वर्चस्व राहील, यासाठी आम्ही काम करून कार्यकर्त्यांना बळ देऊ," असे प्रतिपादन कॉंग्रेसच्या दिल्लीतून आलेल्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि निरीक्षक डॉ. रागिणी नायक यांनी अलिबाग येथे केले आहे. त्या पुढे म्हणाल्या, "शिवरायांच्या भूमीत आल्याचा मला आनंद आहे. 'सृजन संघटन अभियान' जो देशभर राबविला त्याची वीट मजबूत करण्यासाठी मी आली आहे." असे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या.

यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (या. २९) अलिबाग येथील 'कॉंग्रेस भवन' येथे पार पडली. यावेळी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि निरीक्षक डॉ. रागिणी नायक, प्रदीप राव, मनोज गणोरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले, "रायगडमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी खूप चांगले काम केले आहे. वर्षांनुवर्षे जिल्हा परिषदेत शेकापचे वर्चस्व असायचे, यंदा त्यांना चक्क शून्य जागा मिळाल्या. मात्र कॉंग्रेसने तीन जागा लढवून दोन जिंकल्या. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रायगड जिल्ह्याची शान राखली, हे मी अभिमानाने सांगू इच्छितो."
यावेळी रायगड जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य डॉ. मनीष पाटील, अविनाश ठाकूर यांचा रागिणी नायक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. डॉ. रागिणी नायक आणि जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी कार्यकर्त्यांच्या पक्षाविषयी भावना ऐकून घेतल्या.

यावेळी कॉंग्रेसचे सरचिटणीस ऍड.श्रद्धा ठाकूर, नाना म्हात्रे, युवा अध्यक्ष निखिल ढवळे, अलिबाग कॉंग्रेसचे राजाभाऊ ठाकूर, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच अलिबाग, मुरूड पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सेंट विल्फ्रेड्स कॉलेजच्या (पनवेल) वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा 'स्वागत समारंभ' उत्साहात साजरा !!

सेंट विल्फ्रेड्स कॉलेजच्या (पनवेल) वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा 'स्वागत समारंभ' उत्साहात साजरा !! पनवेल येथील सेंट व...