तिमुरेचे संकट परदेशातले असले तरी मदतीचा हात डॉ श्रीकांत शिंदे साहेबांच्या रुपाने महाराष्ट्रातून आला - भाविकांचा अनुभव
*मुंबई, दि. 30 ऑगस्ट 2026*
कैलास-मानसरोवर यात्रेला गेलेल्या आम्हा 43 यात्रेकरूंसाठी ही यात्रा अध्यात्मिक समाधानाबरोबरच मृत्यूच्या छायेतून परतण्याचा थरारक अनुभव ठरली, अशी भावना यात्रेकरूंनी व्यक्त केली आहे.
नेपाळ-चीन सीमेवरील तिमुरे येथे आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीनंतर चीनमध्ये अडकलेल्या यात्रेकरूंना अखेर कोदारी बॉर्डरमार्गे नेपाळमध्ये प्रवेश करून सुखरूप भारतात परतण्यात यश आले आहे.
*तिमुरे येथील भीषण आपत्तीचा अनुभव*
रुद्र टूर अँड ट्रॅव्हल मार्फत मुंबई ते काठमांडू विमानाने आणि काठमांडू ते तिमुरेपर्यंत बसने प्रवास करून यात्रेकरू तिमुरे येथे मुक्कामाला होते. तेथील हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांनी आपुलकीने स्वागत केले होते. तिमुरे बॉर्डरवर इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करून ते चीनमध्ये गेले.
चीनमधील कैलास-मानसरोवर येथे पोहोचल्यानंतर तिमुरे येथे दुर्घटना घडल्याची बातमी समजली. ज्या हॉटेलमध्ये चहा-नाश्ता केला, ज्या लोकांनी सेवा केली तेच लोक, परिसरातील हॉटेल्स, वाहने, रस्ते आणि नेपाळ-चीन सीमेवरील पूल या प्रचंड आपत्तीत वाहून गेले. चिनी बाजूकडील इमिग्रेशन सेंटरची भव्य इमारत, शेकडो वाहने आणि शेकडो भाविक या आपत्तीचे बळी ठरले.
*खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मदतीने सुखरूप परतले*
सागा शहरात पोहोचल्यानंतर चीन सरकारच्या निर्बंधामुळे पुढील प्रवासावर निर्बंध आले आणि नेपाळमध्ये प्रवेशाचा मार्ग बंद झाला. यावेळी 43 भारतीय यात्रेकरू आणि 9 नेपाळी कर्मचारी अडकले होते.
या संकटकाळात कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, त्यांचे निकटवर्तीय अभिजीत दरेकर, ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर, आमदार राजेश मोरे आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध यंत्रणांनी घेतलेली काळजी आणि पाठपुरावा मोठा आधार ठरला.
ठाणे आरडीसी डॉ. संदीप माने यांनी तीन दिवसांत सहा वेळा स्वतः फोन करून विचारपूस केली. हा केवळ प्रशासकीय संपर्क नव्हता तर नातेवाईकाप्रमाणे आपुलकीने संवाद साधला. तहसीलदार विकास गारुडकर, भारतीय दूतावासातील अधिकारी आणि राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाने सातत्याने संपर्क ठेवत "तुम्ही एकटे नाही" असा विश्वास दिला. या यात्रेकरूं मध्ये फक्त भारतीय नव्हते त्यामध्ये भारतीय आणि लंडन, कॅनडा, फ्रान्समधील भाविक देखील होते. तसेच रुद्र टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे त्यांचे ९ कर्मचारी भाविकांची सेवा करण्यासाठी उपलब्ध होते. या सर्वांनी महाराष्ट्र प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक केले.
अखेर दि. 29 ऑगस्ट रोजी चीन-नेपाळ जोडणाऱ्या कोदारी बॉर्डरमार्गे नेपाळमध्ये प्रवेश देण्यात आला. सकाळी 6 वाजता प्रवास सुरू करून मध्यरात्री 2 वाजता ते काठमांडू येथील हॉटेलमध्ये पोहोचले. आज रविवार दि. 30 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता नेपाळ एअरलाइन्सच्या RA 201 विमानाने ते सुखरूप मुंबईत परतले.
तिमुरे येथील भीषण आपत्ती ही नैसर्गिक होती. मात्र संकटानंतर नागरिकांच्या पाठीशी कोण उभे राहते ही खरी कसोटी असते आणि या कसोटीत खासदार डॉ. शिंदे आणि महाराष्ट्र प्रशासनाने माणुसकीचे दर्शन घडवले, अशा शब्दांत यात्रेकरू प्रकाश माने आणि प्रतीक्षा माने यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
No comments:
Post a Comment