Wednesday 6 March 2024

ठाणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील दिव्यांग वस्तू विक्री प्रदर्शनातील भ्रष्टाचाराची माहिती देण्यास टाळाटाळ ?

ठाणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील दिव्यांग वस्तू विक्री प्रदर्शनातील भ्रष्टाचाराची माहिती देण्यास टाळाटाळ ?



कल्याण (संजय कांबळे) : दिव्यांग व्यक्ती अथवा अपंगांच्या संस्थेने तयार केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शनाचे आयोजन ठाणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रांगणात २२ डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधी करण्यात आले होते. परंतु याचे आयोजन दिवाळी न करता ऐन सुट्टीच्या वेळेत केल्याने या प्रदर्शनाकडे अक्षरशः नागरिकांनी पाठ फिरवली असून शेवटच्या दिवसापर्यंत या स्टाँलवर केवळ १०० ते दिडशे रुपयांची वस्तू विक्री झाल्याने या कार्यक्रमासाठी तब्बल ३५ लाखांची तरतूद नक्की दिव्यांगासाठी? की ठेकेदारासाठी या बाबत प्रश्न निर्माण झाला आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने याबाबत टिटवाळा येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड यांनी माहिती मागवली होती, मात्र आज दिड ते दोन महिन्यानंतर देखील ती न देण्यात आल्याने सीईओ तसेच राज्य माहिती आयुक्त यांच्या कडे दाद मागण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रुपाली सातपुते यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आयोजित दिव्यांंग व्यक्त अथवा अपंगांच्या संस्थेने तयार केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन  करण्यात आले, २२ ते २६ डिसेंबर असे ५ दिवस हे प्रदर्शन भरविण्यात आले. यामध्ये दिव्यांगाच्या जवळपास १८ संस्था व शाळा यांनी आपले स्टाँल मांडले होते. या प्रदर्शना मागील उद्देश होता की, दिव्यांगाना प्रोत्साहन व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यावेळी यातील सहभागी व्यक्तींना चहा, नास्ता व भोजन व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व कार्यक्रमासाठी तब्बल ३५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.


यामध्ये दिव्यांगानी अथवा अपंग संस्थांनी बनविलेल्या वस्तू विक्री व प्रदर्शन  जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आयोजित केले होते, याचा ठेका निखिल शहा, या एका जिल्ह्यातील वजनदार मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीने घेतला होता., वास्तविक पाहता हे प्रदर्शन दिवाळीच्या काळात घ्यायला हवे होते, मात्र ते नेमकं नाताळच्या  सलग सुट्टीच्या वेळी घेण्यात आले, याचा परिणाम असा झाला की, या प्रदर्शनाकडे दिव्यांग बांधव व नागरिकांनी अक्षरशः पाठ फिरवली होती. ५/७ गुंटे मैदानावर उभारण्यात आलेल्या मंडपात पुर्णपणे शुकशुकाट दिसून येत होता.. या प्रदर्शनास प्रत्यक्ष भेट दिली असता धक्कादायक चित्र समोर आले, काही स्टाँल धारक झोपले होते, प्रदर्शनास नागरिक नसल्यामुळे गेल्या ४ दिवसांत केवळ १००/१५० रुपयांची विक्री झाल्याचे स्टाँल धारकांनी सांगितले, तर हे प्रदर्शन चुकीचे दिवसांत घेतले, आंम्हाला अचानक सांगितले, त्यामुळे जे मिळेल त्या वस्तू घेऊन इथे आलो, आमची पंचायत झाली. पण आम्ही बोलू शकत नाही, असेही काहिनी सांगितले, याहीपेक्षा आश्चर्य व गमतीशीर बाब म्हणजे, वरीष्ठ अधिकां-यांना वस्तूंंची खरेदी झाली आहे हे दाखविण्यासाठी आम्ही एकमेकांच्या स्टाँल वरील वस्तू खरेदी केल्या असे एका महिला स्टाँल धारकांनी सांगितले. यावरून हे प्रदर्शन नक्की कोणासाठी?हा प्रश्न उपस्थित होतो


याहून दुर्दैवाची बाब म्हणजे या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर सीईओ सह कोणीही वरीष्ठ अधिकारी येथे उपस्थित नव्हते, केवळ जिल्हा समाज कल्याण प्रभारी अधिकारी संजय बागुल हे काही तासापुरते हजेरी लावून जात होते, ४ दिवसात जेमतेम १०० ते २०० लोकांनी जेवण केले असेल, परंतु ठेकेदार मात्र रोज २००लोक जेवतात असा दावा करतो हे मोठे धाडसाचे वाटते.


एकूणच येथील सहभागी संस्था, शाळा, उभारण्यात आलेला मंडप आणि असलेला शुकशुकाट पाहता जेमतेम या ५ दिवसात ५ ते १० लाख रुपये खर्च देखील शक्य वाटत नसताना तब्बल ३५ लाख रुपये कोणासाठी? हे वेगळं सांगण्याची गरज नाही, तर ठेकेदार निखिल शहा हा खालपासून वरपर्यंत सर्वांना 'आर्थिक,प्रोत्साहन देतो, अशी खाजगीत चर्चा ऐकायला मिळत होती. त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचा यामधील कागदोपत्री उद्देश दिव्यांगाना प्रोत्साहन व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा असला तरी प्रत्यक्षात मात्र ठेकेदाराला भरमसाठ'आर्थिक, प्रोत्साहन मिळेल ऐवढे मात्र शंभर टक्के खरे आहे.यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने टिटवाळा येथील शेतकरी सेवा सोसायटीचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते सुरज गायकवाड यांनी ३ जानेवारी २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती मागितली. मात्र आज दिड ते दोन महिने झाले तरी अद्याप माहिती दिली गेली नाही, किंवा याबाबत काहीही कळविले नाही. म्हणून अखेरीस श्री गायकवाड यांनी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी संजय बागुल यांची भेट घेतली असता बघतो, सांगतो,करतो अशी उडवाउडवीची उत्तरे दिली तर याच कार्यालयातील विस्तार अधिकारी लक्ष्मण सुरोशे यांनी दोन दिवस थांबा असे सांगितले.

एकूणच या अधिकारी व कर्मचारी यांची भाषा व देहबोली वरुन या दिव्यांग प्रदर्शन व विक्री मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे भासत होते, त्यामुळे आपण या विरोधात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी तसेच राज्य माहिती आयुक्त यांच्या कडे दाद मागणार असल्याचे सुरश गायकवाड यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...