जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने ग्रामीण भागातील ५ शिक्षकांचा सन्मान !!
*ठाणे, दि. ७ सप्टेंबर २०२६*
जिल्हा परिषद, ठाणेच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित ‘जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२६-२७’ सोहळ्यात ग्रामीण भागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, त्यांच्यात जिज्ञासा व आत्मविश्वास निर्माण करणे, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांना ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.
या सोहळ्यास आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे व ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना योग्य दिशा देत गुणवत्तापूर्ण व विद्यार्थी-केंद्रित शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
*पुरस्कार प्राप्त शिक्षक -*
- *अंबरनाथ तालुका :* जि. प. शाळा मामूची वाडी, केंद्र पिंपळोली येथील प्राथमिक शिक्षिका छाया संजय कोकंदे
- *भिवंडी तालुका :* जि. प. शाळा देवरुंग, केंद्र शिवनगर येथील पदवीधर शिक्षक सुभाष गोविंद पाटील
- *कल्याण तालुका :* जि. प. शाळा घोटसई, केंद्र गोवेली येथील प्राथमिक शिक्षिका रंजना प्रकाश टेंभे
- *मुरबाड तालुका :* जि. प. शाळा खेडले तळवली, केंद्र खेवारे-महाज येथील प्राथमिक शिक्षक तानाजी धर्मा जाधव
- *शहापूर तालुका :* जि. प. शाळा कळगाव, केंद्र दहिवली येथील पदवीधर शिक्षक वैभव गणपत मांजे
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी, विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या शिक्षकांनी केलेले कार्य प्रेरणादायी ठरले आहे.
No comments:
Post a Comment